IND Vs ENG: Will England be caught in the trap? Team India has planned a strong strategy in the Edgbaston Test; Watch Video
India vs England 2nd Test : भारताची २०२५ या वर्षातील इंग्लंड दौऱ्याची सुरुवात खूप खराब राहिली आहे. भारत इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. लीड्स येथे खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला इंग्लंडकडून ५ विकेट्सने पराभव पत्करावा लागला आहे. या सामन्यात इंग्लिश संघाने शानदार कामगिरी कर मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. त्याच वेळी, या सामन्यात टीम इंडियाच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणासह कमकुवत गोलंदाजीचा भारताला चांगलाच फटका बसला परिणामी भारताला पराभव स्वीकारावा लागला.
यानंतर, मालिकेतील दुसरा सामना २ जुलैपासून एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे खेळवला जाणार आहे. टीम इंडिया या सामन्यासाठी जोरदार तयारी करत अस्लयचे दिसत आहे. लीड्स कसोटीतील पराभव विसरून शुभमन आणि कंपनी एजबॅस्टन कसोटीत विजय मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. यासाठी टीम इंडियाने एक मास्टर प्लॅन देखील बनवला आहे. टीम इंडियाच्या या मास्टर प्लॅनबद्दल आपण माहिती घेऊया.
हेही वाचा : Restaurent Business : मोहम्मद सिराज आता बिझनेस पिचवर पकडणार वेग; हैदराबादमध्ये सुरू केले ‘हे’ रेस्टॉरंट..
𝗛𝗮𝗿𝗱𝘄𝗼𝗿𝗸 𝗡𝗲𝘃𝗲𝗿 𝗦𝘁𝗼𝗽𝘀! 👌
Bowlers day out with the bat in #TeamIndia nets 👍 👍#ENGvIND pic.twitter.com/gBaCRspa7R
— BCCI (@BCCI) July 1, 2025
पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या वरच्या फळीने उत्कृष्ट फलंदाजी केली होती. लीड्स कसोटीत टीम इंडियाच्या चार फलंदाजांकडून शतके ठोकण्यात आली. त्याच वेळी, टीम इंडियाच्या खालच्या फळीतील फलंदाजांनी मात्र खूप निराशा केली. एकंदरीत, दोन्ही डावात खालच्या फळीतील फलंदाज ५० धावा देखील करू शकले नव्हते. टीम इंडियाच्या पराभवाचे हे एक मुख्य कारण ठरले आहे.
टीम इंडियाने पहिल्या सामन्यात चुकांवर एजबॅस्टन कसोटीत उपाय शोधण्यात आला आहे. बर्मिंगहॅम कसोटीपूर्वी टीम इंडियाचे गोलंदाज नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसून आले आहेत. या दरम्यान, आकाश दीप, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांनी फलंदाजी केली आहे. बीसीसीआयने त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील पोस्ट केला आहे.
हेही वाचा : ‘ये बंधन तो..’, Yashasvi Jaiswal सोडणार नाही मुंबईची साथ; MCA ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
एजबॅस्टन सामन्यात खालच्या फळीतील फलंदाजांकडून टीम इंडियासाठी धावा करण्यात आल्या तर संघाला त्याचा निश्चितच फायदा होणार अनहे. त्याच वेळी, दुसऱ्या कसोटीतही शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्याकडून धावांची अपेक्षा असणार आहे. सर्वांच्या नजरा या सर्व खेळाडूंवर असणार आहेत. दुसरीकडे, टीम इंडियाला त्यांच्या क्षेत्ररक्षणाबद्दल देखील काळजी घ्यावी लागणार आहे.