'बंदुकीच्या जोरावर दहशतवादाचा अंत होणार नाही, तर...'; उमर अब्दुल्लांच मन हेलावून टाकणारं भाषण
जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी विशेष अधिवेशनात पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण केली. “आपण बंदुकीच्या जोरावर दहशतवाद नियंत्रित करू शकतो, पण त्याचा पूर्णतः नायनाट करू शकत नाही. दशहतवादाचा त्याचं वेळी नायनाट होईल, ज्यावेळी लोक आमच्या सोबत उभे राहतील आणि मला जाणवतंय की लोक आज आमच्यासोबत आहेत, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
उमर अब्दुल्ला पुढे म्हणाले की, “उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम, अरुणाचल पासून गुजरात, जम्मू-काश्मीर, केरळ संपूर्ण देश या हल्ल्याने हादरला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये हा पहिलाच हल्ला नाही, पण एक काळ असा होता की हे हल्ले थांबले होते. आता २१ वर्षांनी पहलगाममध्ये पुन्हा इतका मोठा हल्ला झाला आहे.”
#WATCH | Jammu: J&K CM Omar Abdullah says, “Militancy and terrorism will end when people will support us. This is the beginning of that… We should not say or show anything which harms this movement that has arisen… We can control militancy using guns, it will end only when… pic.twitter.com/cWmsUY9uQL
— ANI (@ANI) April 28, 2025
मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला म्हणाले, ” जम्मू काश्मीरमध्ये जे हल्ले झाले ते इतिहास जमा झाले आहेत. असं वाटत होतं. पण दुर्दैवाने, पहलगाममधील या हल्ल्याने पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. २६ लोकांना श्रद्धांजली अर्पण करताना माझ्याकडे बोलण्साठी शब्द नाहीत. जम्मू-काश्मीरची सुरक्षा ही इथल्या लोकांच्या निवडून आलेल्या सरकारची जबाबदारी नाही, हे माहिती असूनही, त्यांच्या कुटुंबीयांची माफी मागायची आहे”
ते पुढे म्हणाले, “पर्यटन मंत्री म्हणून मी या लोकांना आमंत्रित केलं होतं की तुम्ही जम्मू-काश्मीरला या, पण मी त्यांना परत सुखरूप पाठवू शकलो नाही. मी त्यांची माफीही मागू शकलो नाही. मी त्यांना काय सांगू, ज्यांनी आपल्या वडिलांना रक्ताने माखलेलं पाहिलं. त्या नेव्ही ऑफिसरच्या विधवेचं काय, जिचं लग्न नुकतंच झालं होतं, अशा उद्विग्न भावना त्यांनी सभागृहात व्यक्त केल्या.
#PahalgamTerrorAttack | J&K CM Omar Abdullah says, “I will not use this moment to demand statehood. After Pahalgam, with what face can I ask for statehood for Jammu and Kashmir? Meri kya itni sasti siyasat hai? We have talked about statehood in the past and will do so in the… pic.twitter.com/kZqXSRxLmY
— ANI (@ANI) April 28, 2025
“लोकांनी मला विचारलं की आमचं काय चुकलं? आम्ही फक्त सुट्टी घालवायला आलो होतो, पण आता आयुष्यभर आम्हाला या पहलगाम हल्ल्याची किंमत मोजावी लागेल. जे लोक हे करत आहेत, ते म्हणतात की हे तुमच्या भल्यासाठी आहे – पण आम्ही असं कधी म्हणालो का? ही आमची परवानगी होती का? आमच्यातला कुणीही या दहशतवादी हल्ल्याच्या बाजूने नाही. या हल्ल्याने आम्हाला आतून पोखरून टाकलं आहे.”
देशाच्या इतिहासातील सर्वात मोठं नक्षल ऑपरेशन, 500 पेक्षा जास्त नक्षलवादी चक्रव्यूहात अडकले
ते पुढे म्हणाले, “अशा परिस्थितीत आशेचा किरण शोधणं खूप कठीण आहे. गेल्या २६ वर्षांत पहिल्यांदाच मी लोकांना अशा पद्धतीने रस्त्यावर उतरलेलं पाहिलं आहे. कदाचित असं एकही गाव नसेल जिथं या हल्ल्याचा निषेध झालेला नाही. दहशतवादाचा नायनाट तेव्हाच होईल जेव्हा लोक आमच्यासोबत उभे राहतील. जामिया मशिदीत या हल्ल्यानंतर २ मिनिटांची शांतता पाळण्यात आली, आणि त्या शांततेचा अर्थ आम्हाला माहीत आहे.”
#WATCH | Jammu: J&K CM Omar Abdullah says, “Neither of us supports this attack. This attack has hollowed us. We are trying to find a ray of light in this… In the last 26 years, I have never seen people come out to protest against an attack like this…” pic.twitter.com/gMUYu7x4z1
— ANI (@ANI) April 28, 2025
“जम्मू-काश्मीरचा रहिवासी आदिल, ज्याने पर्यटकांचे प्राण वाचवण्यासाठी आपला जीव गमावला, त्याचा उल्लेख मी इथे करू इच्छितो. जम्मू-काश्मीरची सुरक्षा ही निवडून आलेल्या सरकारची जबाबदारी नाही, पण मी हा प्रसंग राज्याच्या दर्जासाठी मागणी करण्यासाठी वापरणार नाही. राज्याच्या दर्जाची मागणी आम्ही योग्य वेळी करू, पण आत्ता तो काळ नाही. सध्या आम्ही या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो आणि पीडित कुटुंबांच्या सोबत आहोत, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. त्यांचं भाषण ऐकताना अख्ख सभागृह स्तब्ध झालं होतं.