Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मराठ्यांनी कुठेही जाळपोळ, दगडफेक करायची नाही…; मुंबईतील आंदोलनाचा जरांगे पाटलांनी सांगितला A to Z प्लॅन

मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे लवकरच मुंबईमध्ये येऊन आंदोलन करणार आहेत. यापूर्वी त्यांनी पश्चिम महाराष्ट्र दौरा करुन मराठा समाजाला एकत्रित आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 06, 2025 | 05:06 PM
manoj jarange patil press in jalna on mumbai protest for maratha reservation

manoj jarange patil press in jalna on mumbai protest for maratha reservation

Follow Us
Close
Follow Us:

जालना : राज्यामध्ये पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे एक्शनमोडमध्ये आले आहेत. मनोज जरांगे पाटील हे येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये आंदोलन करणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारपुढे मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला एकत्रित करण्याचे आणि संबोधित करण्याचे काम सुरु केले आहे. त्यांनी जालनामध्ये मराठा समाजाला आवाहन केले असून महायुती सरकारला इशारा दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी जालनामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईमध्ये होणाऱ्या आंदोलनाबाबत आवाहन केले आहे. ते म्हणाले की, “धाराशिवपासून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू केला. सोलापूर नंतर सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे आणि अहिल्यानगर दौरा असणार. हा दौरा झाल्यानंतर मराठा बांधवांची चर्चा करून 29 ऑगस्ट रोजी मुंबईला सर्वांनी निघायचे आहे. ज्याची नोंद निघाली, त्यांनी गाडी घेऊन मुंबईकडे निघायचे, एक घर, एक गाडी निघणार हा नारा सोलापुरातून देतो. प्रत्येकाने आपली वाहन घेऊन निघायचे. एकदम सोपी मोहीम आहे. एक घर, एक गाडी घेऊन निघायचे. सोलापूरच्या युवकांना आव्हान करतो, आरपारची लढाई आहे. रेकॉर्ड ब्रेक सभा होणार. असा समुद्र मराठ्यांना कधीच बघायला मिळणार नाही. या लढाईचे तुम्ही साक्षीदार व्हा,” असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना केले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे त्यांनी मुंबईच्या आंदोलनाबाबत माहिती देताना सांगितले की, “29 ऑगस्टची अंतिम लढाई असणार आहे. मुंबई जाताना शांततेत जायचे आणि शांततेत यायचे आहे. विजय मिळवल्याशिवाय परत यायचे नाही. सरकारने जर आपली माणस आंदोलनात घुसवले, तर एक इंचही मागे सरायचे नाही. मराठ्यांनी कुठेही जाळपोळ, दगडफेक करायची नाही. मुंबईकडे जाण्यासाठी 5 हजार पाण्याचे टँकर लागणार आहेत. मराठ्यांच्या डोक्यावरती आरक्षणाचा गुलाल टाकायचा म्हणजे टाकायचा. अंतरवाली सराटी येथून सकाळी 10 वाजता आम्ही निघणार. शिवनेरीचा पहिला मुक्काम करावा लागेल, शिवनेरी वरून चाकण, राजगुरुनगर, लोणावळा, आझाद मैदान मार्गाने जावे लागेल,” अशी माहिती जरांगे पाटील यांनी दिली आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

स्थानिक संस्था निवडणूका आल्यानंतर जरांगे पाटील आंदोलन करत असल्याच आरोप केला जात आहे. याबाबत ते म्हणाले की, “आम्ही निवडणूक आल्या म्हणून आंदोलन कधीच करत नाही.  तुम्ही आजी – माजी सरपंच, नगरसेवक नेते या सर्वांना सांगा की, आमच्या सोबत मुंबईला चला. कारण, आम्ही तुमच्यासाठी झटलो आहोत. आम्ही प्रचार करून गुलाल उधळून डोळे फोडून घेतो, तर तुम्ही आमचे लेकरा बाळ मोठ करण्याच्या वेळेस आले पाहिजे. 27% ओबीसी आरक्षण हा निर्णय चांगलाच आहे, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. जोपर्यंत सरकारकडून कुणबी आणि मराठा हा अध्यादेश येत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही.  सरकारकडे 58 लाख कुणबी असल्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे त्यांना कायदा पारित करावा लागेल. आता तुम्हाला मराठा आणि कुणबी एक आहेत, असा GR काढायला काही हरकत नाही,” अशी आक्रमक भूमिका मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.

Web Title: Manoj jarange patil press in jalna on mumbai protest for maratha reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2025 | 05:06 PM

Topics:  

  • Manoj Jarange
  • Maratha Reservation
  • political news

संबंधित बातम्या

B. Sudarshan Reddy : उपराष्ट्रपतीपदाच्या रिंगणात उतरली इंडिया आघाडी; बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर
1

B. Sudarshan Reddy : उपराष्ट्रपतीपदाच्या रिंगणात उतरली इंडिया आघाडी; बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप
2

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण
3

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण

मराठ्यांविरोधात इंग्रजांना मदत करणाऱ्या कुटुंबाच्या घशात कोट्यवधींची जमीन? रोहित पवारांच्या रडारवर शिंदे गटाचा बडा नेता
4

मराठ्यांविरोधात इंग्रजांना मदत करणाऱ्या कुटुंबाच्या घशात कोट्यवधींची जमीन? रोहित पवारांच्या रडारवर शिंदे गटाचा बडा नेता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.