Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahabharata Story : सलग तीन वर्षे अखंड महाभारत लिहिताना गणरायाची लेखणी का तुटली? काय आहे वेदव्यासांच्या चतुर अटीमागील पौराणिक कथा?

महाभारताची रचना करताना वेदव्यासांनी भगवान गणेशांना लेखनिक म्हणून निवडले. मात्र लेखन सुरू करण्यापूर्वी दोघांमध्ये झालेल्या अटी-शर्तींमुळे ही कथा अधिक रंजक बनली. गणेशांनी अखंड लेखनाची अट घातली, तर वेदव्यासांनी प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजल्याशिवाय तो लिहायचा नाही, अशी अट ठेवली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 14, 2026 | 01:04 PM
सलग तीन वर्षे अखंड महाभारत लिहिताना गणरायाची लेखणी का तुटली? काय आहे वेदव्यासांच्या चतुर अटीमागील पौराणिक कथा?

सलग तीन वर्षे अखंड महाभारत लिहिताना गणरायाची लेखणी का तुटली? काय आहे वेदव्यासांच्या चतुर अटीमागील पौराणिक कथा?

Follow Us
Follow Us:
  • महाभारत लिहिताना गणरायाची लेखणी का तुटली?
  • काय आहे वेदव्यासांच्या चतुर अटीमागील पौराणिक कथा?
  • महर्षी वेदव्यासांनीही गणरायासमोर कोणती अट ठेवली?
Mahabharata Story : महाभारत हा हिंदू धर्मातील एक प्रमुख व जगातील सर्वात मोठा प्राचीन महाकाव्य ग्रंथ आहे。 महर्षी वेदव्यासांनी रचलेला हा ग्रंथ हस्तिनापूरच्या राजगादीसाठी कौरव आणि पांडव यांच्यात झालेल्या महायुद्धावर (कुरूक्षेत्र युद्ध) आधारित आहे。 यातील नीतिमत्ता, राजकारण आणि भगवद्गीता यांमुळे याला ‘पंचम वेद’ मानले जाते. महाभारताची रचना महर्षी वेदव्यास यांनी केली तर विघ्नहर्ता गणपती यांनी महाभारताचे लेखन केले. पण तुम्हाला माहितीय का? तीन वर्षे अखंड महाभारत लिहिताना गणरायाची लेखणी मध्येच तुटली होती? यामागची पौराणिक कथा काय आहे? जाणून घेऊया सविस्तर माहिती…

Mahabharata Story: महाभारतात अर्जुनाच्या रथावर हनुमान कसे आले? काय आहे यामागील पौराणिक कथा

महाभारत म्हणजे हिंदू धर्मातील एक असे महाकाव्य आहे जे धर्म, नीती, ज्ञान आणि जीवनातील रहस्यांचा उलगडा करते. महाभारत म्हणजे फक्त युद्धाचं वर्णन नाही तर जीवनाच्या प्रत्येक पैलूवर त्यात प्रकाश टाकलेला आहे. कुटुंब ,मैत्री आणि वैर यांचे संबंध किती खोल आणि गुंतागुंतीचे असतात हे सुद्धा महाभारतात शिकवलेले आहे.

पौराणिक मान्यतेनुसार, महर्षी वेदव्यासांना महाभारतासारखे विशाल महाकाव्य लिहून ठेवायचे होते. त्यासाठी अत्यंत बुद्धिमान आणि वेगाने लेखन करू शकणारा लेखनिक आवश्यक होता. त्यांनी भगवान श्रीगणेशांना ही जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली. भगवान गणेशांनी लेखनिक होण्यास होकार दिला, मात्र एक अट घातली. “मी लेखन सुरू केल्यानंतर माझी लेखणी एक क्षणही थांबता कामा नये. तुम्ही अखंड श्लोक सांगत राहिले पाहिजेत,” अशी त्यांची अट होती.

महर्षी वेदव्यासांनीही त्यावर एक चतुर अट ठेवली. त्यांनी सांगितले की, “प्रत्येक श्लोकाचा अर्थ पूर्णपणे समजल्याशिवाय तुम्ही तो लिहायचा नाही.” या अटीमुळे जेव्हा जेव्हा वेदव्यासांना पुढील श्लोक रचण्यासाठी वेळ हवा असे, तेव्हा ते अत्यंत गुंतागुंतीचे आणि गहन अर्थ असलेले श्लोक सांगत. त्या श्लोकांचा अर्थ समजून घेण्यात गणेश काही क्षण व्यस्त राहत आणि त्या काळात वेदव्यास पुढील श्लोकांची रचना करायचे.

पौराणिक कथांनुसार, अशा प्रकारे सलग तीन वर्षे महाभारताचे लेखन सुरू राहिले. या काळात भगवान गणेशांनी अखंड लेखन केले आणि महर्षी वेदव्यासांनी जगाला महाभारतासारखा अमूल्य ग्रंथ दिला. याच कथेशी आणखी एक प्रसिद्ध आख्यायिका जोडली जाते. लेखनादरम्यान लेखणी तुटल्यानंतर भगवान गणेशांनी विलंब होऊ नये म्हणून स्वतःचा एक दात मोडून त्यालाच लेखणी म्हणून वापरल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच त्यांना ‘एकदंत’ असे नाव प्राप्त झाले, अशी धार्मिक मान्यता आहे.

Mahabharata: भारतभ्रमण, तपश्चर्या आणि धर्मसंरक्षणाचा अद्वितीय प्रवास, महाभारतातील महत्त्वाची स्थळे जाणून घ्या

Web Title: Mahabharat writing story ved vyasa lord ganesha clever condition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 01:04 PM

Topics:  

  • Hindu
  • Mahabharata facts

संबंधित बातम्या

Indonesia History: जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश कधीकाळी होतं ‘हिंदू राष्ट्र’! एकदा वाचाचं ‘या’ देशाचा रंजक इतिहास
1

Indonesia History: जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश कधीकाळी होतं ‘हिंदू राष्ट्र’! एकदा वाचाचं ‘या’ देशाचा रंजक इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.