
राडा होणार, इतिहास घडणार! साल्ट लेकवर रणसंग्राम; भारत अन् Brazil भिडणार, कोलकात्यात थेट...
ब्राझील आणि भारतीय संघ यांच्यात कोलकाता येथे 3 ऑगस्ट रोजी होणा आहे. सध्या फिफाच्या रॅंकिंगमध्ये भारतीय संघ 138 व्या तर ब्राझीलचा संघ 5 व्या स्थानावर आहे. ब्राझील प्रथमच भारतात फुटबॉल सामना खेळणार आहे. 3 ऑक्टोबर रोजी ब्राझीलचा संघ प्रथमच भारताच्या भूमीवर खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. हा एक महत्वाचा आणि विशेष सामना असणार आहे. कारण भारतात ब्राझील फुटबॉलचे सर्वाधिक चाहते आहेत. आम्ही भारतीय चाहत्यांसोबत हा क्षण अनुभवण्यासाठी अत्यंत उत्सुक आहोत, असे ब्राझील फुटबॉल महासंघाने म्हटले आहे.
ब्राझीलचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध २५ आणि २९ सप्टेंबर रोजी दोन आंतरराष्ट्रीय सामने खेळल्यानंतर भारतात येणार आहे. दिग्गज खेळाडू नेमार ज्युनिअर हा सध्या राष्ट्रीय संघाचा भाग नाहीये. तरी विनीसियस ज्युनियर आणि कर्णधार मार्व्हिनियोस यांसारखे मोठे खेळाडू असणार आहेत. संघात नव्या युवा खेळाडूंना संधी द्यायची आहे असे मुख्य प्रशिक्षक कार्लो अँचेलोटी यांनी स्पष्ट केले आहे.
कोलकाता आणि ब्राझील यांच्यातील फुटबॉल खेळाचे नाते अत्यंत जून आहे. 24 सप्टेंबर 1977 रोजी फुटबॉलचे दैवत मानले जाणारे पेले आपल्या क्लबकडून प्रथमच भारतात खेळण्यासाठी आले होते. मात्र, ३ ऑक्टोबर २०२६ रोजी होणारा सामना विशेष ठरणार आहे. कारण इतिहासात पहिल्यांदाच ब्राझीलचा वरिष्ठ राष्ट्रीय संघ प्रत्यक्ष भारतीय भूमीवर अधिकृत आंतरराष्ट्रीय सामना खेळताना दिसणार आहे.
World Cup 2027: ऋषभ पंत, संजू सॅमसन आणि मोहम्मद शमी बाहेर…R Ashwin ने निवडला भारतीय संघ
राष्ट्रीय संघाचे संचालक सुभ्रता पॉल म्हणाले की, अशा सामन्यांमुळे खेळाडूंना स्वतःमध्ये सुधारणा करण्याची संधी मिळते. एआयएफएफचे उपमहासचिव सत्यनारायण मुत्यालू यांनी या क्षणाला ऐतिहासिक असे म्हटले आहे.