
फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामध्ये हनुमान जयंतीचा उत्सव उत्साहात साजरा केला जातो. हनुमान जयंती साजरी करण्यामागील मुख्य कारण म्हणजे हनुमानांच्या जन्माचा उत्सव आणि त्यांच्या गुणांचे स्मरण करणे. हा दिवस भक्तांसाठी प्रेरणादायी असतो, कारण हनुमानांनी आपल्या जीवनातून शक्ती, बुद्धी आणि भक्तीचा आदर्श ठेवला. त्यांच्या आशीर्वादाने संकटे दूर होतात आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा येते, अशी श्रद्धा आहे.
आज देशभरात हनुमान जयंती साजरी होणार आहे. हा दिवस हनुमानाचा जन्माचा दिवस असून हा सण हनुमानाची शक्ती, भक्ती आणि हनुमानाच्या स्मरणार्थ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हनुमानांना संकटमोचन अर्थातच संकट दूर करणारे मानले जाते. ते शक्ती आणि धैर्याचे प्रतीक आहे. शिवाय ते बुद्धी आणि विवेक याचेही प्रतीक मानले जातात. भक्तांच्या सर्व अडचणी दूर करतात, अशी भक्तांची त्यांच्यावरती श्रद्धा आहे म्हणूनच या दिवशी हनुमान चालिसेचे पठण केले तर त्याचा लाभ होतो, असे देखील म्हणतात. त्यांचा हा दिवस साजरा करणे म्हणजे हनुमानाच्या अद्वितीय भक्तीचा आदर्श समोर ठेवणे. त्याच्या शौर्य, बुद्धी आणि निस्वार्थ सेवेला वंदन करणे. वाईट शक्तींवरती विजय आणि चांगल्या शक्तींचा सन्मान करणे. हनुमान हे राम यांचे परमभक्त होते त्यांनी रामांसाठी केलेली सेवा आणि त्यांची निष्ठा अतुलनीय मानली जाते. तुम्हाला हनुमान जन्माची गोष्ट माहिती आहे का? चला आज ही रंजक कथा जाणून घेऊया
अयोध्येपासून दूर एका सुंदर जंगलात अंजली माता नावाची एक तपस्वी राहत होती. तिला मुलं नव्हतं म्हणूनच ती देवांची कठोर अशी तपश्चर्या करत होती. तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन वायूदेव यांनी तिला आशीर्वाद दिला. तिला एक अद्भुत शक्तिशाली असा पुत्र होईल असे वरदान दिले. थोड्याच दिवसांनी अंजली मातेला तपस्वी बालक झाला तोच पुढे हनुमान म्हणून प्रसिद्ध झाला. पण त्याला हनुमान नाव पडण्यामागे एक कारण आहे.
हनुमान लहानपणी खूप खट्याळ आणि उत्साही होते. एकदा सकाळी त्यांनी आकाशात उगवणारा लाल भडक सूर्य पाहिला त्यांना वाटलं ते मोठं फळ आहे ते लगेच आकाशात उडी मारून सूर्य पकडायला गेले ते पाहून देवदेखील घाबरले तेव्हा इंद्र याने आपल्या व्रजाने हनुमानावर प्रहार केला त्या प्रहारामुळे हनुमान खाली पडले आणि त्यांची हनु म्हणजे हनुवटी जखमी झाली. म्हणूनच त्यांना हनुमान असं नाव पडलं. हनुमान जखमी झाल्यामुळे वायूदेव मात्र खूप रागावले त्यांनी संपूर्ण जगातील वारा थांबवला त्यामुळे सर्वत्र हाहाकार माजला. तेव्हा सर्व देवांनी येऊन हनुमानाला विविध शक्तीचं वरदान दिलं. अपार बल, वेग, बुद्धी आणि अमरत्वासाठी दीर्घायुष्य. हनुमान जयंतीचा हा दिवस म्हणजे शक्ती, श्रद्धा आणि निस्वार्थ सेवेला बंधन करण्याचा दिवस मानला जातो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: हनुमान जयंती हा दिवस हनुमान यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने साजरा केला जातो
Ans: बालपणी सूर्य पकडताना इंद्राच्या वज्रप्रहारामुळे त्यांच्या हनुवटीला इजा झाली, म्हणून त्यांना ‘हनुमान’ असे नाव पडले.
Ans: या दिवशी पूजा, उपवास आणि जप केल्याने संकटे दूर होतात आणि शक्ती, बुद्धी मिळते, अशी श्रद्धा आहे.