IND VS PAK: 'For the green flag...', Pakistani fans get angry with the players after suffering an embarrassing defeat to India; Watch the video
Asia cup 2025 : आशिया कपमध्ये(Asia cup 2025) बहुचर्चित असलेला भारत-पाकिस्तान सामना काल पार पडला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात भारताकडून पराभव पत्करावा लागल्याने पाकिस्तानी चाहत्यांचा चांगलाच संताप झाल्याचे दिसून आले. रविवारी दुबईमध्ये झालेल्या सामन्यात भारतामे पाकिस्तानला एकतर्फी पराभूत केले. या पराभवासोबत पाकिस्तानी संघाच्या चाहत्यांनी आपल्याच संघाबद्दल भडका उडाला आहे.
या पराभवानंतर पाकिस्तानी चाहते स्टेडियमबाहेर आणि सोशल मीडियावर पाकिस्तानी संघावर तोंडसुख घेताना दिसून येत आहेत. संघावर टीका करत आहेत. त्यांचे विविध प्रतिक्रिया असलेले व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.ज्यामध्ये ते संघाच्या कामगिरीला ‘निरुपयोगी’ आणि स्वतःला ‘अपमानित’ झाल्याचे म्हणत आहेत. हा पराभव फक्त एका सामन्याचा नसून तो वर्षानुवर्षे तुटलेल्या आशांची कहाणी सांगणारा आहे.
पाकिस्तानी चाहते संघाच्या रणनीतीवर आणि खेळाडूंच्या खेळण्याच्या क्षमतेवर भडकले आहेत. एका संतप्त चाहत्याने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “भारत हा जगातील सर्वोत्तम संघ असून आशिया कपमध्ये त्यांनी या मुलांसोबत खेळू नये. ही एक छोटी टीम आहे.” तर दुसरा चाहता नाराजी व्यक्त करत म्हटला की, “मी एक देखील सामना बघायचा राहत नाही. मी येथे अपमानित होण्यासाठी का येत असतो? मी येथे या हिरव्या झेंड्यासाठी येथे येत असतो. तुम्ही आम्हाला नेहमी अपमानित करता, या संघाला बंद करा.”
इंडिया को इन बच्चों के साथ खेलने ही नहीं चाहिए’-भारत से हार के बाद मायूस दिखे पाकिस्तान के फैन#IndVsPak #AsiaCup #IndiaVsPakistan #HindiNews #latestNews #Vipculture pic.twitter.com/ut4QE53M2d
— Apka Aashish (@ApkaAashish) September 15, 2025
भारत-पाकिस्तान सामन्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांची नाराजी व्यक्त होताना दिसून येत आहे. प्रचंड पैसे खर्च करून सामना पाहण्यासाठी आलेला एक चाहता म्हणतो की, “संपूर्ण सामना हा एकतर्फीच होता. अजिबात उत्साह दिसून आला नव्हता. जर सामना कुठेतरी टाईट झाला असता तर आम्ही तो चांगला सामना झाला असे म्हणू शकलो असतो. पण भारत खूप चांगला खेळला आहे.” अजून एका चाहत्याने म्हटले आहे की, ” माझे मन दुखावले. आम्ही आता पाकिस्तानचा कोणताही सामना पाहण्यासाठी येणार नाही.” तसेच एक चाहता म्हटला की, “टीम इंडिया, कृपया पुढचा सामना खेळू नका. कृपया आमच्यावर बहिष्कार घाला. आम्ही स्वतःहून अंतिम फेरीत पोहोचू शकत नसल्याने कृपया आम्हाला मदत करा.”
Oman, UAE se hi jeetoge kya? 🤦♂️ Insaan ke bachhe bano!’ – Viral Pak Fan after Pakistan’s Loss 😂🔥 #INDvsPAK #AsiaCup2025 #SalmanAliAgha
Reports @lakshit1601 from Dubai pic.twitter.com/tt65m0xp1h— Sports Yaari (@YaariSports) September 15, 2025
या सामन्यात पाकिस्तानचा संघ कुठेही भारताविरुद्ध लढताना दिसला नाही. यामुळे साहजिकच पाकिस्तानी खेळाडूंचा संताप होणे साहजिक आहे. प्रथम फलंदाजी करताना संपूर्ण संघ फक्त १२७ धावाच करू शकला.कुलदीप यादवने शानदार कामगिरी करत त्याने ३ विकेट्स घेतल्या तर, जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांनी २-२ विकेट्स घेत पाकिस्तानी संघाला चांगलेच अडचणीत आणले. प्रतिउत्तरात भारतीय संघाने १६ व्या षटकात सूर्यकुमार यादवच्या नाबाद ४७ धावांच्या जोरावर अगदी सहज साध्य केला.