
जागतिक युद्धाच्या सावटाखाली भारताचा मोठा निर्णय! (Photo Credit- X)
मिळालेल्या माहितीनुसार, संरक्षण खरेदी मंडळाने (DAC) सोमवारी भारतीय वायुसेनेच्या या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. आता हा प्रस्ताव ‘कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी’कडे (CCS) पाठवला जाईल, जिथे त्याला अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पाच नवीन प्रणाली थेट खरेदी केल्या जातील. विशेष म्हणजे, या प्रणालीची देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉलची जबाबदारी भारतीय खाजगी कंपन्यांकडे सोपवली जाऊ शकते, ज्यामुळे ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेला बळ मिळेल.
जगातील सर्वात प्रगत हवाई संरक्षण प्रणालींपैकी एक असलेल्या S-400 ला भारतात ‘सुदर्शन चक्र’ म्हणून ओळखले जाते. याची ताकद शत्रूसाठी कर्दनकाळ ठरणारी आहे:
Iran–Israel Conflict: ऊर्जा, विमान वाहतूक ते फार्मा; ३० हून अधिक भारतीय कंपन्या धोक्यात
नुकत्याच झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान S-400 ने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. या प्रणालीमुळे पाकिस्तानी वायुसेनेला सिंधू नदीच्या पलीकडे उड्डाण करणे कठीण झाले होते. अनेक पाकिस्तानी लढाऊ विमाने आणि इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मला याद्वारे रोखण्यात आले. १० मे रोजी भारताच्या ब्राह्मोस क्षेपणास्त्र हल्ल्याने पाकिस्तानचे चकलाला एअरबेस आणि रावलपिंडीचे कमांड सेंटर उद्ध्वस्त केले होते, त्यानंतर पाकिस्तानने शांततेची मागणी केली होती. या संपूर्ण मोहिमेत S-400 भारताचे अभेद्य कवच ठरले.
सध्या भारताकडे S-400 च्या ३ स्क्वाड्रन तैनात आहेत. २०१८ मध्ये झालेल्या मूळ करारानुसार, उर्वरित २ स्क्वाड्रन या वर्षाच्या अखेरीस भारताला मिळण्याची शक्यता आहे. नव्या करारामुळे भारताकडे एकूण १० स्क्वाड्रन उपलब्ध होतील. यामुळे लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या पूर्व आणि पश्चिम सीमांवरील भारताची पकड अधिक घट्ट होईल.
Iran–Israel Conflict: आशियाई शेअर बाजारात ‘भूकंप’; KOSPI, Nikkei, TAIEX मध्ये मोठी घसरण