Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gayatri Mantra: गायत्री मंत्राचा जप सकाळी करावा की संध्याकाळी? जाणून घ्या योग्य वेळ, नियम आणि धार्मिक महत्त्व

सनातन परंपरेमध्ये गायत्री मंत्राचा जप अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. धार्मिक श्रद्धेनुसार, त्याच्या नियमित सरावाने मानसिक शांती, सकारात्मक विचार आणि आध्यात्मिक संतुलन प्राप्त होण्यास मदत होते. गायत्री मंत्रांचा जप सकाळी की संध्याकाळी कधी करावा, योग्य वेळ आणि नियम जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 04, 2026 | 08:50 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • गायत्री मंत्राचा जप सकाळी करावा की संध्याकाळी
  • गायत्री मंत्रांचा जप करण्याचे नियम
  • गायत्री मंत्रांचा जप केल्याने काय फायदा होतो
 

 

प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी अशा परिस्थितीचा अनुभव येतो, जेव्हा सर्व काही ठीक असूनही मन अस्वस्थ राहते. काम करणे कठीण होते, विचार गोंधळलेले होतात आणि मनात एक विचित्र प्रकारची पोकळी रेंगाळत राहते. अशा वेळी, अनेक लोक अध्यात्माकडे वळतात आणि गायत्री मंत्राचा जप करणे हे त्यापैकीच एक साधन मानले जाते. सनातन परंपरेत, गायत्री मंत्र हा सर्वात शक्तिशाली मंत्रांपैकी एक मानला जातो. असा विश्वास आहे की, त्याचा नियमित जप केल्याने मन शांत होण्यास, एकाग्रता वाढण्यास आणि सकारात्मक विचार विकसित होण्यास मदत होते. गायत्री मंत्रांचा जप सकाळी की संध्याकाळी कधी करावा, योग्य वेळ आणि नियम जाणून घेऊया

गायत्री मंत्र का मानले जाते विशेष

गायत्री मंत्र हा वेदांमधील सर्वात प्रसिद्ध मंत्र मानला जातो. तो सूर्याची ऊर्जा, ज्ञान आणि चेतना यांचे प्रतीक आहे. धार्मिक श्रद्धेनुसार, याचा नियमित जप केल्याने बुद्धीला चालना मिळते आणि जीवनात सकारात्मक बदल घडून येतात. या मंत्राचा अर्थ केवळ शब्दांपुरता मर्यादित नाही; ही देवाला केलेली एक प्रार्थना आहे की, आपली बुद्धी योग्य निर्णय घेण्यासाठी सक्षम व्हावी आणि जीवनात सत्याचा मार्ग दाखवावा. याच कारणामुळे, अनेक लोक याला आपल्या दैनंदिन आध्यात्मिक साधनेचा एक भाग बनवतात.

Numberlogy:  मूलांक १ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

गायत्री मंत्रांचा जपासाठी योग्य वेळ कोणती

धार्मिक श्रद्धेनुसार, गायत्री मंत्र दिवसाच्या कोणत्याही वेळी म्हणता येतो, परंतु काही विशिष्ट वेळा अधिक शुभ मानल्या जातात. सर्वात पहिली वेळ ब्रह्म मुहूर्त आहे. सूर्योदयापूर्वीची ही वेळ पर्यावरणीय शांतता आणि मानसिक एकाग्रतेसाठी अनुकूल मानली जाते. दुसरी वेळ सूर्योदयाच्या सुमारास असते. असे मानले जाते की, सूर्योदयाच्या पहिल्या किरणांसोबत या काळात मंत्रोच्चार केल्याने मन अधिक स्थिर होते. तिसरी वेळ सूर्यास्तापूर्वीची मानली जाते. दिवसभराच्या धावपळीनंतर मानसिक शांती मिळवण्यासाठी ही वेळ शुभ मानली जाते.

गायत्री मंत्रांचा जप करण्याची काय आहे पद्धत

गायत्री मंत्राचा जप करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकाग्रता. शांत ठिकाणी ताठ बसून, पाठीचा कणा सरळ ठेवून आणि सामान्य गतीने श्वास घेत मंत्रांचा जप करणे सर्वोत्तम आहे. नवशिक्या २१ वेळा जपाने सुरुवात करू शकतात. अनेक साधक १०८ वेळा जप करण्याची परंपरा पाळतात. असे मानले जाते की जपाच्या संख्येपेक्षा नियमितता आणि भक्ती अधिक महत्त्वाची आहे.

Shukra Gochar: शुक्र करणार सूर्याच्या राशीमध्ये प्रवेश, या राशींच्या लोकांनी ऑगस्टपर्यंत राहावे सावध

गायत्री मंत्रांचे काय आहेत फायदे

धार्मिक ग्रंथ आणि आध्यात्मिक परंपरांनुसार, गायत्री मंत्राचा नियमित जप केल्याने मनाला शांती मिळते. यामुळे तणाव कमी होतो आणि सकारात्मक विचारांना चालना मिळते. काही अभ्यासकांच्या मते, ध्यान आणि जप यांसारख्या कृतींमुळे तणाव कमी होण्यास, मानसिक एकाग्रता वाढण्यास आणि भावनिक संतुलन राखण्यास मदत होते. दरम्यान, केवळ गायत्री मंत्रानेच कोणताही आजार बरा होऊ शकतो, असे म्हणणे योग्य ठरणार नाही.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: गायत्री मंत्राचा जप करण्यासाठी सर्वात शुभ वेळ कोणती?

    Ans: धार्मिक मान्यतेनुसार, ब्रह्ममुहूर्त आणि सूर्योदयाची वेळ गायत्री मंत्र जपासाठी सर्वात शुभ मानली जाते. तसेच संध्याकाळच्या संधीकाळातही जप करणे लाभदायक मानले जाते.

  • Que: गायत्री मंत्र जपत असताना कोणते नियम पाळावेत?

    Ans: स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत, शांत ठिकाणी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे, मन एकाग्र ठेवावे आणि शक्य असल्यास रुद्राक्ष किंवा स्फटिकाच्या माळेने जप करावा.

  • Que: गायत्री मंत्राचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: गायत्री मंत्र हा वेदांतील अत्यंत पवित्र मंत्र मानला जातो. तो बुद्धीची प्रार्थना, आत्मशुद्धी आणि ईश्वरप्राप्तीचा मार्ग दर्शवणारा मंत्र म्हणून पूजनीय आहे.

Web Title: What is the right time to chant gayatri mantra what is the rule religious importance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 08:50 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Numberlogy: मूलांक १ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
1

Numberlogy: मूलांक १ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Shukra Gochar: शुक्र करणार सूर्याच्या राशीमध्ये प्रवेश, या राशींच्या लोकांनी ऑगस्टपर्यंत राहावे सावध
2

Shukra Gochar: शुक्र करणार सूर्याच्या राशीमध्ये प्रवेश, या राशींच्या लोकांनी ऑगस्टपर्यंत राहावे सावध

Chanakya Niti: ३० वर्षांपूर्वी या सवयी अंगीकारा; करिअर आणि आर्थिक बाबतीत होईल मोठा फायदा
3

Chanakya Niti: ३० वर्षांपूर्वी या सवयी अंगीकारा; करिअर आणि आर्थिक बाबतीत होईल मोठा फायदा

Amarnath Yatra: ‘बम बम भोले’च्या जयघोषात आजपासून सुरु झाली अमरनाथ यात्रा; जाणून घ्या पौराणिक कथा आणि धार्मिक महत्त्व
4

Amarnath Yatra: ‘बम बम भोले’च्या जयघोषात आजपासून सुरु झाली अमरनाथ यात्रा; जाणून घ्या पौराणिक कथा आणि धार्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.