
फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मात आणि ज्योतिषशास्त्रात अमावस्येला ‘निषिद्ध’ किंवा अशुभ मानण्यामागे धार्मिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणे आहेत. या दिवशी चंद्र आकाशात दिसत नाही, ज्यामुळे ऊर्जेचे संतुलन बदलते. अमावस्येला निषिद्ध मानण्याची पद्धत आहे. या मागे धर्मशास्त्र काय सांगते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया
अमावस्येला चंद्राचा अस्त होतो, ज्याचा थेट परिणाम मानवी मनावर होतो. ज्योतिषशास्त्रात चंद्राला मनाचा कारक मानले जाते. या दिवशी मन कमकुवत आणि नकारात्मक विचारांनी भरलेले असू शकते, त्यामुळे महत्त्वाचे निर्णय किंवा नवीन कामे टाळली जातात. तसेच अतृप्त आत्म्यांचा प्रभाव असतो. धार्मिक समजुतीनुसार, या दिवशी अतृप्त आत्मे किंवा नकारात्मक शक्ती सक्रिय असतात, ज्यामुळे मानसिक भीती किंवा अशुभ घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे यादिवशी शक्यतो शुभ कार्य करणे टाळावेत. अमावस्या ही तामसिक ऊर्जा किंवा काळ्या जादूशी संबंधित मानली जाते, म्हणून या दिवशी पूजा, दान आणि आध्यात्मिक चिंतनावर भर दिला जातो, न की भौतिक कामांवर असतो.
या दिवशी चंद्राच्या कमी गुरुत्वाकर्षणामुळे शरीरातील पाणी आणि मन यात असंतुलन निर्माण होऊ शकते. त्यामुळे या दिवशी उपवास करणे किंवा हलका आहार घेण्याचा सल्ला दिला जातो, मांस-मासे किंवा तामासिक पदार्थ टाळले जातात.
अमावस्येला शक्यतो कोणतेही शुभ काम करू नये असेच सांगितले जाते. नवीन घर घेणे, गृहप्रवेश करणे, लग्न करणे,
लग्नाची बोलणी, नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा महत्त्वाच्या प्रवासाला सुरुवात करणे या दिवशी टाळले जाते, कारण त्या कामांमध्ये नैराश्य किंवा अपयश येण्याची भीती असते. त्यामुळे शक्यतो या दिवशी टाळावे.
अमावस्येचा दिवस हा ‘आंतरिक शुद्धी’ आणि ‘स्थिरतेचा’ आहे, ‘अति-उपभोगाचा’ किंवा नवीन कार्यारंभाचा नाही, म्हणून अनेक गोष्टी निषिद्ध मानल्या जातात. अतृप्त आत्मे मानवी शरीरात प्रवेश करतात? भूतडी अमावस्येला असतात असे मानले जाते.
हिंदू मान्यतेनुसार, या दिवशी तुळशीची पाने तोडणे पाप मानले जाते. असे मानले जाते की, चंद्राच्या कमी गुरुत्वाकर्षणामुळे अमावस्येच्या दिवशी मांस, माशांची अंडी यांस निषिद्ध मानले आहे. यामागे असेही सांगितले की, अमावस्येला काहीवेळा वातावरण ही दुषित असतो. त्यामुळे हलका आहार घ्यावा. तसेच अमावस्येच्या दिवशी टाळण्यासारख्या गोष्टी भौतिक सुखाचे अतिरेक टाळा अमावस्येच्या दिवशी अति खाणे, गरजेपेक्षा जास्त खरेदी करणे किंवा चैनीच्या गोष्टींमध्ये रमणे योग्य मानले जात नाही. हा दिवस साधेपणा आणि तटस्थ असावा. अमावस्येच्या दिवशी दारू खरेदी करणे किंवा तिचे सेवन करणे टाळावे . मद्यपानामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते, जी व्यक्तीला आणि कुटुंबाला दीर्घकाळ त्रास देऊ शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: हिंदू धर्मानुसार अमावस्येला चंद्र पूर्णपणे अदृश्य असतो, त्यामुळे वातावरणात नकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. म्हणून या दिवशी शुभ कार्य टाळले जाते.
Ans: चैत्र अमावस्या पितृपूजा, तर्पण आणि दानधर्मासाठी विशेष मानली जाते. या दिवशी केलेले श्राद्ध पितरांना शांती देते अशी श्रद्धा आहे.
Ans: नाही. प्रत्येक अमावस्येचे वेगळे धार्मिक महत्त्व असते. काही अमावस्या विशेष पूजेसाठी आणि साधनेसाठी अत्यंत शुभ मानल्या जातात.