Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ईडीच्या ऑफिसमध्ये आग लागली की लावली? आमदार जितेंद्र आव्हाड यांचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप

शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे. मुंबईतील ईडी ऑफिसला आग लागल्यामुळे त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 28, 2025 | 03:23 PM
Ncp jitendra awhad target mahayuti over ed office fire and pahalgam terror attack

Ncp jitendra awhad target mahayuti over ed office fire and pahalgam terror attack

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे : मुंबईमधील ईडीच्या कार्यालयाला आग लागल्याची घटना घडली आहे. रविवारी (दि.27) पहाटे दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील ईडी कार्यालयात भीषण आग लागली. या घटनेत सुदैवाने कोणीतीही जीवितहानी झालेली नाही. ईडीचे कार्यालय कैसर-ए-हिंद इमारतीत आहे. आगीमध्ये कोणतेही कागदपत्रांचे नुकसान झालेले नाही अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मात्र विरोधकांनी यावरुन टीकेचे रान पेटवले आहे. शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ही आग नैसर्गिक होती की मानवनिर्मित होती असा संशय व्यक्त केला आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. मुंबईमध्ये ईडीच्या ऑफिसला आग लागल्यामुळे त्यांनी राज्य सरकारवर टीका कली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “ईडीच्या ऑफिसमध्ये ही आग लागली आहे की, लावण्यात आली आहे, हा संशय जनतेच्या मनात येणारच आहे. आणि हे परमेश्वराला माहीत. एकदा मंत्रालयात आग लागली होती, तेव्हा ती नैसर्गिक होती. तेव्हा विरोधात असणाऱ्या आणि आत्ता सत्तेत असणारे ओरडत होते, आग लावली आग लावली आता ती आग उलटी फिरली,” असा टोला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे ते म्हणाले की, “मंत्रालयामध्ये एकदा आग लागली होती त्यावेळी ती  शॉर्टसर्किटने लागली होती. मात्र मंत्रालयातली आग जणू काही त्यावेळचे मुख्यमंत्री यांनी स्वतः जाऊन लावले, असे त्या वेळेसचे विरोधी पक्षाचे म्हणजेच आत्ताचे सत्ताधारी म्हणत होते. कुंभमेळ्यात डुबकी मारली तर, सगळे पाप नष्ट होतात, त्या सारखंच आहे. ईडीकडे महत्त्वाचेच पुरावे असतात. ७० हजार कोटींच्या फाईल जाळल्या म्हणून, तुम्ही म्हणत होते. त्याच ७० हजार कोटींच्या फायली ईडी कार्यालयात होत्या,” असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

पाकिस्तानी नागरिक राज्याबाहेर काढले असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. याबाबत आव्हाड म्हणाले की, “जो प्रचलित कायदा असेल, त्याच्यानुसार कारवाई करावी, त्यांना कोण नाही म्हणत आहे. पण दर वेळेस आम्ही पाकिस्तान्यांना पकडतो आहे. मग यांचे बगलबच्चे कुठल्यातरी भागात जाणार आणि पाकिस्तानात शोधत बसणार आणि नाटक करत बसणार.  आपलं राजकारण करत असताना विकासावर बोलायचं नाही. उपाशी मेलो तरी चालेल, पण पाकिस्तान्यांना मारू म्हणा,” असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.

पहलगाम हल्ल्याबाबत बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. महायुतीकडून लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता दिला जाईल असे आश्वासन निवडणुकीच्या प्रचारामध्ये दिले होते. मात्र असे कोणतेही वक्तव्य नेत्यांनी केले नसल्याचे अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांनी केले. यावरुन जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “इतकी खोटारडी माणस सत्तेत आली आहेत, की ज्या लाडक्या बहिणींमुळे हे सत्तेत आले आहेत, त्यांचा विसर या भावांना पडलेला आहे. इतके खोटारडे भाऊ जगात कुठे नसतील,” असा टोला शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.

Web Title: Ncp jitendra awhad target mahayuti over ed office fire and pahalgam terror attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 03:23 PM

Topics:  

  • Jitendra Awhad
  • Ladki Bahin Yojana
  • Pahalgam Terrorist Attack

संबंधित बातम्या

‘राज्यातील लाडकी बहीण योजनेची फेरपडताळणी सुरू, पात्र लाभार्थी महिलांवर…’; आदिती तटकरेंचं मोठं विधान
1

‘राज्यातील लाडकी बहीण योजनेची फेरपडताळणी सुरू, पात्र लाभार्थी महिलांवर…’; आदिती तटकरेंचं मोठं विधान

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानने दाखवली गुर्मी; भारताला चार दिवसात  गुडघे टेकायला लावल्याचा दावा
2

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानने दाखवली गुर्मी; भारताला चार दिवसात गुडघे टेकायला लावल्याचा दावा

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी! पाच महिन्यात योजनेसाठी….
3

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी! पाच महिन्यात योजनेसाठी….

कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच! ४८ तासांत पाकिस्तानी नेत्यांची तिसऱ्यांदा भारताला पोकळ धमकी
4

कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच! ४८ तासांत पाकिस्तानी नेत्यांची तिसऱ्यांदा भारताला पोकळ धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.