
फोटो सौजन्य- pinterest
आचार्य चाणक्य, ज्यांना कौटिल्य आणि विष्णूगुप्त या नावांनीही ओळखले जाते, यांनी चाणक्य नीती नावाचा एक महान ग्रंथ रचला. चाणक्य नीतीशास्त्रामध्ये आर्थिक अडचणींना कारणीभूत ठरू शकणाऱ्या अनेक सामान्य समस्या मांडल्या आहेत. घरातील छोट्या चुकांमुळे पैशाची कमतरता आणि गरिबी येऊ शकते. या समस्येपासून वाचण्यासाठी चाणक्यांनी काही महत्त्वाचे उपाय सांगितले आहेत त्याचे योग्य ते पालन केल्यास तुमच्या घरातील आर्थिक समस्या नाहीशा होतील आणि देवी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करेल असे सांगितले आहे.
मूर्खा यत्र न पूज्यन्ते धान्यं यत्र सुसञ्चितम्।
दम्पत्येः कलहो नाऽस्ति तत्र श्रीः स्वयमागता ।।
चाणक्य नीतीच्या तिसऱ्या अध्यायाच्या २१ व्या श्लोकात, देवी लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या तीन गोष्टींचा उल्लेख केलेला आढळतो. असे म्हटले जाते की, ज्या घरात मूर्खांची पूजा केली जात नाही, जिथे अन्नाला आदर दिला जातो आणि अन्नधान्याचा साठा असतो, तसेच ज्या घरात पती-पत्नीमध्ये प्रेम असते आणि भांडण-तंटे होत नाहीत, अशा घरात स्वतः लक्ष्मी येऊन वास्तव्य करू लागते.
या श्लोकातून आचार्य चाणक्यांनी अर्थ सांगितला आहे की, जे लोक मूर्ख लोकांपेक्षा सद्गुणी लोकांचा आदर करतात, त्यांना घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. शिवाय, जे लोक आपल्या घरात विविध प्रकारचे अन्नधान्य साठवून ठेवतात, त्यांना सुख आणि समृद्धीचा अनुभव येईल. त्याचबरोबर, घरातील जे लोक भांडण करत नाहीत त्यांच्या संपत्तीत आपोआप वाढ होऊ लागते.
आचार्याच्या म्हणण्यानुसार, लक्ष्मीच्या नावांपैकी एक नाव चंचल आहे. एका ठिकाणी राहणे हा तिचा स्वभाव नाही. एकदा लक्ष्मी एखाद्या घरात प्रवेश करते, तेव्हा ती स्वतःच्या इच्छेने ते घर सोडत नाही. अशा प्रकारे, समाधानी व्यक्तीला लक्ष्मीची आराधना करण्याची गरज नसते; ती स्वतःहून येऊन त्याच्या घरी आणि कुटुंबात वास्तव्य करते.
चाणक्यांच्या मते, ज्या घरामध्ये नेहमी शांततेचे वातावरण असते त्या घरामध्ये देवी लक्ष्मी नेहमी प्रवेश करते. शिवाय, तिथे राहणारे लोक तणावमुक्त असतात. त्यामुळे, नात्यांचा नेहमी आदर केला पाहिजे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: मेहनत, प्रामाणिकपणा आणि योग्य निर्णय घेण्याची सवय ठेवावी.
Ans: स्वच्छता, शिस्त, सकारात्मक विचार आणि पैशाचे योग्य व्यवस्थापन.
Ans: आळशीपणा, वाईट संगत, अनावश्यक खर्च आणि चुकीचे निर्णय टाळावेत.