
फोटो सौजन्य- pinterest
आजच्या काळात कमी किमतीत चांगल्या दर्जाच्या वस्तू मिळाव्यात म्हणून अनेकजण सेकंड हँड वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य दिले जाते. जुने कपडे, फर्निचर, दागिने, भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा सजावटीच्या वस्तू कमी दरात सहज उपलब्ध होतात. काही वेळा या वस्तूंची गुणवत्ता चांगली असल्यामुळे लोक त्यांची निवड करतात. वास्तुशास्त्रानुसार अशा वस्तूंमध्ये पूर्वीच्या मालकाची ऊर्जा किंवा स्पंदने असू शकतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्यामुळे अशा वस्तू घरात आणताना काही गोष्टींची काळजी घेणे शुभ मानले जाते.
जुने फर्निचर जर एखाद्या व्यक्तीकडून खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी तुम्हाला ते फर्निचर स्वच्छ करून घरी आणावे लागेल. आता फर्निचर स्वच्छ करणे म्हणजे ते पुसून घेणे नव्हे तर त्याच्यातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी फर्निचरला तुम्ही मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून किंवा पुसून घ्यावे.
कोणत्याही जुन्या वस्तू जर घरी आणल्या तर त्या आधी सूर्यप्रकाशात ठेवाव्यात. सूर्याची किरणे त्यावर पडणे चांगले मानले जाते. सूर्यकिरणांमध्ये शुद्धीकरणाची ऊर्जा असते. यामुळे नकारात्मकता शोधून घेतली जाते आणि वस्तूंमध्ये सकारात्मक ऊर्जा भरली जाते.
हिंदू धर्मात गंगाजलला अत्यंत महत्व आहे. कोणत्याही धार्मिक किंवा शुभकार्यात गंगाजल वापरले जाते. गंगेत पाप धुतली जातात असे मानतात. त्यामुळे मानून स्वतःच्या शुद्धीसाठी किंवा पापमुक्तीसाठी गंगास्नान करतो. नकारात्मक शक्ती दूर करण्यास गंगाजल उपयुक्त मानले जाते. यामुळे जुन्या वस्तू घरी आणल्या तर त्यावर गंगाजल अवश्य शिंपडावे.
अतिशय खराब, तुटलेल्या किंवा फाटलेल्या वस्तू केवळ स्वस्त मिळत आहेत म्हणून खरेदी करू नयेत. वास्तुशास्त्रानुसार अशा वस्तू घरातील सकारात्मक वातावरणावर परिणाम करू शकतात, अशी मान्यता आहे.
वास्तुशास्त्रातील हे नियम धार्मिक श्रद्धा आणि पारंपरिक मान्यतांवर आधारित आहेत. त्यांना वैज्ञानिक आधार सर्वच बाबतीत उपलब्ध असेलच असे नाही. जुनी वस्तू खरेदी करताना तिची गुणवत्ता, स्वच्छता, सुरक्षितता आणि उपयुक्तता यांनाही तितकेच महत्त्व द्यावे. श्रद्धा आणि व्यवहारिक विचार यांचा समतोल राखून निर्णय घेतल्यास तो अधिक योग्य ठरतो.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)
Ans: वास्तुशास्त्रानुसार, जुनी वस्तू घरात आणताना तिचे शुद्धीकरण करूनच वापरणे शुभ मानले जाते. मात्र हा धार्मिक श्रद्धेवर आधारित दृष्टिकोन आहे.
Ans: ते नीट स्वच्छ करावे. काही वास्तु मान्यतांनुसार मिठाच्या पाण्याने पुसून नंतर सूर्यप्रकाशात ठेवणे शुभ मानले जाते.
Ans: कपडे प्रथम व्यवस्थित धुवावेत, वाळवावेत आणि शक्य असल्यास इस्त्री करूनच वापरावेत.