
फोटो सौजन्य: Pinterest and Instagram
स्वराज्य उभारण्यात आणि ते बळकट करण्यात शिवरायांना विशेष मार्गदर्शन लाभले ते राजमाता जिजाऊंचे. मात्र, याशिवाय त्यांना संत तुकाराम यांचे सुद्धा मार्गदर्शन लाभले. आजही महाराष्ट्रात संत तुकारामांचे अभंग मोठ्या उत्साहात गायले जातात. मात्र, तुम्ही कधी शिवरायांनी लिहिलेल्या अभंगाबद्दल ऐकले किंवा वाचले आहे का?
छत्रपती शिवाजी महाराज ओळखले जातात ते त्यांच्या दूरदृष्टी, उत्तम युद्धकौशल्य आणि योग्य निर्णयामुळे. मात्र, राजेंना कलेची देखील फार आवडत होती. त्यांच्या दरबारात नेहमीच कवी आणि लेखकांचा सन्मान होत असत. मात्र, आज आपण अशा अभंगाबद्दल जाणून घेऊयात, जो स्वतः शिवाजी महाराजांनी लिहिला आहे.
नासिवंत सुखासाठी | अंतरंगला जगजेठी |
नाही नाही याते गोडी | लक्ष चौऱ्याऐंशीच्या जोडी |
मनुष्य जन्म गेल्यावारे | काय करशील बा रे |
शिवराजे सांगे जना | म्या तो सोडिली वासना ||
चौऱ्यांशी लाख योनी पार करून आपल्याला मनुष्य जन्म मिळतो, आणि आपण आपले मनुष्य जीवन आपले इंद्रिय तृप्त करण्यात घालवतो, आणि इथेच जर आपले जीवन संपले तर मग पुढे काय?
म्हणून शिवाजीराजे सांगत आहेत मी त्या वासना सोडल्या तुम्ही पण सोडा !
वरील अभंग हा आपल्या राजांनी लिहिला आहे. यावरून समजते की राजांना लिखाणाची देखील आवड होती. आजवर आपण युद्धात निपुण आणि हाती तलवार घेऊन असणारे शिवाजी महाराज पहिले आहे. मात्र, हाती लेखणी घेऊन आयुष्याचा सार सांगणारे शिवराय आज पहिल्यांदाच आपण वाचत आहोत.