
फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे राशी परिवर्तन (गोचर) हा अत्यंत महत्वाचा आणि प्रभावशाली खगोलीय बदल मानाला जातो. आगामी मंगळवार २ जून रोजी रात्री २ वाजून २५ मिनिटांनी देवगुरु बृहस्पति चंद्राच्या स्वामित्व असलेल्या कर्क राशीत प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे सुमारे १२ वर्षाच्या प्रदीर्घ अंतरानंतर गुरु आपल्या उच्च राशी कर्कमध्ये प्रवेश करत आहेत आणि ३१ ऑक्टोबरपर्यंत ते याच राशीत राहणार आहेत. या महा-गोचराचा परिणाम मेष ते मीन सर्व राशींवर होणार असला तरी, ६ राशीसाठी हा काळ विशेष शुभ मानला जात आहे. या राशींना करिअरमध्ये प्रगती, नवीन आणि बंपर आर्थिक लाभाचे योग निर्माण होणार आहेत.
गुरू ग्रह हा सौरमालेतील सर्वांत विशाल ग्रह मानला जातो त्याची गती अत्यंत मंद असते. त्यामुळे तो एका राशीत साधारणतः 1 वर्ष राहतो. त्यामुळे गुरु जेव्हा राशी बदलतो तेव्हा त्याचा प्रभाव दीर्घकाळ टिकणारा आणि खोल परिणाम करणारा असतो.
ज्योतिषशास्त्रानुसार गुरू हा भाग्य, ज्ञान, विवाह, संतान, धन, विवेक आणि धार्मिक कार्याचा कारक ग्रह मानला जातो. त्याला सर्वांत शुभ आणि परोपकारी ग्रह मानले जाते.
गुरू जेव्हा चंद्राच्या राशीत कर्कमध्ये असतो तेव्हा त्याला उच्च स्थिती मानले जाते. अशा वेळी तो अत्यंत शुभ आणि प्रभावी परिणाम देतो. तर मकर राशीत तो नीच मानला जातो. जिथे त्याच्या शुभ फळामध्ये घट होते.
मेष राशींच्या जातकांसाठी हे गोचर एखाद्या वरदानासारखे ठरणार आहे. दीर्घासून सुरु असलेली आर्थिक अडचण दूर होण्याची शक्यता आहे. सुख सुविधांमध्ये वाढ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळू शकतात.
गुरुचा गोचर याच राशीत होत असल्यामुळे कर्क राशीसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे. नवीन नोकरी बदलण्याची संधी मिळू शकते. दीर्घकाळापासून सुरु असलेल्या करिअर अडचणींना मोठा दिलासा मिळेल.
सिंह राशींच्या लोकांना करिअरमध्ये मोठ्या संधी मिळतील. व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो. एखादी मोठी डील फायनल होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन किंवा ट्रान्सफरचे योग आहेत.
तूळ राशींच्या लोकांसाठी प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. ऑफिसमध्ये वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. नवीन जबाबदारी किंवा पद मिळू शकते. रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)
Ans: गुरु (बृहस्पति) हा ज्ञान, भाग्य, धन, विवाह, संतती आणि आध्यात्मिक प्रगतीचा कारक ग्रह मानला जातो. सुमारे १२ वर्षांनी गुरु पुन्हा त्याच राशीत येतो, त्यामुळे या गोचराला विशेष महत्त्व दिले जाते.
Ans: गुरुच्या महागोचराचा सर्वाधिक फायदा कोणत्या राशींना होऊ शकतो?
Ans: नोकरीत पदोन्नती, नवीन जबाबदाऱ्या, पगारवाढ, तसेच व्यवसायात नवीन संधी आणि विस्ताराचे योग निर्माण होऊ शकतात.