
फोटो सौजन्य- pinterest
वास्तूशास्त्रानुसार, आपण जिथे बसून काम करतो किंवा व्यवसाय सांभाळतो, त्या जागेची ऊर्जा आपल्या निर्णयक्षमतेवर आणि प्रगतीवर थेट परिणाम करते. बऱ्याचदा रात्री-अपरात्री कठोर परिश्रम करूनही नोकरीत बढती मिळत नाही किंवा व्यवसायात अपेक्षित नफा होत नाही. वास्तुशास्त्रानुसार केवळ बांबू प्लांट ठेवणे पुरेसे नसून त्यासोबत काही शुभ वस्तू ठेवल्यास त्याचे लाभ अधिक वाढू शकतात. यामुळे कामातील अडथळे दूर होण्यास, एकाग्रता वाढण्यास आणि सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत मिळते. आपल्या ऑफिसच्या टेबलवर कोणत्या गोष्टी असू नयेत आणि प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी तिथे काय ठेवले पाहिजे, याचे सविस्तर वास्तू नियम खालीलप्रमाणे आहेत.
टेबलच्या पूर्व किंवा उत्तर कोपऱ्यात लहान बांबूचे रौप किंवा मनी प्लांट ठेवावे. हे झाड जसे वाढते, तशी तुमच्या करिअरची आणि पैशांची आवक वाढते.
टेबलवर एक छोटा क्रिस्टल ग्लोब किंवा तांब्याचा पिरामिड ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा शोषली जाते आणि नवीन व्यावसायिक ओळखी मजबूत होतात.
कामाची सुरुवात नेहमी सकारात्मक ऊर्जेने व्हावी म्हणून टेबलवर विघ्नहर्ता गणपतीची किंवा लाफिंग बुद्धाची छोटी प्रसन्न मूर्ती ठेवू शकता.
टेबलच्या उत्तर-पूर्व (ईशान्य) कोपऱ्यात पाण्याचा ग्लास किंवा छोटी बाटली ठेवावी.
टेबलवर विनाकारण जुनी कागदपत्रे, कचरा, रिकामे पेन किवा न चालणारे गॅजेट्स ठेवणं टाळा. वास्तू शास्त्रानुसार, अस्वच्छ टेबल मनात नकारात्मक विचार वाढवते आणि कामातील एकाग्रता भंग करते.
टेबलवर तुटलेली काच, उघडी कात्री, कटर किंवा टोकदार वस्तू समोर दिसतील अशा ठेवू नका. या गोष्टींमुळे कार्यक्षेत्रात विनाकारण वाद निर्माण होतात आणि ताणतणाव वाढतो.
अनेकदा काम करत असताना टेबलवर चहाचे रिकामे कप, पाण्याचा रिकामा तांब्या किंवा जेवणाचा डबा तसाच पडून राहतो. टेबलवर खरकटी भांडी राहिल्याने राहु-शनीचे दोष वाढतात, ज्यामुळे कामात सतत अडथळे येतात.
ऑफिसच्या टेबलवर काटेरी झाडे (जसे की कॅक्टस), रडणाऱ्या व्यक्तींचे किंवा बुडणाऱ्या जहाजाचे चित्र कधीही ठेवू नका.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)
Ans: होय. वास्तुशास्त्रानुसार बांबू प्लांट सकारात्मक ऊर्जा, समृद्धी आणि प्रगतीचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे तो ऑफिसमध्ये ठेवणे शुभ मानले जाते.
Ans: वास्तुनुसार ऑफिसच्या पूर्व किंवा आग्नेय दिशेला बांबू प्लांट ठेवणे लाभदायक मानले जाते.
Ans: प्लांट नियमित स्वच्छ ठेवावा, त्यातील पाणी वेळोवेळी बदलावे आणि त्याच्या आसपास स्वच्छता राखावी. यामुळे तो आकर्षक आणि ताजातवाना राहतो