Ravichandran Ashwin's troubles increase! Madurai Panthers made 'this' serious allegation, there is a strong possibility of a ban...
Ravichandran Ashwin’s troubles increase : रविचंद्रन अश्विनच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे गेल्या अनेक दिवसांपासून तो अनेक वादांमुळे चर्चेत आला आहे. या भागात, तामिळनाडू प्रीमियर लीग २०२५ मध्ये एक नवीन वाद उभा राहीला आहे. या दरम्यान, सीकेम मदुराई पँथर्सकडून रविचंद्रन अश्विनच्या नेतृत्वाखालील संघ डिंडीगुल ड्रॅगन्सवर चेंडूशी छेडछाड करण्याचा आरोप करण्यात आला आहे.
हे प्रकरण १४ जून रोजी सेलम क्रिकेट फाउंडेशन ग्राउंडवर खेळवण्यात आलेल्या सामन्याशी संबंधित असल्याची माहिती आहे. या सामन्यात पँथर्सचा ड्रॅगन्सने ९ विकेट्सने पराभव केला होता. तथापि, मदुराई पँथर्सने केलेल्या आरोपांसाठी ठोस पुरावे मंगवण्यात आले आहेत. कारण, आतापर्यंत या संपूर्ण प्रकरणाचा पाया केवळ अनुमानांपुरवर मर्यादित राहीला आहे.
हेही वाचा : भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू एकत्र खेळणार; काउंटी क्रिकेटसोबत ‘हा’ भारतीय खेळाडू झाला करारबद्ध..
पँथर्सकडून एक मोठा दावा करण्यात आला आहे की, सामन्यादरम्यान ड्रॅगन्सने रसायने असलेले टॉवेल वापरले जेणेकरून ते चेंडूची सध्याची स्थिती खराब करण्यात मदत करतील. पँथर्सचे सीईओ महेश एस यांनी टीएनपीएलच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून या सर्व टॉवेलच्या स्रोताची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्याच वेळी, टीएनपीएलकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, पँथर्स ज्या टॉवेलबद्दल बोलत आहेत ते तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने पुरवले होते आणि तेच टॉवेल दोन्ही संघांना देण्यात आले होते. अशी माहिती दिली.
या मुद्द्यावर, टीएनपीएलचे मुख्य अधिकारी प्रसन्न कन्नन यांच्याकडून यांनी पँथर्सना एक ईमेल पाठवण्यात आला आहे. या ईमेलमध्ये लिहिण्याताळे आहे की, हे आरोप सामना संपल्यानंतर केले होते. अशा परिस्थितीत, हे पुराव्याशिवायचे काढलेले हे अनुमान वाटतात. तो पुढे म्हणाला की, पंच आणि गेम कंट्रोल टीमने संपूर्ण सामन्यादरम्यान चेंडूवर बारीक लक्ष ठेवले होते.
हेही वाचा : 2023-25 च्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे ५ फलंदाज कोणते? भारताच्या एकमेव फलंदाजाने राखली लाज
सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास तर, मदुराई पँथर्सने प्रथम फलंदाजी केली. या दरम्यान त्यांनी २० षटकांत ८ गडी गमावून १५० धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ड्रॅगन्सचा कर्णधार आर. अश्विनने २९ चेंडूत ४९ धावांची स्फोटक खेळी केली. ज्यामुळे त्यांच्या संघाने १२.३ षटकांत १५० धावा सहज पूर्ण केल्या. त्याच वेळी, आर. अश्विन गोलंदाजी दरम्यान मात्र विकेट घेण्यास अपयशी ठरला आहे.