Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर मनोज जरांगेंनी केली ‘ही’ मागणी; ‘देशमुख यांची हत्या झाल्यानंतर…’

बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याला मुख्य आरोपी म्हणून आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 05, 2025 | 12:53 PM
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर मनोज जरांगेंनी केली 'ही' मागणी; 'देशमुख यांची हत्या झाल्यानंतर...'

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर मनोज जरांगेंनी केली 'ही' मागणी; 'देशमुख यांची हत्या झाल्यानंतर...'

Follow Us
Close
Follow Us:

जालना : राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी (दि.4) मंत्रिपदाचा राजीनामा दिला. संपूर्ण राज्यभरातून रोष व्यक्त केल्यानंतर मुंडेंनी अखेर राजीनामा दिला आहे. त्यावर आता मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केले. ‘मुंडे यांना आमदारकीपासून दूर ठेवा. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे काम धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून करत होता का? देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आरोपींनी मुंडे यांना फोन केला त्यांची चौकशी झाली पाहिजे’, अशी मागणीही मनोज जरांगेंनी केली.

बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याला मुख्य आरोपी म्हणून आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध असल्याचे आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. अखेर त्यांनी राजीनामा दिल्यानंतर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मराठा समाजाच्या सगळ्या आमदारांना विनंती आहे की, अधिवेशनात सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या प्रश्न धरुन लावावा’.

तसेच हैद्राबाद संस्थान गॅझेट लागू करावं, सातारा, बॉम्बे गॅझेट माणुसकी दाखवून लागू करावे. समाजावर केलेल्या सर्व केसेस सरसकट मागे घेण्याचं कबूल केलं होतं. शिंदे, फडणवीस यांनी हे कबूल केलं आता शब्दाला मागे फिरू नये. आम्ही ८-९ मागण्या केल्या आहेत. मागण्या मान्य झाल्या नाही तर अधिवेशन काळात व्यापक आंदोलन करावं लागणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडेंचं कार्यालय चालवण्याचं काम कराड करत होता

धनंजय मुंडे यांचं कार्यालय चालवण्याचं काम वाल्मिक कराड करत होता. यासाठी मुंडे यांची चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे. फरार आरोपी याला पळून जाण्यासाठी मुंडे यांनी मदत केली. मोबाईल देखील फेकून दिला. देशमुख यांचा खून झाल्यापासून राजीनामापर्यंत कॉल डिटेल आली पाहिजे. धनंजय मुंडे यांना पुरवणी जबाबात घेणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी मंत्रिपद आणि आमदार पदापासून दूर ठेवलं पाहजे. ३०२ मध्ये अटक केली पाहिजे, अशी मागणीही जरांगे यांनी केली आहे.

Web Title: Keep dhananjay munde away from mla seat demand of manoj jarange nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2025 | 12:53 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Manoj Jarange
  • Santosh Deshmukh Case

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : पुण्यासह संभाजीनगरमध्येही भाजप-शिवसेनेची युती फिस्कटली; दोन्ही पक्ष आमनेसामने
1

Maharashtra Politics : पुण्यासह संभाजीनगरमध्येही भाजप-शिवसेनेची युती फिस्कटली; दोन्ही पक्ष आमनेसामने

उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्त्याचा उद्रेक; राष्ट्रवादीचे कार्यालयच फोडले, बॅनरही फाडला
2

उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्त्याचा उद्रेक; राष्ट्रवादीचे कार्यालयच फोडले, बॅनरही फाडला

Maharashtra Politics: ‘भाजपकडून वेळेनंतर AB फॉर्म…’; सोलापुरात जोरदार राडा
3

Maharashtra Politics: ‘भाजपकडून वेळेनंतर AB फॉर्म…’; सोलापुरात जोरदार राडा

Maharashtra Politics: “आम्ही महायुतीतून बाहेर…”; राजकारणात खळबळ, रामदास आठवले बाहेर पडणार?
4

Maharashtra Politics: “आम्ही महायुतीतून बाहेर…”; राजकारणात खळबळ, रामदास आठवले बाहेर पडणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.