Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताने वन डे सीरिज 2-1 ने जिंकली! विंडिजवर विक्रमी 200 धावांनी विजय; गिल, किशान व हार्दिक पंड्याची दमदार अर्धशतके

वेस्ट इंडिजचा संघ 151 धावांवर ऑल-आऊट झाला. लॉर्ड शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 4 तर मुकेश कुमारने 3 विकेट्स घेतल्या. टीम इंडियाने तब्बल 200 धावांनी अंतिम सामन्यामध्ये विजय मिळवत मालिका 2-1 ने खिशात घातली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Aug 02, 2023 | 06:53 AM
भारताने वन डे सीरिज 2-1 ने जिंकली! विंडिजवर विक्रमी 200 धावांनी विजय; गिल, किशान व हार्दिक पंड्याची दमदार अर्धशतके
Follow Us
Close
Follow Us:

त्रिनिदाद : भारताने वेस्ट वेस्ट इंडिज दौऱ्यात (India Vs West Indies) कसोटी (Test) मालिका जिंकल्यानतर आता एकदिवसीय मालिका देखील खिशात घातली आहे. (West Indies vs India 3rd ODI) काल झालेल्या शेवटचा व निर्णायक तिसरा सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर विक्रमी २०० धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्धची 2 सामन्यांची  कसोटी मालिका 1-0 ने जिंकली. त्यानंतर आता एकदिवसीय मालिका 2-1 अशी जिंकली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 351 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा डाव पत्त्याच्या डावासारखा गडगडला. वेस्ट इंडिजचा संघ 151 धावांवर ऑल-आऊट झाला. लॉर्ड शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 4 तर मुकेश कुमारने 3 विकेट्स घेतल्या. टीम इंडियाने तब्बल 200 धावांनी अंतिम सामन्यामध्ये विजय मिळवत मालिका 2-1 ने खिशात घातली आहे. पण भारताचे सतरा वर्षांपासूनचे मालिका विजयाचे स्वप्न अधुरेच राहिले. कारण वेस्ट इंडिजने यापूर्वी भारताविरुद्ध वनडे मालिका ही 06साली जिंकली होती. विश्वचषकापूर्वी भारताचा हा विजय महत्त्वाचा मानला जातोय. (India won the ODI series 2-1! record 200-run win over Windies; Powerful fifties by Gill, Kishan and Hardik Pandya)

भारताचा धावांचा डोंगर

दरम्यान, भारताने प्रथम फलंदाजी करताना 351 धावांचा डोंगर उभारला. सलामी फलंदाज ईशान किशन आणि शुभमन गिल यांनी भारताला दमदार सुरुवात करुन दिली. ईशान किशन याने वादळी अर्धशतक झळकावले. ईशान किशन याने 64 चेंडूमध्ये 77 धावांची खेळी केली. ईशान किशन आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 143 धावांची भागिदारी करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. शुभमन गिल याने 85 धावा केल्या, तर कर्णधार हार्दिक पंड्या नाबाद 70 धावा या तिघांनी दमदार अर्धशतके केलीत. ऋतुराज गायकवाड अवघ्या आठ धावांवर बाद झाला. संजू सॅमसन याने 41 चेंडूत 51 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये संजू सॅमसन याने चार षटकार आणि दोन चौकार ठोकले. या सर्वांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 352 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र वेस्ट इंडिजचा संघ 151 धावांवर ऑल-आऊट झाला.

शार्दुलच्य 4 विकेट, भारताचा विक्रमी विजय

352 धावांचं आव्हान घेऊन उतरलेल्या वेस्ट विडिंज संघाची सुरुवात खराब झाली. युवा खेळाडू मुकेोस कुमार याने सलामीच्या दोन्ही फलंडदाजांना माघारी लावलं. कायल मेयर्स4 धावा, ब्रँडन किंग भोपळाही फोडू दिला नाही. सुरूवातचे  आणि मधल्या शिप्टमधील फलंदाज लवकर बाद झाले. त्यानंतर मात्र शेपडटीने भारतीय गोलंदाजांना घाम फोडला.  ठाकूर आणि कुलदीपने तळाच्या फलंदाजांना माघारी पाठवत संघाच्या विजयावर शिक्कामोक्तब केलं. हळूहळू वेस्ट इंडिजचा संघ 151 धावांवर ऑल-आऊट झाला. लॉर्ड शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 4 तर मुकेश कुमारने 3 विकेट्स घेतल्या. टीम इंडियाने तब्बल 200 धावांनी अंतिम सामन्यामध्ये विजय मिळवत मालिका 2-1 ने खिशात घातली आहे. विश्वचषकापूर्वी भारताचा हा विजय महत्त्वाचा मानला जातोय.

Web Title: India won the odi series two one record two hundred runs win over west windies powerful fifties by gill kishan and hardik pandya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2023 | 06:53 AM

Topics:  

  • 3rd ODI
  • india
  • West Indies

संबंधित बातम्या

US visa cancellation: ट्रम्प सरकारचा मोठा झटका! 1 लाखांहून अधिक व्हिसा केले रद्द
1

US visa cancellation: ट्रम्प सरकारचा मोठा झटका! 1 लाखांहून अधिक व्हिसा केले रद्द

India-Germany Trade: जर्मनीशी करार उघडेल युरोपचा दरवाजा? भारताची मोठी आर्थिक रणनीती
2

India-Germany Trade: जर्मनीशी करार उघडेल युरोपचा दरवाजा? भारताची मोठी आर्थिक रणनीती

Modi-Trump: ‘भारतासारखं दुसरं कोणीच नाही…’ संपूर्ण जगाला युद्धात ओढून ट्रम्पचे सहकारी का गात आहेत PM मोदींच्या मैत्रीचे गोडवे?
3

Modi-Trump: ‘भारतासारखं दुसरं कोणीच नाही…’ संपूर्ण जगाला युद्धात ओढून ट्रम्पचे सहकारी का गात आहेत PM मोदींच्या मैत्रीचे गोडवे?

Indian Sugar Industry Crisis: साखर उद्योग संकटात! साखर आणि इथेनॉल दर न वाढल्यामुळे शेतकऱ्यांची बिले ठप्प
4

Indian Sugar Industry Crisis: साखर उद्योग संकटात! साखर आणि इथेनॉल दर न वाढल्यामुळे शेतकऱ्यांची बिले ठप्प

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.