Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“भीती वाटते मला या देशाची आता…; खासदार संजय राऊत असं म्हणाले तरी का?

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच पहलगाम हल्ल्यावरुन मोदी सरकरावर निशाणा साधला.

  • By प्रीति माने
Updated On: May 04, 2025 | 12:18 PM
Mp sanjay raut live press conference target modi government on pahalgam terror attack

Mp sanjay raut live press conference target modi government on pahalgam terror attack

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : जम्मू काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कॉंग्रेसने सरकारच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शिवसेना ठाकरे गट सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहे. केंद्र सरकारने अद्याप हल्ल्याला प्रत्युत्तर न दिल्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. तसेच पहलगाम हल्ल्यावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

खासदार संजय राऊत यांनी पहलगाम हल्ल्यानंतर भारताने उत्तर न दिल्यामुळे कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. खासदार राऊत म्हणाले की, “बारा दिवस होऊन गेले, आमचे 27 लोक दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मारले गेले. याला बारा दिवस झाले आणि बदला काय घेतला? रोज बातम्या येतात, या नाड्या आवळल्या, त्या नाड्या सोडल्या, 21 यूट्यूब चॅनल बंद केले पाकिस्तानचे, पाकिस्तानच्या हाय कमिशन मधले मधला स्टाफ कर्मचारीवर्ग कमी करा याला बदला घेणं म्हणतात का?  तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता? त्यांचे पक्ष फोडता, त्यांना तुरुंगात टाकता, त्यांचे आयुष्य उध्वस्त करता, त्यांच्या कुटुंबाचा छळ करतात. पाकिस्तानच्या बाबतीत या नाड्या आवळल्या, त्या नाड्या आवळल्या, एअर स्पेस बंद केले, याला बदला म्हणतात का? 27 लोक मारले गेल्यावर बदला कसा पाहिजे… इंदिरा गांधींचा इतिहास पाहा. त्यांना नेहरू आणि इंदिरा गांधींचा त्रास होतो. हे कोणाला मूर्ख बनवत आहेत?” असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे ते म्हणाले की, “प्रधानमंत्री हे नुसते फिरत आहेत. इकडून तिकडे तिकडून इकडे, मिठ्या मारत आहेत. लोकांना याला बदला घेणं म्हणत नाही. भीती वाटते मला या देशाची आता. अशा प्रकारचे राज्यकर्ते या देशात असतील आणि शत्रू इतका समोर माजलेला असेल आणि आमच्या बदलाची पद्धत काय युट्युब चॅनेल बंद करायचे. हे फक्त भाजपच्या विरोधकांना चुन चुन कर मारण्याचा प्रयत्न करत आहेत. तेही आता शक्य नाही. बारा दिवस झाले तरी हे बदला घेत आहेत आणि आता हे युद्ध सराव करत आहेत,” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याचा हप्ता हा आता मे महिन्याच्या सुरुवातीला खात्यामध्ये जमा होत आहे. यावरुन देखील राऊत भडकले. ते म्हणाले की, “लाडकी बहीण योजना बंद झालेली आहे. आता पाचशे रुपये देत आहेत, 1500 वरून 500 वर आले. प्रचारात 2100 रुपये देण्याचे बोलले होते. अजित पवार बोलत होते मी नाही बोललो कर्जमाफी मी कुठे बोललो? सरकार तुमचं आहे. तुम्ही त्या सरकारमध्ये आहात. तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. प्रत्येक मंत्री बोलत आहे माझा पैसा, माझा पैसा… तुमचा पैसा कुठला? एक मंत्री आहेत माझ्या खात्याचा पैसा वळवला, लाडक्या बहिणींना दिला ना? तुम्हाला कशाला पाहिजे पैसा?” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे ते म्हणाले की, “लाडक्या बहिणींना तुम्ही पैसे दिले म्हणून तुम्ही रडत आहात. आधी कसे हसत होतात मत पाहिजे म्हणून खिशातला पैसा वळवला का? सरकारी पैसा आहे याचा अर्थ तुम्ही लाडक्या बहिणींना देखील फसवत आहात. तुमचे जे सामाजिक विभागाचं जे कार्य आहे त्याची फसवणूक करत आहे. चोऱ्या माऱ्या लांड्या लबाड्या करून निवडणुका जिंकण्यासाठी ही पाकीट मारी केली होती आणि आता ही पाकीट मारी करणं सोपं नाही. अजित पवार तिकडे बसलेले आहेत खंबीर. अजित पवार एक अर्थमंत्री म्हणून खामक्या माणूस आहे, आम्ही पाहिलेलं आहे,” असे देखील मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Mp sanjay raut live press conference target modi government on pahalgam terror attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2025 | 12:18 PM

Topics:  

  • Pahalgam Terrorist Attack
  • PM Narendra Modi
  • sanjay raut

संबंधित बातम्या

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी
1

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी

“युतीची दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे; राज-उद्धव युतीबाबत खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान
2

“युतीची दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे; राज-उद्धव युतीबाबत खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान

RSS ला 100 वर्ष झाली तरी ‘मूंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम; हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
3

RSS ला 100 वर्ष झाली तरी ‘मूंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम; हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

ऐन Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले? मोदींना थेट रावणाची… ; राजकारण तापणार
4

ऐन Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले? मोदींना थेट रावणाची… ; राजकारण तापणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.