
सोशल मीडियावर पुनम मेहेंदळे या व्लॉगरने एक रिल पोस्ट केली आहे. यातील माहितीनुसार असं सांगितलं जात आहे की, या प्रचीन विहिरीत स्वत:ची सावली दिसली की, तुम्ही जगणार आहात की तुमचा मृत्यू होणार हे कळतं. असं म्हटलं जातं की, ही विहिर अत्यंत प्राचीन असून पुराणातील गंगेच्या निर्मितीच्या आधी ही विहिर अस्तित्वात आहे. ही विहिर आहे वाराणसीत. गावकऱ्यांनी सांगितलेल्या दंतकथेनुसार असं म्हणतात की, महादेवांना प्रसन्न करण्यासाठी चंद्रदेवांनी या विहिरीची निर्मिती केली. आजवर इथे असंख्य भाविक येऊन गेले. चंद्रकूप सिद्धेश्वरी मंदिराच्या आवारात ही विहिर आहे.
या विहिरीत प्रतिबिंब पाहताना तुम्हाला चप्पल काढून जावं लागतं. तुमचा मृत्यू कधी होणार किंवा तुम्ही किती काळ जगणार याचा अंदाज बांधता येतो. यात किती तथ्य आहे ते माहिती नाही पण भाविक इथे मोठ्या विश्वासाने येतात एवढं नक्की. ही विहीर प्राचीन असली तरी याचं पाणी स्वच्छ आहेय विहिरीत कोणत्याही प्रकारचा पाला पाचोळा साठून पाणी खराब होणार नाही याची खबरदारी घेतली जाते. या पण्याचं पावित्र्य जपण्यासाठी स्थानिक तशी काळजी देखील घेतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)