Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramayana: निस्वार्थी आणि विश्वासू मैत्रीची कहाणी, रामायणातील मैत्रीचा आदर्श जाणून घ्या

मैत्री ही निस्वार्थी, विश्वासू आणि धर्मनिष्ठ होती. रामाने निषादराज गुह, सुग्रीव आणि विभीषण यांसारख्या विविध जाती आणि वर्गातील लोकांना आपले मित्र मानून, खरी मैत्री कशी असावी याचा अमूल्य आदर्श दिला.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 22, 2026 | 01:00 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • निस्वार्थी आणि विश्वासू मैत्रीची कहाणी
  • रामायणातील मैत्रीचा आदर्श
  • रामाचे मित्रप्रेम
 

 

श्रीरामाचे मैत्रीचे संबंध निस्स्वार्थी, विश्वासू आणि जात-पात/दर्जा न पाहणारे होते. त्यांनी निषादराज गुह, सुग्रीव आणि विभीषण यांसारख्या विविध वर्गातील लोकांना आपले मित्र मानून खऱ्या मैत्रीचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला होता. संकटात साथ देणे, दिलेल्या वचनाचे पालन करणे आणि मित्राच्या हितासाठी प्रयत्न करणे ही त्यांच्या मैत्रीची प्रमुख वैशिष्ट्ये होती.

निस्वार्थी मैत्री

रामाने कधीही मैत्रीतून स्वार्थ साधला नाही. त्यांनी सुग्रीवाला त्याचा अधिकार मिळवून दिला आणि विभीषणाला लंकापती बनवले, पण बदल्यात काहीही मागितले नाही. तीन तीन राज्यांचे त्याने त्याग केले. निषादराज गुह (भिल), सुग्रीव (वानर) आणि विभीषण (राक्षस) यांसारख्या विविध लोकांशी त्यांनी सख्य केले. रामाने मैत्रीत दिलेल्या वचनाचे पालन नेहमी केले. बाली वधाचे वचन असो किंवा सुग्रीवाला राजा बनवण्याचे, त्यांनी ते पूर्ण केले. सुग्रीव जेव्हा बालीच्या भीतीमुळे निर्वासित होता, तेव्हा राम त्याच्या पाठीशी उभे राहिले. रामाने आपल्या मित्रांना नेहमी मान-सन्मान दिला. निषादराजाला सपरिवार अयोध्या भेटीचे निमंत्रण देणे हे त्याचे उदाहरण आहे. हनुमानजी आणि राम यांचा संबंध मैत्रीबंधानापेक्षा वेगळे होते, जो निस्सीम भक्ती आणि विश्वासावर आधारित होता.

Ramayana: आदर्श बंधुप्रेम म्हणजे काय? जाणून घ्या राम, लक्ष्मण आणि भरत यांच्या बंधुप्रेमाची अनोखी कथा

रामाचे मित्रप्रेम

भगवान श्रीराम हे केवळ आदर्श पुत्र, राजा किंवा पतीच नव्हते, तर ते एक अतिशय उत्तम मित्रही होते. त्यांच्या आयुष्यातील मैत्री ही निस्वार्थ, विश्वासू आणि धर्मनिष्ठ होती. रामाच्या मित्रप्रेमाची उदाहरणे आपल्याला रामायणामध्ये ठळकपणे दिसतात.

हनुमानताशी मैत्री

रामाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची मैत्री म्हणजे हनुमान यांच्याशी असलेली मैत्री. हनुमानजी हे रामाचे अनुपम दूत होते. हनुमानांनी सीतेच्या शोधासाठी जीव धोक्यात घातला, लंकेला जाऊन माहिती आणली आणि रामाच्या कार्यासाठी स्वतःला पूर्णतः समर्पित केले. याबदल्यात रामांनीही हनुमानावर अपार प्रेम आणि विश्वास दाखवला. राम म्हणत असत की “हनुमानांशिवाय माझे कार्य पूर्ण होणे अशक्य आहे.” आजही असं म्हणतात की जेथे रामकथा तेथे हनुमानजी असतात.

सुग्रीवाशी मैत्री

सुग्रीव यांच्याशी रामांनी केलेली मैत्रीही अत्यंत महत्त्वाची आहे. सुग्रीवाला त्याचा भाऊ वालीकडून अन्याय झाला होता. रामांनी त्याला न्याय मिळवून दिला आणि सुग्रीवानेही सीतेच्या शोधासाठी आपली संपूर्ण वानरसेना रामाला दिली. ही मैत्री परस्पर सहकार्य आणि विश्वासावर आधारित होती. सुग्रीवाने आपले मैत्रीचे बंध शेवटपर्यंत जोपासले.

Tri Ekadash Yog: बुध आणि चंद्र तयार करणार त्रिएकादश योग, या राशीच्या लोकांना होणार फायदा

विभीषण

रामाचे आणखी एक मित्र म्हणजे विभीषण. विभीषण हा रावणाचा भाऊ असूनही धर्माच्या बाजूने उभा राहिला. रामांनी त्याला आश्रय दिला आणि लंकेचा राजा बनवले. यातून रामांचे विशाल मन आणि मित्रावर ठेवलेला विश्वास दिसून येतो. तर रावणाच्या वधानंतर विभिषणाने अग्नी संस्कार देण्यास नकार दिला ते रामाने सांगितले तू करत नशील तर मी करेन.. मरणानंतर वैर संपते. यावरून शत्रूला आपला मानणारा राम होता.

रामाचे मित्रप्रेम आपल्याला शिकवते की खरी मैत्री ही स्वार्थावर आधारित नसून, ती निष्ठा, विश्वास आणि एकमेकांच्या सुख-दुःखात साथ देण्यावर आधारित असते. आजच्या काळातही रामाचे हे मित्रप्रेम आपल्यासाठी एक आदर्श आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: रामायणातील मैत्रीचा आदर्श काय आहे?

    Ans: रामायणात श्रीरामाने दाखवलेली मैत्री निस्वार्थी, विश्वासू आणि धर्मनिष्ठ होती. त्यांनी मित्रांसाठी संकटात साथ दिली आणि दिलेल्या वचनांचे पालन केले.

  • Que: रामाचे प्रमुख मित्र कोण होते?

    Ans: रामाचे प्रमुख मित्र होते – हनुमान, सुग्रीव, आणि विभीषण. हे मित्र विविध जाती व वर्गांचे असूनही रामाने त्यांना समान आदर दिला.

  • Que: आजच्या जीवनासाठी रामाचे मित्रप्रेम आपल्याला काय शिकवते?

    Ans: खरी मैत्री स्वार्थावर आधारित नसते; ती विश्वास, निष्ठा, संकटात साथ देणे आणि मित्राच्या सुख-दुःखात सहभागी होण्यावर आधारित असते. रामाचे मित्रप्रेम आजही आदर्श ठरते.

Web Title: Ramayana a selfless and faithful story and ideal of friendship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • dharm
  • Ramayana
  • religions

संबंधित बातम्या

Tri Ekadash Yog: बुध आणि चंद्र तयार करणार त्रिएकादश योग, या राशीच्या लोकांना होणार फायदा
1

Tri Ekadash Yog: बुध आणि चंद्र तयार करणार त्रिएकादश योग, या राशीच्या लोकांना होणार फायदा

Khandoba: खंडोबाच्या दारी लंगर का मोडले जाते? काय आहे यामागील कारण जाणून घ्या
2

Khandoba: खंडोबाच्या दारी लंगर का मोडले जाते? काय आहे यामागील कारण जाणून घ्या

Chaitra Navratri 2026: नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कृष्णामांडाला या गोष्टीचा दाखवा नैवेद्य
3

Chaitra Navratri 2026: नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कृष्णामांडाला या गोष्टीचा दाखवा नैवेद्य

Vinayak Chaturthi: विनायक चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी करा ‘हे’ उपाय
4

Vinayak Chaturthi: विनायक चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी करा ‘हे’ उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.