Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानला धूळ चारण्यास भारताचे ‘हे’ खेळाडू सज्ज! एक तर आधीच करतोय कहर; वाचा सविस्तर 

आशिया कप २०२५ स्पर्धेत ४१ वर्षानंतर भारत आणि पाकिस्तान अंतिम सामन्यात आमनेसामने असणार आहेत. या सामन्यात भारताला विजय मिळवायचा असेल तर संघातील ५ महत्वाच्या खेळाडूंना जबरदस्त कामगिरी करावी लागणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 27, 2025 | 05:20 PM
These Indian players are ready to leave Pakistan in the dust! One of them is already wreaking havoc; Read in detail

These Indian players are ready to leave Pakistan in the dust! One of them is already wreaking havoc; Read in detail

Follow Us
Close
Follow Us:

Asia cup 2025 final ind vs pak : आशिया कप(Asia cup 2025 )स्पर्धेतील सुपर ४ सामने संपले आहेत. काल श्रीलंका आणि भारत यांच्यात २६ सप्टेंबर रोजी शेवटचा सुपर ४ सामना खेळला गेला. सामन्यात भारताने श्रीलंकेचा सुपर ४ सामन्यात पराभव केला. आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामन्यात महामुकाबला होणार आहे.  भारतीय संघ संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी करताना दिसत आहे. भारत या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिला आहे. भारताने सलग सहा सामने जिंकले आहेत. या मध्ये लीग टप्प्यात आणि सुपर ४ सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. आता भारत अंतिम सामन्यात देखील पाकिस्तान धूळ चारण्यास प्रयत्नशील असणार आहे.  अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध भारताचे पाच खेळाडू पाकिस्तानल पराभूत करण्यात मोठी कामगिरी बाजावू शकतात. याबाबत आपण जाणून घेऊया.

हेही वाचा : IND vs SL: कुलदीप यादवने वाढवली पाकिस्तानची चिंता! अंतिम सामन्यापूर्वी रचला मोठा इतिहास; वाचा सविस्तर

१)  शुभमन गिल

भारताचा भरवशाचा फलंदाज शुभमन गिलने आतापर्यंतच्या सहा आशिया कप सामन्यांमध्ये एकूण ११५ धावा फटकावल्या आहेत. तो एकदा नाबाद राहिला आहे. या मालिकेत त्याची सर्वोच्च धावसंख्या ४७ इतकी राहिली आहे. तथापि, पाकिस्तानसारख्या प्रतिस्पर्ध्याला हरवण्यासाठी गिलचे चालणे महत्वाचे असणार आहे.  जर पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात शुभमन गिलच्या बॅटने आग ओकली तर भारताचा विजय कोणीही रोखू शकणार नाही.

 २) अभिषेक शर्मा

पहिल्या क्रमांकावर आहे, धडाकेबाज भारतीय फलंदाज अभिषेक शर्मा. त्याने या संपूर्ण स्पर्धेत आपल्या फलंदाजीने कहर केला आहे.  तो मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. सहा सामन्यात ६ डावांमध्ये, अभिषेक शर्माने ५१.५० च्या सरासरीने ३०९ धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या ७५ इतकी आहे. जर त्याने पाकिस्तानविरुद्ध हा फॉर्म असाच सुरू ठेवला तर भारताचे चॅम्पियन होणे अटळ आहे.

३) सूर्यकुमार यादव

भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव टी-२० मध्ये त्याच्या असाधारण फटक्यांसाठी प्रसिद्ध आहे.  तथापि, त्याने या स्पर्धेत आतापर्यंत समाधानकारक फलंदाजी केलेली नाही. सहा सामन्यांच्या पाच डावांमध्ये तो २३.६६ च्या सरासरीने केवळ  ७१ धावाच करू शकला आहे. ज्याचा सर्वोच्च धावसंख्या ४७ इतकी आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मोठ्या सामन्यात सूर्यकुमार यादवची कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे.

४) संजू सॅमसन

भारतीय संघाचा महत्वाचा फलंदाज संजू सॅमसन आशिया कपमध्ये चांगल्या लयीत दिसत आहे. आतापर्यंतच्या सहा आशिया कप सामन्यांमधील तीन डावांमध्ये, त्याने ३६ च्या सरासरीने १०८ धावा फटकावल्या आहेत. ज्याची सर्वोच्च धावसंख्या ५६ ही आहे. जर त्याने पाकिस्तानविरुद्ध अंतिम सामन्यात हीच गती कायम ठेवली तर भारताला कोणतीही अडचण जाणवणार नाही.

हेही वाचा : वैभव सूर्यवंशीचा पाकिस्तानच्या बाबर आझमला धोबीपछाड! युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये रचला ‘हा’ इतिहास

 ५) हार्दिक पंड्या

आशिया कपमध्ये यावेळी भारतीय संघाचा भरवशाचा मानला जाणारा खेळाडू हार्दिक पंड्याची धावांसाठी संघर्ष करताना  दिसत आहे.  पाकिस्तानविरुद्धचा अंतिम सामन्यात पंड्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. पांड्याने आशिया कपच्या सहा सामन्यांमध्ये चार डावांमध्ये फक्त १६ च्या सरासरीने फक्त ४८ धावा करू शकला आहे. ज्याचा सर्वोच्च धावसंख्या ३८ इतकी आहे. जर अष्टपैलू पंड्याच्या बॅटने या अंतिम सामन्यात चांगली कामगिरी केली, तर भारतीय संघ आशिया कपचे जेतेपद जिंकण्यास काही एक अडचण येणार नाही.

Web Title: Asia cup 2025 five indian players including pandya sharma and surya ready to thrash pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2025 | 05:19 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • Asia cup 2025
  • PAK vs IND
  • Sanju Samson

संबंधित बातम्या

IND VS PAK : PCB अध्यक्ष मोहसीन नक्वींनी लाज सोडली! आशिया कप ट्रॉफी पाहिजे असेल तर घातली नवी अट
1

IND VS PAK : PCB अध्यक्ष मोहसीन नक्वींनी लाज सोडली! आशिया कप ट्रॉफी पाहिजे असेल तर घातली नवी अट

Abhishek Sharma : बापरे ठोकले 45 षटकार! पंजाबचा कर्णधार अभिषेक शर्माचे वादळी सराव सत्र
2

Abhishek Sharma : बापरे ठोकले 45 षटकार! पंजाबचा कर्णधार अभिषेक शर्माचे वादळी सराव सत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.