Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Nari 2025’ report: ‘नारी २०२५’ अहवाल: ४०% भारतीय महिला स्वतःला असुरक्षित; ही शहरे सर्वात सुरक्षित

महिलांसाठी रस्त्यावर चालणे, सार्वजनिक वाहतुकीत प्रवास करणे किंवा रात्री बाहेर जाणे हे मानसिक ओझे बनत चालले आहे, असे ‘नारी २०२५’ अहवालात नमूद करण्यात आले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 29, 2025 | 12:53 PM
‘Nari 2025’ report: ‘नारी २०२५’ अहवाल: ४०% भारतीय महिला स्वतःला असुरक्षित; ही शहरे सर्वात  सुरक्षित
Follow Us
Close
Follow Us:
  • महिला सुरक्षिततेशी संबंधित नारी २०२५ अहवाल
  • ४० टक्के महिलांना असुरक्षिततेची भावना
  • महिला सुरक्षा अद्यापही मोठे आव्हान

‘Nari 2025’ Report:  देशात महिलांशी संबंधित गुन्हेगारीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नुकताच एक नारी २०२५ अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. देशातील ३१ शहरांमधील १२,७७० महिलांशी झालेल्या संभाषणाच्या आधारे तयार केलेल्या या अहवालात काही धक्कादायक बाबी आढळून आल्या आहेत. यात शहरी भागात ४०% महिलांनी आपण असुरक्षित असल्याचे वाटत असल्याचे म्हटले आहे.

संध्याकाळच्या वेळी, रात्रीच्या वेळी रस्त्यांवर रस्त्यांवर प्रकाश नसणे आणि पोलिसांच्या अनुपस्थितीमुळे महिलांमधील असुरक्षितेची भावना आणखी वाढल्याचे नोंदवण्यात आले आहे. या अहवालानुसार, महिला अनेकदा सार्वजनिक ठिकाणी छेडछाड, टक लावून पाहणे आणि अश्लील टिप्पण्यांना बळी पडतात. याचा त्यांच्या मानसिक आणि सामाजिक जीवनावर परिणाम होतो.

PM Modi In Japan : भारताला जपान प्रवासाचे मोठे फळ; 40 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक; AI, सेमीकंडक्टर आणि बुलेट ट्रेन चर्चेत

‘नारी २०२५’ अहवालात खुलासा

‘नारी २०२५’ अहवालात, महिला शाळा, महाविद्यालये, कार्यालये, बस, महानगरे आणि बाजारपेठांमध्ये असुरक्षित वाटतात. अनेक वेळा महिला या छळाविरुद्ध निषेध करतात, परंतु अनेक महिला बदनामीच्या भितीने शांत राहतात.

महिलांसाठी सर्वात असुरक्षित शहरे

नारी २०२५ च्या अहवालानुसार, महिलांसाठी सर्वात असुरक्षित शहरांच्या यादीत रांची हे शहर पहिल्या स्थानावर आहे. याठिकाणी ४४ टक्के महिलांनी असुरक्षितेची भावना व्यक्त केली आहे. रांची नंतर श्रीनगर, कोलकाता, दिल्ली, फरीदाबाद, पटना आणि जयपूरमधील महिलांनी असुरक्षित असल्याचे म्हटले आहे. दिल्ली आणि फरीदाबादमधील सुमारे ४२% महिला असुरक्षिततेच्या भावनेने झुंजत आहेत.

याशिवाय, कोहिमा हे सर्वात सुरक्षित शहर म्हणून असल्याची नोंद या अहवालात करण्यात आली आहे. याठिकाणी ८०% पेक्षा जास्त महिलांनी सुरक्षित वाटत असल्याचे म्हटले आहे. सुरक्षित मानल्या जाणाऱ्या इतर शहरांमध्ये विशाखापट्टणम, भुवनेश्वर, ऐझवाल, गंगटोक, इटानगर आणि मुंबई यांचा शहरांचा समावेश आहे. या शहरांमधील सुमारे ७० टक्के महिलांनी त्यांचे शहर सुरक्षित असल्याची प्रतिक्रीया दिली आहे.

Param Sundari Review: काय ‘चेन्नई एक्सप्रेस’ची कॉपी आहे ‘परम सुंदरी’? चित्रपटाबद्दल यूजर्सने दिली प्रतिक्रिया

महिलांची सुरक्षा अजूनही एक मोठे आव्हान

नारी २०२५ च्या अहवालात भारतात महिलांची सुरक्षा अजूनही एक मोठे आव्हान असल्याचे नमुद करण्यात आले आहे. जेव्हा एखादी मुलगी नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी तिच्या शहराबाहेर जाते तेव्हा तिचे कुटुंब नेहमीच तिच्या सुरक्षिततेबद्दल चिंतित असते. महिलांसाठी रस्त्यावर चालणे, सार्वजनिक वाहतुकीत प्रवास करणे किंवा रात्री बाहेर जाणे हे मानसिक ओझे बनत चालले आहे, असे ‘नारी २०२५’ अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अहवालानुसार, “केवळ कायदे करणे पुरेसे नाही, तर त्यांची योग्य अंमलबजावणी आणि सामाजिक जागरूकता तितकीच महत्त्वाची आहे.” महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा केवळ शासनाचा नाही, तर संपूर्ण समाजाचा असल्याचेही यात अधोरेखित करण्यात आले आहे. अहवालात सरकार आणि समाज या दोघांनाही इशारा देण्यात आला आहे की, महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस आणि व्यापक पावले उचलली नाहीत, तर येत्या काळात परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.

 

Web Title: Nari 2025 report 40 indian women feel unsafe these cities are the most unsafe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 12:49 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.