Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: “उद्धव ठाकरेंमुळेच मराठी माणूस…”; ‘या’ नेत्याने ‘उबाठा’चं सगळंच बाहेर काढलं

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येण्याच्या चर्चानी राजकीय वर्तुळात रंग चढला असताना, शिवसेना नेते आणि मंत्री असलेल्या नेत्याने टीका केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 28, 2025 | 03:18 PM
Maharashtra Politics: "उद्धव ठाकरेंमुळेच मराठी माणूस..."; 'या' नेत्याने 'उबाठा'चं सगळंच बाहेर काढलं

Maharashtra Politics: "उद्धव ठाकरेंमुळेच मराठी माणूस..."; 'या' नेत्याने 'उबाठा'चं सगळंच बाहेर काढलं

Follow Us
Close
Follow Us:

उद्धव ठाकरेंमुळेच मराठी माणूस मुंबईबाहेर
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तरी फरक पडणार नाही 
योगेश कदमांची ठाकरेंवर जहरी टीका 

खेड: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येण्याच्या चर्चानी राजकीय वर्तुळात रंग चढला असताना, गृहमंत्री योगेश कदम यांनी या घडामोडींवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले, त्यांची युती झाली तरी त्यामुळे मुंबईकरांचे गेल्या २५ वर्षात झालेले नुकसान भरून निघणार नाही.

मुंबईकरांच्या जीवनात काहीही बदल होणार नाही. पंचवीस वर्षे मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरे यांच्याकडे असतानाही मराठी माणसाचे काय भले झाले? मराठी माणूस मात्र हळूहळू मुंबईच्या बाहेर फेकला गेला. त्यांनी सत्तेत असतानाही मराठी माणसासाठी ठोस निर्णय घेतला नाही. त्यांच्याकडून आता काय अपेक्षा ठेवावी?, असा सवाल गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी केला. ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्रीपदाची अडीच वर्षे मिळूनही उद्धव ठाकरे यांनी मराठी जनतेच्या हिताचे एकही धोरण अमलात आणले नाही.

नेत्यांवर मुंबईकर पुन्हा विश्वास ठेवणार नाहीत

मराठी माणसाच्या भावनांचा विचार करण्याऐवजी त्यांनी फक्त सत्तेचा उपभोग घेतला. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर जोरदार टीका करत म्हटले की, फसवे आणि दिखाऊ राजकारण करणाऱ्या या नेत्यांवर मुंबईकर पुन्हा विश्वास ठेवणार
नाहीत. मराठी माणूस आता जागा झाला आहे आणि तो विकासाच्या राजकारणाला पाठिंबा देईल. कदम यांच्या या वक्तव्यामुळे महानगरपालिका आगामी मुंबई निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Mahavikas Aghadi Rally: ‘ही सत्तेची लढाई नाही, सत्याची लढाई…’; महाविकास आघाडीसह ठाकरे बंधू मुंबईच्या रस्त्यांवर उतरणार

शिवतर कोडबा धरणाचा जलपूजन समारंभ

विकास कामांच्या पार्श्वभूमीवर खेड आणि दापोली येथे आले असता गृहराज्यमंत्री योगेश कदम माध्यमांशी बोलत होते. महाराष्ट्रातील सर्वांत कमी वेळात बांधण्यात आलेल्या धरणांपैकी एक म्हणून शिवतर कोडबा धरणाची नोंद होणार आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पाचे जलपूजन आज पारंपरिक पद्धतीने साडी, चोळी आणि नारळ अर्पण करून गृह राज्य मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते संपन्न झाले. चार वर्षांपूर्वी शिवतर, कोडबा, जामगे आणि परिसरातील गावांना पाणीपुरवठा व्हावा या उद्देशाने माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत या धरणाचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर विक्रमी वेगाने काम पूर्ण करत आज जलपूजनाचा सोहळा पार पडला.

Web Title: Minister yogesh kadam criticizes to uddhav and raj thackeray local body elections maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 03:17 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • raj thackeray
  • Uddhav Thackeray
  • Yogesh Kadam

संबंधित बातम्या

‘सत्तेमध्ये बसलेला हा पूर्णपणे निजामी मराठा अन् मनोज जरांगे निजामी मराठ्यांचे प्रतिनिधी’; प्रकाश आंबेडकर यांची घणाघाती टीका
1

‘सत्तेमध्ये बसलेला हा पूर्णपणे निजामी मराठा अन् मनोज जरांगे निजामी मराठ्यांचे प्रतिनिधी’; प्रकाश आंबेडकर यांची घणाघाती टीका

‘गडांचे रक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक मराठी माणसाची’; खासदार शाहू महाराजांची अपेक्षा
2

‘गडांचे रक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक मराठी माणसाची’; खासदार शाहू महाराजांची अपेक्षा

Maharashtra Politics: “शिंदे अन् अजित पवारांनी स्वाभिमान असेल तर सरकारमधून बाहेर..; अमित शाहांच्या एका शब्दावरुन सरकार कोसळणार?
3

Maharashtra Politics: “शिंदे अन् अजित पवारांनी स्वाभिमान असेल तर सरकारमधून बाहेर..; अमित शाहांच्या एका शब्दावरुन सरकार कोसळणार?

Maharashtra Politics: अमित शहांचा विरोधकांवर घणाघात; म्हणाले, “आगामी काळात होणाऱ्या…”
4

Maharashtra Politics: अमित शहांचा विरोधकांवर घणाघात; म्हणाले, “आगामी काळात होणाऱ्या…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.