Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, सभापतींसाठी सव्वा वर्षाचा फॉर्म्युला; पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा

सव्वा वर्षाचा कालावधी संपताच संबंधित पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यावयाचे आहेत. त्यामुळे इतर पदाधिकाऱ्यांनाही संधी मिळू शकेल आणि हा निर्णय पक्ष स्तरावर घेण्यात आला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 24, 2026 | 12:15 PM
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, सभापतींसाठी सव्वा वर्षाचा फॉर्म्युला; पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, सभापतींसाठी सव्वा वर्षाचा फॉर्म्युला; पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा

Follow Us
Close
Follow Us:

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही जोरदार यश मिळवल्यानंतर आता जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समितीचे सभापती कोण होणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. याबाबत उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना एक महत्त्वपूर्ण घोषणा केली.

नवनियुक्त गटनेते, प्रतोद, जिल्हा परिषद अध्यक्ष पंचायत समिती सभापती आणि उपसभापती या सर्वांचा कार्यकाळ हा सव्वा वर्षांचा राहणार आहे. सव्वा वर्षाचा कालावधी संपताच संबंधित पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यावयाचे आहेत. त्यामुळे इतर पदाधिकाऱ्यांनाही संधी मिळू शकेल आणि हा निर्णय पक्ष स्तरावर घेण्यात आला असून, तो अंतिम आहे, अशी घोषणा पालकमंत्री सामंत यांनी केली आहे.

जिल्हा परिषदेच्या गटनेतेपदी विलास चाळके तर मुख्य प्रतोद म्हणून बाबू माप यांची निवड झाली आहे. त्यामुळे सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याची उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या धोरणाची ही अंमलबजावणी असून पालकमंत्र्यांकडून जाहीर करण्यात आलेला हा सव्वा वर्षाचा फार्मूला आता राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे.

हेदेखील वाचा : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सोडविण्यासाठी शासन वचनबद्ध; राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अभिभाषणामध्ये मांडले मत

पालकमंत्री सामंत यांनी सांगितले की, रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच जिल्ह्यातील सर्व नऊच्या नऊ पंचायत समितीचे सभापती यावेळी शिवसेनेचे असतील. जिल्ह्यात शिवसेनेने भाजपच्या बरोबरीने जे जोरकस काम निवडणुकांमध्ये केले आहे. त्यामुळेच रत्नागिरी जिल्हा हा राज्यातील सर्व जिल्ह्यमध्ये निवडणुकीच्या यशात ९४ टक्के यश मिळवून सर्वप्रथम आहे, हे भूषणावह आहे.

पंचायत समिती सभापती म्हणून शिवसेनेचे सदस्य

राजापूर, लांजा रत्नागिरी, संगमेश्वर, गुहागर, चिपळूण खेड मंडणगड आणि दापोली या सर्व ठिकाणी पंचायत समिती सभापती म्हणून शिवसेनेचे सदस्य विराजमान होणार आहे. संगमेश्वरमध्ये पंचायत समिती सभापती पद हे अडीच वर्षासाठी शिवसेनेकडे असेल. गुहागरमधील पंचायत समिती सभापतिपद पाच वर्षांसाठी शिवसेनेकडे असेल. देवरुख आणि चिपळूण येथे अडीच वर्षाचा कालावधीचे सभापतिपद असेल.

सवता सुभा मांडल्यास कारवाई करणार

निवडणुकीनंतर जिल्ह्यातील मतदारसंघांमधून फिरताना असे आढळून आले आहे की, काही जण आम्ही स्वतः निधी आणला असे लोकांना सांगत आहेत. प्रत्यक्षात हा निधी पक्षाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणलेला आहे. त्यामुळे पक्षातीलच काही जण स्वतःचे अस्तित्व वेगळा पद्धतीने निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. वेगळा सवता सुभा उभा करण्याचा प्रयत्न दिसून आला आहे. याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे जे काही काम जिल्ह्यात होईल ते पक्षाच्या माध्यमातून आणि पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असेल असेच सांगावे लागेल.

Web Title: Ratnagiri zilla parishad president and speaker to be appointed for one and a half years says guardian minister uday samant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • political news
  • Uday Samant

संबंधित बातम्या

“शिंदे-फडणवीस यांच्यात कुरघोडी नाही, तर ‘बॉन्डिंग’ मजबूत”; निर्णयावरून रंगलेल्या वादावर उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
1

“शिंदे-फडणवीस यांच्यात कुरघोडी नाही, तर ‘बॉन्डिंग’ मजबूत”; निर्णयावरून रंगलेल्या वादावर उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

धक्कादायक ! तीन महिन्यांत तब्बल 217 शेतकऱ्यांची आत्महत्या; काँग्रेसने साधला सरकारवर निशाणा
2

धक्कादायक ! तीन महिन्यांत तब्बल 217 शेतकऱ्यांची आत्महत्या; काँग्रेसने साधला सरकारवर निशाणा

सातारा जिल्हा परिषद सदस्य अपहरणनाट्य; महाबळेश्वर न्यायालयात सुनावणी
3

सातारा जिल्हा परिषद सदस्य अपहरणनाट्य; महाबळेश्वर न्यायालयात सुनावणी

Nitesh Rane :  नितेश राणेंना मोठा धक्का ; अभियंत्यावर चिखलफेक प्रकरणी एक महिन्याचा कारावास, मात्र…
4

Nitesh Rane : नितेश राणेंना मोठा धक्का ; अभियंत्यावर चिखलफेक प्रकरणी एक महिन्याचा कारावास, मात्र…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.