Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs BAN: भारत-बांग्लादेश मालिकेला राजकीय ग्रहण; सीरीजला पुन्हा ब्रेक? शेख हसीना यांच्या वक्तव्याने BCBची चिंता वाढली

ind vs ban september odi series under political Tensions: भारत आणि बांगलादेश यांच्यात २०२४ मध्ये एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळवली जाणार होती, ज्यासाठी भारतीय संघ बांगलादेशचा दौरा करणार होता. परंतु, देशातील सध्याच्या परिस्थितीमुळे हा दौरा रद्द करण्यात आला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 09, 2026 | 01:19 PM
IND vs BAN: भारत-बांग्लादेश मालिकेला राजकीय ग्रहण; सीरीजला पुन्हा ब्रेक? शेख हसीना यांच्या वक्तव्याने BCBची चिंता वाढली
Follow Us
Follow Us:
  • भारत-बांग्लादेश मालिकेला राजकीय ग्रहण
  • सीरीजला पुन्हा ब्रेक?
  • शेख हसीनांच्या वक्तव्याने BCBची चिंता वाढली
गेल्या दोन वर्षात भारत आणि बांग्लादेश या दोन्ही देशांमधील राजकीय तणाव वाढला आहे. याचा परिणाम भारत-बांगलादेश क्रिकेट संबंधांवरही झाला आहे.यामुळेच भारतीय संघाचा बांग्लादेश दौरा दोन वर्षांपासून रखडला आहे. यावर्षी सप्टेंबरमध्ये हा दौरा आयोजित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु आता बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या पत्रकार परिषदेमुळे मालिकेचे भवितव्य पुन्हा धोक्यात आले आहे.

अश्मिता चलिहाचा धमाका! Korea Masters Super 300 च्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश

शेख हसीना यांच्या पत्रकार परिषदेमुळे प्रकरण चिघळले

माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेने हा वाद अधिकच वाढला आहे. ५ ऑगस्ट रोजी झालेल्या या पत्रकार परिषदेत हसीना यांनी डिसेंबरमध्ये आपल्या देशात परतण्याची घोषणा केली. मात्र, त्यानंतर बांगलादेश सरकारने दिलेल्या तीव्र प्रतिक्रियेमुळे हे प्रकरण अधिकच चिघळले. बांग्लादेशचे गृहमंत्री सलाहुद्दीन अहमद यांनी ८ ऑगस्ट रोजी भारतावर निशाणा साधत म्हटले की, जर शेख हसीना दिल्लीतून अशी वक्तव्ये करत असतील ज्यामुळे बांग्लादेशच्या लोकशाहीला धोका निर्माण होतो आणि देशात अस्थिरता निर्माण होते, तर भारत बांग्लादेशसोबत मैत्रीपूर्ण संबंधांची अपेक्षा करू शकत नाही.

तमीमच्या मोहिमेला यश येईल का?

फेब्रुवारीमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या विजयानंतर भारत-बांगलादेश क्रिकेट संबंध सुधारण्याच्या आशा वाढल्या होत्या. सध्याचे बीसीबी अध्यक्ष तमीम इक्बाल हे देखील भारताला यजमानपद मिळावे यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करत होते. बांग्लादेश बोर्डाचे अध्यक्ष तमीम इक्बाल ही मालिका आयोजित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यांनी अलीकडेच बांगलादेशच्या परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्र्यांची भेट घेतली आणि भारताला दौऱ्यासाठी राजी करण्याचे आवाहन सरकारला केले.

मालिकेवर टांगती तलवार?

भारतासारख्या मोठ्या क्रिकेट संघाचे यजमानपद भूषवणे हे कोणत्याही मंडळासाठी आर्थिक आणि व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत फायदेशीर मानले जाते. भारतीय संघाची जागतिक लोकप्रियता, ब्रँड व्हॅल्यू आणि सामन्यांना मिळणारा मोठा प्रेक्षकवर्ग यामुळे, जवळपास प्रत्येक क्रिकेट मंडळाला भारताच्या दौऱ्याचे आयोजन करण्याची इच्छा असते.

वृत्तानुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘अलीकडील घडामोडींनंतर मला मालिकेबद्दल शंका आहे. मालिकेसंदर्भातील परिस्थिती २८ ऑगस्टपर्यंत स्पष्ट व्हायला हवी होती आणि आता वेळ निघून जात आहे. मालिका नियोजित वेळेनुसार होईल यावर विश्वास नाही. आम्ही क्रिकेट बोर्डाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत, परंतु या क्षणी हे प्रकरण आमच्या हातात नाही.’

मात्र, जोपर्यंत ही मालिका अधिकृतपणे रद्द होत नाही, तोपर्यंत बीसीबीकडे आशा बाळगण्याशिवाय पर्याय नाही. परिणामी, भारत-बांग्लादेश क्रिकेट मालिकेचे भवितव्य आता दोन्ही देशांमधील राजकीय घडामोडींवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असल्याचे दिसते.

२०२४ पासून रखडला बांग्लादेश दौरा

२०२४ मध्ये भारतीय संघाचा बांग्लादेश दौरा नियोजित होता, जिथे दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळल्या जाणार होत्या. मात्र, त्याच वर्षी बांगलादेशात अशांतता पसरली, ज्यामुळे तत्कालीन पंतप्रधान हसीना यांना देश सोडून भारतात परतावे लागले. तेव्हापासून हसीना भारतात राहत आहेत, तर दुसरीकडे बांग्लादेशात भारतविरोधी भावना पसरली आहे. याचा परिणाम आयपीएल २०२६ पासून ते टी-२० विश्वचषक २०२६ पर्यंत जाणवला.

IND Vs SL: टीम इंडियाला Back to Back झटके! बुमराहनंतर ‘हा’ खेळाडूही टेस्ट सीरीजमधून बाहेर

Web Title: India bangladesh series sheikh hasina bcb political tension

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • IND VS BAN
  • ODI Series

संबंधित बातम्या

ODI क्रिकेटचा ‘सुवर्ण’ अध्याय! ‘या’ दोन देशांनी पटकावला ५,००० व्या वनडे सामन्याचा मान; ५५ वर्षांपूर्वी…
1

ODI क्रिकेटचा ‘सुवर्ण’ अध्याय! ‘या’ दोन देशांनी पटकावला ५,००० व्या वनडे सामन्याचा मान; ५५ वर्षांपूर्वी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.