Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Independence Day: देशाचे वीर ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या भाषणाने केले जनतेला प्रेरित, क्रांतीकारकांचे विचार

स्वातंत्र्य दिन म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते शाळेत होणारं झेंडावंदन.क्रांतिकारकांनी गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी देशाबाबतचं प्रेम आणि आपुलकी जागृत व्हावी म्हणून आपल्या लिखाणातून प्रत्येक भारतीयाला प्रेरीत केलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 12, 2025 | 01:49 PM
Independence Day: देशाचे वीर ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या भाषणाने केले जनतेला प्रेरित, क्रांतीकारकांचे विचार
Follow Us
Close
Follow Us:

देशाला स्वातंत्र्य मिळून आता 79 वर्ष पूर्ण होत आहेत. गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळावं यासाठी अनेक क्रांतिकारकांनी स्वत:च्या रक्ताचे पाट वाहिले. त्याचं स्मरण आणि त्यांचे विचार हे आजयागत आणि पुढे देखील कायमच अमर असणार आहे. मात्र याच बरोबर स्वातंत्र्य दिन म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते शाळेत होणारं झेंडावंदन, परेड आणि भाषण. याच स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने क्रांतिकारकांनी गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी आणि देशाबाबतचं प्रेम आणि आपुलकी जागृत व्हावी म्हणून आपल्या लिखाणातून आणि भाषणातून प्रत्येक भारतीयाला प्रेरित केलं आहे. त्यांच्या याच भाषणामागचे विचार जाणून घेऊयात.

भगतसिंह

वयाच्या तेवीसाव्या वर्षी देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर चढले होते. भगत सिंह त्यांच्या भाषणातून कायम एक गोष्ट सांगत असायचे. “स्वातंत्र्य ही कुणी दान करून देण्याची वस्तू नाही, ती तर आपण स्वतःच्या शक्तीने मिळवायची असते”. अन्याय, अत्याचार आणि गुलामगिरीविरुद्ध लढणं हेच खऱ्या अर्थाने देशभक्ती आहे.” असं ते आपल्य़ा भाषणातून कायमच भारतीयांना प्रेरित करत होते.

नेताजी सुभाषचंद्र बोस

“तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दूँगा”, सुभाषबाबूंचं हे वाक्य कायम अमर राहिलं आहे. हे वाक्य ते कायमच म्हणायचे कारण त्यांना भारतीयांना पटवून द्यायचं होतं की स्वातंत्र्य मागून मिळणार नाही तर अन्यायाविरोधात उभं राहून मिळवावं लागणार आहे. : स्वातंत्र्यासाठी बलिदानाशिवाय पर्याय नाही. देशहितासाठी स्वत:चं बलिदान देणं हेचं आपलं कर्तव्य आहे असं ते आपल्या भाषणातून गुलामगिरीतून व्हा देशाला स्वांतंत्र्य़ मिळवून देण्य़ासाठी लढा हे सांगत असे.

स्वातंत्र्यवीर सावरकर

“देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि आपण या देशाचे देणं लागतो”. म्हणजेच जन्माला आल्यानंतर कधी ना कधी आपल्याला मोक्ष हा मिळणार आहे. हा देह कधी ना कधी मातीत मिसळणार आहे. मात्र त्याआधी आपण ज्या देशात वाढलो, मोठे झालो त्या देशाच्या हितासाठी आणि संरक्षणासाठी प्रयत्नशील असायला हवं हे सावरकरकरांनी त्यांच्या साहित्यातून आणि भाषणातून कायमच प्रेरणा दिली आहे.

या आणि अशा अनेक क्रांतीकारकांनी स्वत:च्या प्रणांची आहुती दिली आणि म्हणूनच आज हे स्वातंत्र्य उपभोगत आहोत. त्यांनी मिळवून दिलेलं स्वातंत्र्य जपणं हे आज प्रत्येकाची जबाबदारी आहे. झेंडावंदन, उत्तोमोत्तम भाषणं, राष्ट्रगीत गाणं म्हणजे देशाप्रती एका दिवसाचा आदर व्यक्त करणं आहे. ज्या देशात आपणं राहतो तो देश स्वच्छ ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. ज्या क्षेत्रात आपण काम करतो ते काम प्रामाणिकपणे करणं, समाजातील स्त्री आणि पुरुषांना सामाजिदृष्ट्या संरक्षण देणं ही फक्त पोलीसांचीच नाही तर देशाचा नागरिक म्हणून प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे आणि याची जाणिव जेव्हा प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजेल त्यावेळी प्रत्येक दिवस हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जाईल.

 

Web Title: Independence day special speech thoughts of revolutionaries marathi information

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2025 | 01:49 PM

Topics:  

  • Independence Day

संबंधित बातम्या

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन
1

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

स्वातंत्र्यानंतरच्या 79 वर्षात भारतीय ऑटो इंडस्ट्रीत अनेक गाड्या आल्या, मात्र ‘या’ 5 कारची सर कुणालाच नाही
2

स्वातंत्र्यानंतरच्या 79 वर्षात भारतीय ऑटो इंडस्ट्रीत अनेक गाड्या आल्या, मात्र ‘या’ 5 कारची सर कुणालाच नाही

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”
3

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”

भारत-पाक नकाशा तयार करणाऱ्या व्यक्तीने कधीही पाहिली नव्हती देशांची सीमा; वाचा फाळणीची ‘ती’ न ऐकलेली कहाणी
4

भारत-पाक नकाशा तयार करणाऱ्या व्यक्तीने कधीही पाहिली नव्हती देशांची सीमा; वाचा फाळणीची ‘ती’ न ऐकलेली कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.