दुसरा सामना ५ जानेवारी रोजी खेळला गेला. या सामन्यात भारताने शानदार कामगिरी केली आणि विजय मिळवला. वैभव सूर्यवंशीने धमाकेदार अर्धशतक झळकावून भारताला सामना जिंकण्यास मदत केली.
Vaibhav Suryavanshi News: भारतीय युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या युथ वनडे सामन्यात अवघ्या १९ चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याने २४ चेंडूत ६८ धावांची ऐतिहासिक खेळी केली.
भारताच्या संघाने या मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे संघ मालिका जिंकण्यापासून फक्त 1 विजय दुर आहे. आता, भारतीय संघ दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. तर, दुसरा सामना कधी आणि…
वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्वाखालील भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाने पहिल्या युवा एकदिवसीय सामन्यात डकवर्थ-लुईस पद्धतीने दक्षिण आफ्रिकेचा २५ धावांनी पराभव केला. भारताला १-० अशी आघाडी मिळाली.
वर्षाच्या सुरुवातीला वैभव सूर्यवंशी खेळताना दिसणार आहे. शिवाय, तो भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. चला तर मग जाणून घेऊया हा सामना कधी आणि कुठे खेळला जाईल, या सामन्यांची सविस्तर माहिती…
निवड समितीने ३ जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी वैभव सूर्यवंशीची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. आयुष विश्वचषकात भारताच्या १९ वर्षांखालील संघाचे नेतृत्व करेल.
वैभव सूर्यवंशीच्या मैदानावरील त्याच्या उल्लेखनीय यशामुळे त्याला भारत सरकारने मान्यता दिली आहे. वैभव सूर्यवंशी यांना देशातील सर्वोच्च बाल पुरस्कार, पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
बिहारकडून १९० धावांची धमाकेदार खेळी करत अरुणाचल प्रदेशच्या गोलंदाजांना त्रास दिला. २६ डिसेंबर रोजी मणिपूरविरुद्ध त्याला खेळताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते, परंतु तो त्या सामन्याचा भाग नाही.
काँग्रेस खासदार शशी थरूर हे देखील वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीने प्रभावित झाले. सूर्यवंशीच्या आक्रमक फलंदाजीमुळे बिहारने ६ बाद ५७४ धावा केल्या, जो विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या आहे.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये वैभव सूर्यवंशीने अरुणाचल प्रदेशविरुद्ध फक्त ८४ चेंडूत १९०धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारा दुसरा भारतीय फलंदाज म्हणून मान देखील पटकावला…
१९ वर्षांखालील विश्वचषकातील दारुण पराभवानंतर बीसीसीआय भारताच्या कामगिरीचा आढावा घेण्याचा विचार करत आहे. ज्यामध्ये स्पर्धेत ज्युनियर संघाच्या कामगिरीवर चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. वैभव सूर्यवंशी हा बाद झाल्यानंतर वैभव आणि पाकिस्तानी गोलंदाज अली रझा यांच्यात जोरदार वाद झाला. रझाच्या आक्रमक सेलिब्रेशनमुळे वैभव अस्वस्थ झाला.
भारत आणि पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानच्या संघाने पहिले फलंदाजी करुन 8 विकेट्स गमावून 50 ओव्हरमध्ये 347 धावा केल्या आहेत. समीर मिनहासने पाकिस्तानकडून शानदार शतकी खेळी केली. त्याने भारतीय गोलंदाजांना खंबीरपणे उभे ठेवले.
भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर 19 संघाचा आशिया कप फायनलच्या सामन्याचे नाणेफेक पार पडले. या सामन्यामध्ये भारताचा कर्णधार आयुष म्हात्रे याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आता, अंतिम सामन्यातही टीम इंडियाच्या युवा खेळाडूंकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असेल. अंतिम सामन्यासारख्या मोठ्या सामन्यासाठी सर्वांचे लक्ष भारताच्या प्लेइंग ११ वर आहे.
एसीसी पुरुष अंडर-१९ आशिया कप २०२५ चा अंतिम सामना रविवारी भारतीय अंडर-१९ क्रिकेट संघ आणि पाकिस्तान अंडर-१९ क्रिकेट संघ यांच्यात खेळला जाईल. अंतिम सामना दुबईतील आयसीसी अकादमी मैदानावर खेळवला जाईल.…
२०२५ मध्ये होणाऱ्या एसीसी पुरुष अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम फेरीत भारतीय अंडर-१९ क्रिकेट संघाचा सामना पाकिस्तान अंडर-१९ क्रिकेट संघाशी होईल. या स्पर्धेत भारतीय संघाची विजयी घोडदौड सुरूच आहे.
भारतीय क्रिकेट संघ शुक्रवारी दुबई येथे होणाऱ्या १९ वर्षांखालील आशिया कपच्या पहिल्या उपांत्य सामन्यात श्रीलंकेचा सामना करेल. म्हात्रेच्या संघाचे लक्ष्य अंतिम फेरीत पोहोचण्याचे असेल सामना कधी-कुठे पाहता येणार सविस्तर वाचा.
संघाने चांगली कामगिरी केली आहे पण या तीनही सामन्यामध्ये आयुष म्हात्रे हा फार काही धावा करु शकला नाही. या सामन्यामध्ये भारताचा युवा खेळाडू अभिज्ञान कुंडू याने द्विशतक झळकावले आहे.
कर्णधार आयुष म्हात्रेच्या स्वस्त बाद झाल्यानंतर, वैभवने भारतीय संघाला सावरले आणि स्पर्धेतील त्याचे दुसरे अर्धशतक झळकावले. या युवा डावखुऱ्या फलंदाजाने यापूर्वी यूएईविरुद्ध ९५ चेंडूत १७१ धावा केल्या होत्या.