Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shravan 2025: श्रावणात शिवमंदिरातून परतताना करु नका या चुका, अन्यथा मिळतील अशुभ परिणाम

श्रावण महिन्यामध्ये भाविक मोठ्या संख्येने शिव मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतात. मात्र धार्मिक शास्त्रामध्ये उल्लेख केल्यानुसार मंदिरातून परतताना या गोष्टी करु नये.  कोणत्या चुका केल्यास अशुभ परिणाम मिळतात, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 04, 2025 | 03:42 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

महादेवाच्या पूजेसाठी श्रावण महिना विशेष मानला जातो. या महिन्यात शिवभक्त महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांची पूजा करण्यासाठी मोठ्या संख्येने शिव मंदिरांना भेट देतात. बऱ्याच वेळा मंदिरात जाताना किंवा परतताना लोक जाणूनबुजून किंवा नकळत अशा चुका करतात ज्यामुळे त्यांना त्याचे अशुभ परिणाम मिळतात. धार्मिक ग्रंथात उल्लेख केल्यानुसार या चुका करु नये, अन्यथा व्यक्तीच्या जीवनामध्ये नकारात्मकता येऊ शकते. मंदिरातून परतताना कोणत्या चुका करु नये, जाणून घ्या

मंदिरातून परतताना कोणत्या चुका करु नये

मंदिरातून परतताना काही गोष्टीकडे नेहमी लक्ष देणे गरजेचे आहे. मंदिरात प्रवेश करताना घंटा वाजवणे शुभ मानले जाते. मात्र परतताना घंटा वाजवू नये. त्यासोबतच मंदिरातून रिकाम्या हाती परत येऊ नये. याशिवाय मंदिरातून आल्यानंतर लगेच पदार्थ किंवा अन्न खाणे टाळावे.

Rahu-Chandra Yuti: 10 ऑगस्टपासून या राशीच्या लोकांनी घेऊ नका जोखीम, चंद्र-राहु युतीमुळे होऊ शकते नुकसान

घंटा वाजवू नये

मान्यतेनुसार, मंदिरातून परतताना घंटा वाजवू नये, यामुळे मंदिरातील सकारात्मक ऊर्जा दूर होते. असे म्हटले जाते की, ज्यावेळी आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो त्यावेळी घंटा वाजवल्याने नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा पसरते. परंतु परत येताना घंटा वाजवल्याने ही सकारात्मक ऊर्जा गोंधळून जाऊ शकते आणि ती संपुष्टात येऊ शकते. म्हणून, मंदिरातून येताना घंटा वाजवू नये.

मागे वळून पाहू नये

असे मानले जाते की, शिवमंदिरातून परतताना पुन्हा पुन्हा मागे वळून पाहू नये. मान्यतेनुसार मंदिरातून बाहेर पडताना भगवान शिवाचे लक्ष भक्ताकडून त्यांच्या निवासस्थानाकडे जाते आणि त्यावेळी मागे वळून पाहणे त्यांच्या कृपेत अडथळा आणू शकते. त्यामुळे वारंवार मागे वळून पाहू नये.

Pradosh Vrat: प्रदोष व्रताच्या दिवशी ‘ही’ फुले अर्पण केल्याने महादेव होतील प्रसन्न

रिकाम्या हाताने परतू नये

काही वेळा लोक फुले, फळे, मिठाई, धूप, दिवे, तांदळाचे धान्य इत्यादी घेऊन देवाची पूजा करण्यासाठी मंदिरात जातात आणि सर्व साहित्य देवाला अर्पण केल्यानंतर ते मंदिरातून रिकाम्या हाताने परततात. मात्र मंदिरातून असे रिकाम्या हाती परतणे शुभ मानले जात नाही. म्हणून मंदिरातून परतताना प्रसाद किंवा पूजा साहित्यातील फुले इत्यादी सोबत आणावे.

प्रसाद आणि फूल

मंदिरातून आणलेले प्रसाद किंवा फुले येताच पवित्र ठिकाणी आदराने ठेवावीत. प्रसाद सर्वांना वाटावा आणि स्वतः खा. तसेच, फुले पाण्यात वाहा किंवा झाडाच्या मुळाशी ठेवा. फुले फेकण्याची किंवा प्रसाद अशुद्ध ठिकाणी ठेवण्याची चूक करू नका.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Astrology do not make these mistakes while returning from the shiva temple they will have inauspicious consequences

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2025 | 03:42 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Astrology: 18 नोव्हेंबरपासून या राशीच्या लोकांचे चमकणार नशीब, समस्या होतील दूर 
1

Astrology: 18 नोव्हेंबरपासून या राशीच्या लोकांचे चमकणार नशीब, समस्या होतील दूर 

Budh Gochar: बुध राशीच्या संक्रमणामुळे तयार होणार लक्ष्मी नारायण योग, या राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ
2

Budh Gochar: बुध राशीच्या संक्रमणामुळे तयार होणार लक्ष्मी नारायण योग, या राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ

Margashirsha Amavasya: 19 की 20 नोव्हेंबर कधी आहे मार्गशीर्ष अमावस्या, राशीनुसार करा या गोष्टींचे दान
3

Margashirsha Amavasya: 19 की 20 नोव्हेंबर कधी आहे मार्गशीर्ष अमावस्या, राशीनुसार करा या गोष्टींचे दान

Yuti 2025: तूळ राशीत शुक्र-चंद्र करणार युती, या राशीच्या लोकांसाठी सुवर्णकाळाची संधी
4

Yuti 2025: तूळ राशीत शुक्र-चंद्र करणार युती, या राशीच्या लोकांसाठी सुवर्णकाळाची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.