
फोटो सौजन्य- pinterest
ग्रहांचा राजा सूर्य दर 30 दिवसांनी आपली राशी बदलतो. या संक्रमणाचा प्रत्येकावर खोलवर परिणाम होतो. या काळात काहींना फायदा होतो, तर काहींना वाढत्या समस्यांना तोंड द्यावे लागते. सूर्य सध्या कुंभ राशीत आहे. तो 14 मार्च रोजी पहाटे 12.41 वाजता मीन राशीत प्रवेश करणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्म देणारा शनि आधीच मीन राशीत उपस्थित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि शनि यांच्यात प्रतिकूल संबंध असल्याने हे संक्रमण काही राशीच्या लोकांसाठी आव्हानात्मक असणार आहे. या काळात तुम्हाला कामे पूर्ण करण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. कोणत्या राशीच्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे जाणून घ्या
ज्योतिषशास्त्रानुसार, मीन राशीतील सूर्याचे संक्रमण तुम्हाला तुमच्या आठव्या घरात होणार आहे. यामुळे तुमच्या कामात यश मिळविण्यात अडचणी येतील. या काळात अचानक मोठे खर्च होण्याची शक्यता आहे. नवीन कामाच्या सर्व योजना पुढे ढकलल्या जाऊ शकतात. या काळात तुम्हाला आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. तसेच थकवा देखील जाणवू शकतो. एकंदरीत, या काळात मानसिक चढ-उतार जाणवू शकतो. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ मिश्रित राहील. तुम्ही सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सूर्याचे हे संक्रमण या राशीच्या पाचव्या घरात होत आहे. तुम्हाला करिअरमधील आव्हाने आणि सर्जनशीलतेचा अभाव जाणवेल. कामावर आणि करिअरवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागतील. प्रतिकूल वेळेमुळे त्यांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन आव्हाने घेऊन येईल. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ सामान्य राहील.
सूर्य तुमच्या राशीत म्हणजेच मीन राशीच्या पहिल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे. तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. कधीकधी तुम्हाला गोंधळात टाकू शकता. आत्मविश्वासात थोडे चढउतार संभवतात. कामाच्या ठिकाणी स्पर्धा वाढू शकते. तुमच्या प्रेम जीवनात समस्या उद्भवू शकतात. धीर धरणे शहाणपणाचे ठरेल. या काळात तुम्हाला व्यवसायामध्ये समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. आर्थिक स्थिती सामान्य राहू शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: सूर्य आणि शनि एकाच राशीत किंवा अंशात आले की युती तयार होते. सूर्य अधिकार, नेतृत्व व आत्मविश्वास दर्शवतो; तर शनि शिस्त, परिश्रम आणि विलंब सूचित करतो. दोघांची युती झाल्यास जबाबदाऱ्या वाढणे, ताण-तणाव आणि कामात अडथळे येऊ शकतात.
Ans: आर्थिक व्यवहारांमध्ये विलंब, भागीदारीत मतभेद, सरकारी कागदपत्रे किंवा करसंबंधित अडथळे निर्माण होऊ शकतात. मोठी गुंतवणूक करताना काळजी घ्यावी.
Ans: सूर्य शनिच्या युतीमुळे सिंह, वृ्श्चिक आणि मीन राशीच्या लोकांनी सावध राहावे