Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vaibhav Sooryavanshi: ‘त्याला संधी मिळेपर्यंत उशीर होईल…’, गंभीर आणि श्रेयसच्या निर्णयावर सुनील गावस्करचा राग अनावर,

भारतीय संघाच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये वैभव सूर्यवंशीला स्थान न दिल्याबद्दल सुनील गावस्कर यांनी एक मोठे विधान केले आहे. श्रेयस अय्यर आणि गौतम गंभीरच्या या निर्णयाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 02, 2026 | 01:50 PM
सुनील गावस्कर यांचे वैभव सूर्यवंशीबाबत मोठे विधान (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

सुनील गावस्कर यांचे वैभव सूर्यवंशीबाबत मोठे विधान (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • वैभव सूर्यवंशी सध्या भारतीय टीमसह इंग्लंडच्या दौऱ्यावर 
  • पहिल्या सामन्यात बेंचवर बसवून ठेवल्यामुळे दिग्गजांचा राग अनावर 
  • वैभवला का खेळवले नाही असा सगळीकडून प्रश्नांचा भडीमार 
वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळत नाहीये. कर्णधार श्रेयस अय्यर आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याकडून त्याला भारतीय क्रिकेट संघात आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी दिली जात नाहीये. आयर्लंड मालिकेमध्ये बेंचवर बसून इतर सहकाऱ्यांना पाणी दिल्यानंतर, वैभव सूर्यवंशीच्या चाहत्यांना आणि भारतीय क्रिकेट तज्ज्ञांना वाटले होते की, इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात त्याला संधी दिली जाईल. पण तसे झाले नाही आणि बुधवार, १ जुलै रोजी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी वैभव सूर्यवंशीचा अंतिम ११ खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला नाही.

याचसंदर्भात आता माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी यावर एक मोठे विधान केले आहे. सोनी स्पोर्ट्स नेटवर्कशी बोलताना गावस्कर म्हणाले की, वैभव सूर्यवंशीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला होणारा विलंब संघावर अधिक दबाव टाकेल. त्यांनी कर्णधार श्रेयस अय्यर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याशिवाय आपला रागही त्यांनी व्यक्त केला.

वैभव सूर्यवंशीबद्दल सुनील गावस्कर यांचे मोठे विधान

🚨 Sunil Gavaskar angry at Shreyas Iyer & Gautam Gambhir 🚨 🗣️I don’t understand why coach Gautam Gambhir and Shreyas Iyer don’t want to give Vaibhav Suryavanshi a chance. Vaibhav was one of the top performers in the IPL, scoring plenty of runs and hitting the most sixes in a… pic.twitter.com/mS3LGLG1mS — Central Cricket (@arshdeep3444) July 1, 2026

सुनील गावस्कर म्हणाले, “जेव्हा कधी वैभवला संधी मिळेल, तेव्हा या विलंबामुळे त्याच्यावर अधिक दबाव येईल. १५ वर्षांचे असताना तुम्ही दबावाचा फारसा विचार करत नाही. त्याला माहीत आहे की जर त्यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात संधी मिळाली, तर त्याला तसेही चांगली कामगिरी करावी लागेल. पण तो संघात असल्यामुळे आनंदी आहे. भारतीय संघ उत्कृष्ट खेळाडूंनी भरलेला आहे, ज्यांच्याकडून वैभव बरेच काही शिकू शकतो.”

“मला समजत नाही की प्रशिक्षक गौतम गंभीर आणि श्रेयस अय्यर वैभव सूर्यवंशीला संधी का देऊ इच्छित नाहीत,” असेही ते पुढे म्हणाले. वैभव IPL मधील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी एक होता, त्याने एका हंगामात भरपूर धावा केल्या आणि सर्वाधिक षटकार मारले. अंतिम ११ मध्ये स्थान मिळवण्यासाठी वैभवला आणखी काय करण्याची गरज आहे? माझ्या मते, इंग्लंड मालिकेच्या पहिल्या सामन्यापासूनच तो संघात असायला हवा होता.”

‘… अन् त्याला बेंचवर बसवले आहे’; Vaibhav Sooryavanshi वरून रवी शास्त्रींचा टीम इंडियाला घरचा आहेर

श्रेयस अय्यर होतोय ट्रोल 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत श्रेयस वैभव सूर्यवंशीबद्दल अय्यर म्हणाला होता की, ‘केवळ एकाच खेळाडूने (वैभव सूर्यवंशी) चांगली कामगिरी केली आहे असे नाही. इतर खेळाडूही चांगले खेळले आहेत. खेळाडूंना सुरक्षितता आणि आत्मविश्वास देण्यासाठी त्यांना पाठिंबा देणे महत्त्वाचे आहे. तो संघाचा मुख्य खेळाडू आहे आणि विश्वचषक विजेत्या संघाचा भाग राहिला आहे, त्यामुळे त्याला पाठिंबा देणे महत्त्वाचे आहे,’ असे पत्रकार परिषदेत अय्यर म्हणाला होता.

इंग्लंडचा भारताविरुद्धचा पहिला टी-२० सामना अनिर्णित राहिला

१ जुलै रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अभिषेक शर्माच्या ५९, श्रेयस अय्यरच्या ६८ आणि शिवम दुबेच्या ४२ धावांच्या जोरावर टीम इंडियाने २० षटकांत ७ गडी गमावून १८९ धावा केल्या. या सामन्यात इंग्लंडला फलंदाजीची संधी मिळाली नाही आणि पावसामुळे सामना अनिर्णित घोषित करण्यात आला.

बिचाऱ्याला आता तरी खेळवा रे! कधी होणार IND Vs ENG 2 रा सामना? Vaibhav Sooryavanshi ला संधी देणार?

Web Title: Sunil gavaskar not happy with shreyas iyer decision about no including vaibhav sooryavanshi in playing 11 in india vs england 1st match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 01:13 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • Sunil Gavaskar
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

Vaibhav Sooryavanshi: फक्त २ सिक्स आणि वैभव सूर्यवंशीचा होणार महारेकॉर्ड, अफगाणिस्तानविरूद्ध कहर!
1

Vaibhav Sooryavanshi: फक्त २ सिक्स आणि वैभव सूर्यवंशीचा होणार महारेकॉर्ड, अफगाणिस्तानविरूद्ध कहर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.