
IPL मध्ये वाद सुरू! RCB Vs LSG सामन्यात 'प्लेयर ऑफ द मॅच'वरून राडा, दिग्गज खेळाडू म्हणाला...
जोश हेझलवूडला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार
ज्येष्ठ क्रिकेटपटूने उपस्थित केले प्रश्न
आरसीबीचा एलएसजीवर दणदणीत विजय
LSG Vs RCB Results: काल एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी विरुद्ध एलएसजी (RCB Vs LSG) सामना झाला. या सामन्यात आरसीबीने एलएसजीवर दणदणीत विजय मिळवला आहे. आरसीबीच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. आरसीबीचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला (Akash Chopra) आहे. मात्र या सामन्यामध्ये आता एक नव्या वादाला तोंड फुटले आहे. हे प्रकरण नक्की काय आहे ते जाणून घेऊयात.
कालचा सामना आरसीबीने जिंकला आहे. मात्र या सामन्यात देण्यात आलेल्या ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कारावरुन वाद निर्माण झाला आहे. समालोचक आकाश चोप्रा यांनी यावर भाष्य केले आहे. आरसीबीच्या विजयात ज्या खेळाडूने महत्वाची कामगिरी दिली त्याऐवजी दुसऱ्या खेळाडूला हा पुरस्कार दिल्याने हा वाद निर्माण झाला आहे.
Why was Rasikh Salam not the POTM in #RCBvLSG game? Not fair on the kid… — Aakash Chopra (@cricketaakash) April 15, 2026
आरसीबीने एलएसजीचा पराभव केला. त्यानंतर प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार जोश हेझलवूडला देण्यात आला. त्यावर वाद निर्माण झाला आहे. जोश हेजलवूडने केवळ 1 विकेट घेतली. त्याने निकोलस पूरनची विकेट घेतली. रासीख दारने कालच्या सामन्यात जबरदस्त खेळी केली. त्याने 4 विकेट्स घेतल्या. हा अन्याय असल्याची भावना आकाश चोप्रा यांनी व्यक्त केली आहे.
Virat Kohli ने घेतली LSG च्या बॉलर्सची शाळा
आयपीएलचा 23 वा सामना बंगळुरूमध्ये पार पडला. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध लखनौ सुपर जायंट्समध्ये सामना झाला. आरसीबीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी केली. एलएसजीने आरसीबीला 147 रन्सचे टार्गेट दिले होते. विराट कोहलीने 49 रन्सची उपयुक्त खेळी केली. अखेर या सामन्यात आरसीबीने 5 विकेट्सने एलएसजीचा पराभव केला आहे.
RCB कडून Virat Kohli ने घेतली LSG च्या बॉलर्सची शाळा; 5 विकेट्सने केला दणदणीत पराभव
एलएसजीने दिलेल्या 147 रन्सचे टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी फिलिप सॉल्ट आणि विराट कोहली आरसीबीकडून सलामी फलंदाज म्हणून खेळण्यासाठी आले. मात्र फिलिप सॉल्ट केवळ 7 रन्स करून आउट झाला. त्यानंतर आलेल्या देवदत्त पाडीकलने पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारला. देवदत्त पाडीकल 10 रन्स करून आउट झाला. विराट कोहली 49 रन्सची उपयुक्त खेळी करून आउट झाला. केवळ 1 रन्सने त्याचे अर्धशतक चूकले. कृणाल पंड्याने 40 रन्सवर असलेल्या मिशेल मार्शची विकेट घेतली. कृणाल पंड्याने अब्दुल समदची विकेट घेतली. भुवनेश्वर कुमारने 3 विकेट पटकावल्या. रसिख डारने एलएसजीची दाणादाण उडवली. त्याने एकूण 4 विकेट्स घेतल्या.