Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भगवान शंकराला भस्म का लावतात? भस्म आरतीची ही कथा तुम्हाला माहितेय का ?

इतर देवांप्रमाणे महादेवांचा श्रृंगार नाही. असतो तो म्हणजे पांढऱ्या रंगाचा भस्म. या भस्माचा नेमका अर्थ काय आहे आणि भस्म आरती आख्यायिका काय ते जाणून घेऊयात. 

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 15, 2025 | 04:38 PM
भगवान शंकराला भस्म का लावतात? भस्म आरतीची ही कथा तुम्हाला माहितेय का ?
Follow Us
Follow Us:
  • भगवान शंकराला भस्म का लावतात?
  • भस्म आरतीची कथा काय ?
  • भस्म लावण्याचा अर्थ काय ?
भगवान महादेव म्हणजे हिंदू धर्मातील आराध्य दैवत. पुराणकथेनुसार असं म्हटलं जातं की, महादेव हे वैरागी होते. महादेव म्हटलं हातात डमरु, त्रिशुल, गळ्यात नाग असतो. असा हा वैरागी अंगाला भस्म देखील लावतो. भगवान शंकर म्हणजे वैराग्य, तपस्या आणि सत्याचे प्रतीक. इतर देवांप्रमाणे महादेवांचा श्रृंगार नाही. असतो तो म्हणजे पांढऱ्या रंगाचा भस्म. या भस्माचा नेमका अर्थ काय आहे आणि भस्म आरती आख्यायिका काय ते जाणून घेऊयात.

 

त्यांच्या अंगावर सतत दिसणारी भस्म ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून ती जीवनाचे गूढ सत्य सांगणारी आहे. भस्म म्हणजे जळाल्यानंतर उरलेली राख. याचाच अर्थ सगळं काही नाशवंत आहे पण सत्य हे अंतिम आहे. म्हणूनच शंकर आपल्या अंगाला भस्म लावून मोह माया यापासून लांब राहण्याची शिकवण देतात.

पौराणिक कथेनुसार, असं म्हटलं जातं की, देवी सतीच्या वडीलांनी महादेवांचा भर सभेत अपमान केला त्यामुळे क्रोधीत झालेल्या सतीने स्वत: ची अग्नीकुंडात आहुती दिली. त्यावेळी तिची झालेली राख महादेवांनी अंगाला फासली. तर काही दंतकथेनुसार असं देखील सांगितलं जातं की, एकदा भगवान शंकर स्मशानभूमीत ध्यानस्थ होते. पंचमहाभूतांचे संतुलन टिकवण्यासाठी ते लीन झाले होते. त्या वेळी देवता, ऋषी-मुनी आणि गण त्यांच्या दर्शनासाठी तेथे आले.

ऐकावं ते विशेष; देशातील एकमेव मंदिर जिथे होते शस्त्रांची होते पूजा, काय आहे याचं रहस्य

का लावायचे महादेव अंगाला भस्म ?

देवतांनी पाहिले की भगवान शंकर अंगाला भस्म लावून स्मशानात राहत आहेत. तेव्हा त्यांनी शंकरांना विचारले, “हे महादेवा, आपण वैभव, सुवर्ण, रत्ने सोडून भस्म का धारण करता?” त्यावर भगवान शंकर म्हणाले, “हे भस्म म्हणजेच अंतिम सत्य. सृष्टीतील प्रत्येक गोष्ट नष्ट होते, पण भस्म उरते. जो या सत्याला ओळखतो, तोच मुक्तीच्या मार्गावर जातो.”अशी मान्यता आहे की, त्या वेळी देवतांनी स्मशानातील चिताभस्म गोळा करून मंत्रोच्चार करत भगवान शंकरांची आरती केली. हीच पहिली भस्म आरती मानली जाते. त्या आरतीत भस्म अर्पण करून देवतांनी अहंकाराचा त्याग आणि वैराग्य स्वीकारण्याची प्रतिज्ञा केली.

आणखी एका आख्यायिकेनुसार, त्रिपुरासुराच्या वधानंतर त्या राक्षसांच्या तीन नगऱ्या जळून भस्म झाल्या. त्या भस्माने भगवान शंकरांनी अंग लेपले, ज्यातून त्यांनी दाखवून दिले की अधर्माचा अंत आणि धर्माचा विजय शेवटी भस्मातच विलीन होतो.

भस्म आरतीची कथा काय ?

भस्म आरतीची कथा देखील अत्यंत भावपूर्ण आहे. मान्यता अशी आहे की एकदा भगवान शंकर स्मशानभूमीत ध्यानस्थ होते. तेथे उपस्थित असलेल्या ऋषी-मुनींनी आणि भक्तांनी भस्म गोळा करून त्यांची आरती केली. त्या वेळी शंकरांनी प्रसन्न होऊन सांगितले की, जो भक्त श्रद्धेने भस्म लावतो आणि त्याचा अहंकार त्यागतो, त्याच्यावर माझी कृपा सदैव राहील. त्या दिवसापासून भस्म आरतीची परंपरा सुरू झाली.काशी विश्वनाथ मंदिरातील भस्म आरती विशेष प्रसिद्ध आहे. पहाटेच्या वेळी, मंत्रोच्चार, घंटानाद आणि भस्माच्या लेपनासह होणारी ही आरती भक्तांना आध्यात्मिक अनुभूती देते. भस्म आरतीचा अर्थ केवळ पूजा नसून, जीवन-मरणाच्या सत्याची जाणीव करून देणे हा आहे.

त्राहिमाम! ‘या’ मंदिरातून निघणार भयावह चित्कार कलियुगाचा अंत, आवाजाने मरतील असंख्य लोक; ‘या’ राज्यात आहे दैवीस्थान

टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra.com या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भगवान शंकर अंगाला भस्म का लावतात?

    Ans: भस्म हे नश्वरतेचे प्रतीक आहे. सृष्टीतील प्रत्येक गोष्ट शेवटी नष्ट होते आणि भस्मात विलीन होते, हे सत्य भक्तांना सतत स्मरणात राहावे म्हणून भगवान शंकर भस्म धारण करतात.

  • Que: भस्म आरती म्हणजे काय?

    Ans: भगवान शंकरांची विशेष आरती म्हणजे भस्म आरती. या आरतीत भस्म अर्पण करून मंत्रोच्चार, शंख-घंटानाद केला जातो. ती वैराग्य आणि आत्मज्ञानाचे प्रतीक मानली जाते.

  • Que: भस्म आरतीची सुरुवात कशी झाली?

    Ans: पौराणिक आख्यायिकेनुसार, देवता व ऋषी-मुनींनी स्मशानात ध्यानस्थ असलेल्या भगवान शंकरांची चिताभस्म अर्पण करून आरती केली. तेव्हापासून भस्म आरतीची परंपरा सुरू झाली.

Web Title: Why is lord shiva offered ash do you know this story of ash aarti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 02:06 PM

Topics:  

  • hindu religion
  • Lord Shiva
  • Marathi News

संबंधित बातम्या

Sankarshan Karhade: जपानमधील भारतीयांचा देशप्रेमाचा क्षण! संकर्षण कऱ्हाडेंनी स्वातंत्र्यदिनी शेअर केली खास आठवण
1

Sankarshan Karhade: जपानमधील भारतीयांचा देशप्रेमाचा क्षण! संकर्षण कऱ्हाडेंनी स्वातंत्र्यदिनी शेअर केली खास आठवण

मराठी उद्योजकतेची ग्लोबल भरारी! Krystal Integrated Services चा ऐतिहासिक करार; स्मार्ट सिटी अन् EV क्षेत्रात घडणार क्रांती
2

मराठी उद्योजकतेची ग्लोबल भरारी! Krystal Integrated Services चा ऐतिहासिक करार; स्मार्ट सिटी अन् EV क्षेत्रात घडणार क्रांती

SEBI Big Decision : SEBI च्या मोठ्या निर्णयाने NRI ची चिंता मिटली; परदेशात बसूनच करा भारतातील सर्व गुंतवणूक! कसा होणार फायदा?
3

SEBI Big Decision : SEBI च्या मोठ्या निर्णयाने NRI ची चिंता मिटली; परदेशात बसूनच करा भारतातील सर्व गुंतवणूक! कसा होणार फायदा?

Entertainment News: स्वातंत्र्यदिनी अक्षय कुमार-टायगर श्रॉफने फडकावला तिरंगा; ‘खिलाडी कुमार’च्या कृतीने जिंकलं चाहत्यांचं मन!
4

Entertainment News: स्वातंत्र्यदिनी अक्षय कुमार-टायगर श्रॉफने फडकावला तिरंगा; ‘खिलाडी कुमार’च्या कृतीने जिंकलं चाहत्यांचं मन!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.