Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“खून आणि क्रिकेट एक साथ कैसा? भारत-पाक क्रिकेट सामन्यावरुन खासदार संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा

India vs Pakistan T20 Cricket Match : लवकरच भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामना होणार आहे. यावरुन खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेत मोदी सरकारला खडेबोल सुनावले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 11, 2025 | 11:48 AM
Sanjay raut news

Sanjay raut news

Follow Us
Close
Follow Us:
  • भारत विरुद्ध पाकिस्तान अशी आशिया कप 2025 मध्ये मॅच आहे
  • पहलगाम हल्ल्यामुळे या मॅचला विरोध दर्शवला जातो आहे
  • खासदार संजय राऊत यांनी मॅचवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला
India vs Pakistan T20 Cricket Match : मुंबई : येत्या 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेटचा सामना होणार आहे. यामुळे जोरदार राजकारण तापले आहे. भारतामध्ये पहलगाम हल्ला झाल्यामुळे पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली जात आहे. दरम्यान, संयुक्त अरब अमिरातमध्ये आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने येतील. हा सामना रद्द करण्याची देशभरात मागणी होत आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पहलगाममध्ये महिलांचं कुंकू पुसल्या गेलं, भाजप विसरला का? खून आणि क्रिकेट एक साथ कैसा?  असे प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केले आहेत.

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचवरुन मोदी सरकारला धारेवर धरले आहे. खासदार राऊत म्हणाले की,”14 सप्टेंबर ला अबूधाबी येथे भारत पाक सामना खेळवला जात आहे. हे लोकभावना विरुद्ध आहे. अजूनही २६ निरपराध लोक पहलगाम येथे मारले गेले, त्यांच्या कुटूंबाचा आक्रोश अजूनही संपलेला नाहीये, अतिरेकी सापडलेले नाहीत. ऑपरेशन सिंदूर सुरु आहे असं सांगितलं जात्ं, पाकिस्तानच्या कारवाया कश्मिरमध्ये अजूनही थांबलेल्या नाहीत अशा वेळेला पाकिस्तानच कंबरडं मोडण्याची आणि पाकिस्तान बरोबरचे सर्व संबंध तोडून टाकण्याची भाषा पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री आणि भाजपाचे असली नकली नेते हिंदुत्ववादी त्यांनी हा विषय वारंवार मांडला. मात्र आता मॅच खेळली जात आहे,” अशी टीका खासदार राऊत यांनी केली.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

खून आणि क्रिकेट एक साथ कैसा?

“खून आणि पाणी एक साथ बहेंगा नहीं… असे ते म्हणाले होते आता खून आणि क्रिकेट एक साथ कैसा? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले की, आमच्या महिलांचा उजाडलेले सिंदूर तु्म्ही विसरलात, हा काय प्रकार आहे ?आमचा सवाल भारतीय जनता पार्टीला आहे. विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल जे भारतीय जनता पक्षाचे प्रचारक आहेत त्याची भारत पाक समान्या विषयी भूमिका काय हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे,” अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

नरेंद्र मोदींना घराघरातून सिंदूर पाठवणार

त्याचबरोबर या भारत पाकिस्तान सामन्याविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 14 तारखेला पाकिस्तान बरोबरच्या सामन्याचा निषेध करुन त्या सामन्यांना विरोध केलेला आहे. “शिवसेनेची महिला आघाडी त्या दिवशी रस्त्यावर येईल आणि माझा कुंकू माझा देश अशा प्रकारचं आंदोलन केलं जाईल. माझं कुंकू माझा देश माझा अभिमान अशा प्रकारच आंदोलन 14 तारखेला होईल. प्रधानमंत्री सिंदूर विसरलेत, राजकारण करणार होते विरोध झाल्यामुळे थांबले त्यानंतर महाराष्ट्रातील लाखो महिला नरेंद्र मोदींना घराघरातून सिंदूर पाठवणार आहेत, असं अभियान आम्ही घेणार आहोत,” अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

Web Title: Mp sanjay raut taget modi government over india vs pakistan t20 cricket match asia cup 2005

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2025 | 11:46 AM

Topics:  

  • cricket marathi news
  • India vs Pakistan
  • sanjay raut

संबंधित बातम्या

IND vs PAK : संघातून काढू टाका…सामना गमावल्यानंतर Shahid Afridi संतापला! टीममधून काढून टाकण्याची केली मागणी
1

IND vs PAK : संघातून काढू टाका…सामना गमावल्यानंतर Shahid Afridi संतापला! टीममधून काढून टाकण्याची केली मागणी

T20 World Cup 2026 मध्ये IND vs PAK सामना पुन्हा होण्याची शक्यता! जाणून घ्या कधी आणि कसे शक्य आहे?
2

T20 World Cup 2026 मध्ये IND vs PAK सामना पुन्हा होण्याची शक्यता! जाणून घ्या कधी आणि कसे शक्य आहे?

Maharashtra Politics : टिपू सुलतान प्रकरणी ‘आ बैल मुझे मार’अशी अवस्था; वातावरण बिघडताच संजय राऊत स्पष्टच बोलले
3

Maharashtra Politics : टिपू सुलतान प्रकरणी ‘आ बैल मुझे मार’अशी अवस्था; वातावरण बिघडताच संजय राऊत स्पष्टच बोलले

India vs Pakistan सामन्यात ‘नो हॅन्डशेक’ अन् रोहित शर्माने पाकिस्तानी दिग्गजाला मारली मिठी, Video Viral
4

India vs Pakistan सामन्यात ‘नो हॅन्डशेक’ अन् रोहित शर्माने पाकिस्तानी दिग्गजाला मारली मिठी, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.