
फोटो सौजन्य- pinterest
सनातन धर्मात संकष्टी चतुर्थी अत्यंत विशेष मानले जाते. या दिवशी भक्त पूर्ण दिवस उपवास करतात. हा उपवास प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला पाळला जातो. संकष्टी चतुर्थीचा उपवास विघ्नहर्ता भगवान गणेशाला समर्पित आहे. वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते. या चतुर्थीला विकट संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भक्त पूर्ण दिवस उपवास पाळला जातो आणि चंद्रोद्याची वेळी चंद्राला नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो.
धार्मिक श्रद्धेनुसार, विकट संकष्टी चतुर्थीला उपवास केल्याने गणपती प्रसन्न होतो आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते. संकष्टी चतुर्थी कधी आहे, मुहूर्त आणि चंद्रोद्याची वेळ जाणून घ्या
या वर्षी वैशाख महिन्यातील कृष्ण चतुर्थी तिथीची सुरुवात रविवार, ५ एप्रिल रोजी सकाळी ११:५९ वाजता होणार आहे आणि या तिथीची सांगता ६ एप्रिल रोजी दुपारी २:१० वाजता होईल. अशा वेळी उद्यतिथीनुसार संकष्टी चतुर्थी रविवार, 5 एप्रिल रोजी आहे.
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त ५ एप्रिल रोजी सकाळी ७:४१ ते दुपारी १२:२४ वाजेपर्यंत असेल. यावेळी ब्रह्म मुहूर्त पहाटे ४:३५ ते ५:२१ पर्यंत असेल. तसेच अभिजीत मुहूर्त सकाळी ११:५९ ते दुपारी १२:४९ पर्यंत असेल. लाभ-उन्नती मुहूर्त सकाळी ९:१५ ते सकाळी १०:५० पर्यंत असेल. अमृत-सर्वोत्तम मुहूर्त सकाळी १०:५० ते दुपारी १२:२४ पर्यंत असेल.
विकट संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करा. मग, हातात पाणी घेऊन गणपतीसमोर पार्थना करा. त्यानंतर, देवघरात किंवा घरातील एखाद्या शांत कोपऱ्यात आसनावर लाल वस्त्र अंथरा आणि त्यावर गणपतीची मूर्ती किंवा चित्र ठेवा. यानंतर, गंगाजलाने किंवा शुद्ध पाण्याने गणपतीला स्नान घाला.
त्यानंतर गणपतीच्या मूर्तीला शेंदूर किंवा लाल चंदनाचा टिळा लावा आणि तांदूळ अर्पण करा. पूजेदरम्यान २१ दुर्वा अर्पण करा. “ओम गण गणपतये नमः” या मंत्राचा जप करा. गणपतीला मोदक किंवा बेसनाचे लाडू अर्पण करा. दिवा लावून आणि संकष्टी चतुर्थीच्या व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी. शेवटी, गणपतीची आरती करून पूजेची सांगता करा. रात्री, चांदीच्या भांड्यात किंवा कलशात थोडे दूध, अख्खे धान्य आणि फुले मिसळून चंद्राला पाणी अर्पण करा. चंद्राकडे पाहून त्याला अर्घ्य अर्पण करा. त्यानंतर, उपवास सोडा.
वैशाख संकष्टी चतुर्थीला चंद्रोदय रात्री ९.५८ वाजता आहे.
विकट संकष्टी चतुर्थीचा दिवस गणपती बाप्पाला समर्पित आहे. या दिवशी भक्त उपवास करतात. अशी श्रद्धा आहे की, जे भक्त हे व्रत पाळतात त्यांच्या जीवनातील सर्व संकटे, आर्थिक अडचणी आणि अडथळे दूर होतात. या दिवशी पूजा आणि उपवास केल्याने कुंडलीतील चंद्र आणि बुध ग्रहांचे दोष शांत होतात, सुख-समृद्धी वाढते आणि संततीचे कल्याण होते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: संकष्टी चतुर्थी रविवार, 5 एप्रिल रोजी आहे
Ans: हा दिवस गणेश यांना समर्पित असून, व्रत केल्याने संकटे दूर होतात आणि जीवनात सुख-समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे.
Ans: अडथळे दूर होणे, मानसिक शांती मिळणे आणि कार्यसिद्धी होणे, असे फायदे मानले जातात