Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG : ओव्हाल कसोटीपूर्वी गिल-स्टोक्स यांचे एकमत! दोघांनीही आवळला ‘त्या’ बाबत तक्रारीचा सूर; नेमकं प्रकरण काय?

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळी जात आहे. या मालिकेतील पाचव्या कसोटी सामन्याआधी भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी दोन सामन्यातील कमी कालावधीबाबत तक्रार केली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 30, 2025 | 09:24 PM
IND vs ENG: Gill-Stokes' consensus before the Oval Test! Both of them complained about 'that'; What is the real issue?

IND vs ENG: Gill-Stokes' consensus before the Oval Test! Both of them complained about 'that'; What is the real issue?

Follow Us
Close
Follow Us:
  • भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे.
  • भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांच्या कर्णधारणांनी तक्रारीचा सूर आवळला आहे.
  • गिल आणि स्टोक्सने दोन कसोटीमधील अंतर किमान ३ ऐवजी ४ ते ५ दिवसांचे असावे, असे म्हटले आहे.
IND vs ENG 5thTest : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चार सामने खेळून झाले इंग्लंडने २-१ अशी आघाडी मिळवली आहे. तर नुकतीच मँचेस्टर येथे खेळवण्यात आलेला कसोटी सामना ड्रॉ झाला आहे. या मालिकेतील पाचवा सामना ३१ जुलैपासून ओव्हल येथे खेळला जाणार आहे. या दरम्यान भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांच्या कर्णधारणांनी तक्रारीचा सूर आवळला आहे. चौथ्या आणि पाचव्या कसोटी सामन्यादरम्यान फक्त तीन दिवसांचा कालावधी देण्यात आल्याने भारताचा कर्णधार शुभमन गिल आणि इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यांनी याबद्दल तक्रार केली आहे.

बेन स्टोक्स आणि शुभमन गिल या दोघांकडून बुधवारी कसोटी सामन्यांमधील अंतर वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. या दोघांनी म्हटले की पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील गोलंदाजांवर जास्त कामाचा ताण बघता, दोन सामन्यांमधील तीन दिवसांचा ब्रेक खूप कमी आहे. लीड्स येथील पहिल्या कसोटी सामन्यानंतर आणि लॉर्ड्स येथील तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर एका आठवड्याचे अंतर होते, मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या आणि चौथ्या आणि पाचव्या सामन्यात फक्त तीन दिवसांचा अंतर होते.

हेही वाचा : हरियाणाच्या हरदीपचा जगात डंका! कुस्तीत इराणला केले चितपट; जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत जिंकले सुवर्ण..

कमी अंतरामुळे खेळाडूंना बरे होण्यासाठी तसेच अराम मिळण्यासाठी वेळ मिळत नाही. खांद्याच्या दुखापतीमुळे स्टोक्स पाचव्या कसोटीमध्ये खेळताना दिसणार नाही. त्याच वेळी, भारतीय संघाचे अनेक गोलंदाज दुखापतींशी सामना करत आहेत.

स्टोक्स काय म्हणाला?

पाचव्या कसोटी सामन्यांपूर्वी इंग्लंडचा कर्णधार स्टोक्स म्हणाला की, “पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील सामन्यांमधील अंतर अधिक असणे चांगले असू शकले असते. दोन सामन्यांमध्ये आठ ते नऊ दिवसांचे आणि इतर दोन सामन्यांमध्ये तीन दिवसांचे अंतर आहे. एकूणच, पाच दिवसांचे अंतर राखले असते तर सातत्य राखणया जमले असते. दोन्ही संघांसाठी हे खूप कठीण झाले आहे. गोलंदाजांना खूप षटके टाकावी लागत असतात. एकदा आठ किंवा नऊ दिवसांचा ब्रेक येतो आणि नंतर एकदमच तीन दिवसांचा ब्रेक येतो. प्रत्येक सामन्यामध्ये चार किंवा पाच दिवसांचे अंतर असू शकले असते. ते चांगले झाले असते.

भारतीय कर्णधार काय म्हणाला?

भारतीय कर्णधार शुभमन गिल म्हणाला की, सर्व सामने पाच दिवस चालले आहेत, त्यामुळे खेळाडूंसाठी पुन्हा तयार व्हायला कठीण होऊन गेले. गिल म्हणाला “की मालिकेतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व सामने पाच दिवस चालले. फक्त पाच दिवसच नाही तर पाचव्या दिवसाच्या शेवटच्या सत्रापर्यंत ते सामने चालले. मला अशी कोणतीही मालिका आठवत नाही ज्यामध्ये सर्व चारही कसोटी सामने शेवटपर्यंत खेळले गेले असावेत. ते खूप कठीण होते.”

हेही वाचा : WCL 2025 : सेमीफायन सामन्यापूर्वी भारताचा मोठा निर्णय! WCL मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास दिला नकार; आता पुढे काय?

गिल पुढे म्हणाला की, जेव्हा दोन्ही संघ इतके कठीण क्रिकेट खेळत असतात तेव्हा तीन दिवसांचे अंतर खूप कमी होऊन जाते. आपण हे देखील समजून घेतले पाहिजे की प्रत्येक सामन्यानंतर पाच किंवा सहा दिवसांचा ब्रेक घेतल्याने दौरा खूप लांबला गेला असता. दोन्ही मंडळांकडून हा निर्णय विचारात घेतला गेला असावा.

Web Title: Ind vs eng gill stokes agree before oval test both complain about the gap between the two tests

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2025 | 09:24 PM

Topics:  

  • ben stokes
  • IND Vs END
  • Shubhman Gill

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.