Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खुलताबादचे हे नाव बदलून होणार रत्नपूर? बापाचंही नाव बदला म्हणत इम्तियाज जलील भडकले

औरंगजेबाची कबर असलेल्या खुलाताबादचे नामांतरचा मुद्दा आता चर्चेत आला आहे. खुलाताबादचे रत्नापूर करण्यात यावे अशी मागणी शिंदे गटाने केली आहे. यावरुन AIMIM चे नेते इम्तियाज जलील आक्रमक झाले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 09, 2025 | 12:10 PM
Imtiaz Jaleel's aggressive reaction to the renaming of Aurangzeb's tomb village Khultabad to Ratnapur

Imtiaz Jaleel's aggressive reaction to the renaming of Aurangzeb's tomb village Khultabad to Ratnapur

Follow Us
Close
Follow Us:

खुलताबाद : राज्यामध्ये औरंगजेबाच्या कबरीवरुन जोरदार राजकारण रंगले आहे. अबू आझमी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले. यानंतर औरंगजेबाची कबर उखडण्यात यावी अशी मागणी राज्यभरातून होऊ लागली. यामुळे तणावपूर्ण वातावरण देखील निर्माण झाले होते. यानंतर आता शिंदे गटाच्या नेत्यांकडून औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादचे हे नाव बदलण्याची मागणी केली जात आहे. यावर AIMIM चे नेते इम्तियाज जलील यांनी रोष व्यक्त केला आहे. यापूर्वी देखील औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करण्यात आले आहेत. यानंतर आता रत्नपूरवरुन राजकारण रंगले आहे.

शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आणला आहे. शिरसाट यांनी औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादचे हे नाव बदलण्याची मागणी केली. संजय शिरसाट म्हणाले की, “औरंगजेबाने आपल्या ठिकाणांची नावं बदलली होती. औरंगजेबाची कबर खुलताबाद याठिकाणी आहे. परंतु इंग्रजांच्या काळात ते रत्नपूर म्हणून ओळखलं जात होतं. काही लोकांना औरंगजेबावर प्रेम उसळून येतंय. परंतु आपल्याला आपली संस्कृती वाचवावी लागले, असे म्हणत संजय शिरसाट यांनी नवीन मुद्दा सुरु केला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे ते म्हणाले की, “आम्ही औरंगजेबाची प्रॉपर्टी हिसकावून घेत नाही आहोत. आम्ही आपल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतोय. त्याचप्रमाणे दौलताबादचंही खरं नाव देवगिरी असं आहे. तिथे राजा राम देव राय यांनी राज्य केलं होतं. हा त्यांचा वारसा आहे. ते नावसुद्धा बदलायला हवं. आम्ही कोणती नवी मागणी करत नाही आहोत. औरंगजेबाने काबिज केल्यानंतर या ठिकाणांची नावं बदलली होती. आता तेच आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर याबाबतचा प्रस्ताव देणार आहोत. विधानसभेतही आम्ही हा प्रस्ताव आणू, “  असे म्हणत संजय शिरसाट यांनी नवीन मुद्द्यांला हात घातला आहे. यावरुन AIMIM चे नेते इम्तियाज जलील यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

इम्तियाज जलील यांनी बापाचे नाव देखील बदला असे म्हणत जहरी टीका केली आहे. ते म्हणाले की, तुम्ही शहरांची, इमारतींची, रस्त्यांची नावं बदलत आहात. आता जर नावं बदलण्याची मालिका सुरूच झाली आहे तर तुम्ही तुमच्या बापाचंही नाव बदलून घ्या. आता अजून राहिलंय तरी काय? सांगून टाका की आम्हाला हे नाव आवडलं नव्हतं, आता हे नाव बदलणार. इथल्या शहरांची नावं बदलत आहात, परंतु गुजरातच्या अहमदाबादमध्ये तुमचा बाप बसलाय का? असा थेट सवाल इम्तियाज जलील यांनी विचारला आहे.

Web Title: Imtiaz jaleels aggressive reaction to the renaming of aurangzebs tomb village khultabad to ratnapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2025 | 12:09 PM

Topics:  

  • Aurangzeb Kabar
  • Imtiaz Jalil
  • political news

संबंधित बातम्या

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार
1

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

गुहागरात भाजपाला पुन्हा नवसंजीवनी; भास्कर जाधव यांना शह, माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे योग्य नियोजन
2

गुहागरात भाजपाला पुन्हा नवसंजीवनी; भास्कर जाधव यांना शह, माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे योग्य नियोजन

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री थोडक्यात बचावले..! हेलिकॉप्टर हवेत झाले असंतुलित अन्…, VIDEO आला समोर
3

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री थोडक्यात बचावले..! हेलिकॉप्टर हवेत झाले असंतुलित अन्…, VIDEO आला समोर

Maharashtra Politics : टिपू सुलतान प्रकरणी ‘आ बैल मुझे मार’अशी अवस्था; वातावरण बिघडताच संजय राऊत स्पष्टच बोलले
4

Maharashtra Politics : टिपू सुलतान प्रकरणी ‘आ बैल मुझे मार’अशी अवस्था; वातावरण बिघडताच संजय राऊत स्पष्टच बोलले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.