
सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाला चांगले यश मिळाले नाही. कोलंबो येथे सुरू असलेल्या सराव सामन्यात श्रीलंकेच्या सलामीच्या फलंदाजांनी गोलंदाजांची परीक्षा घेतली. श्रीलंकेने पहिले अनेक ओव्हर्समध्ये भारताला एकही विकेट प्राप्त करू दिली नाही. श्रीलंकेकडून रविंदू रसंथाने शानदार अर्धशतक लगावले.
टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने जोरदार सुरुवात केली. सलामीवीर निशान फरनांडोने आक्रमक फलंदाजी करत 65 बॉलमध्ये 66 रन्सची खेळी केली. त्याने त्याच्या खेळीमध्ये 11 फोर आणि 1 सिक्स मारला. दुसऱ्या बाजूला रविंदू रसंथाने त्याला चांगली साथ दिली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 20 ओव्हर्समध्ये 110 रन्सची भागीदारी केली. या दरम्यान भारताचे गोलंदाज एकही विकेट घेऊ शकले नाहीत. ही भागीदारी रनआउटच्या माध्यमातून तुटल्याचे पहायला मिळाले.
IND Vs SL: परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन! ‘तीच चूक पुन्हा पुन्हा…’; Team India ची ढिसाळ फिल्डिंग कायम
मोहम्मद सिराजने आपल्या पहिल्या 5 ओव्हर्समध्ये 14 रन्स दिले. तर प्रसिद्ध कृष्णाने 5 ओव्हर्समध्ये 27 रन्स दिले. रवींद्र जाडेजा देखील पहिल्या स्पेलमध्ये एकही विकेट घेऊ शकला नाही. गूरनूर ब्रार देखील फलंदाजांवर दबाव टाकू शकला नाही. टेस्ट सिरिज सुरू होण्याआधीच भारतीय गोलंदाजांचे हे प्रदर्शन टीम मॅनेजमेंटसाठी चिंतेचा विषय बनला आहे. आता पुढील दोन दिवसांत भारतीय गोलंदाज कसे प्रदर्शन करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
IND vs SL: अरे देवा! शुभमन गिलला दुखापत, भारतीय टीमचा कर्णधार बदलला; सराव सामन्यातून बाहेर
21 व्या ओव्हर्समध्ये एक रन घेण्याच्या नादात श्रीलंकेने पहिली विकेट गमावली. यावेळी देखील यशस्वी जयस्वालने चुकीच्या दिशेने थ्रो केला. मात्र मानव सुथारने वेगवान हालचाली करत तो बॉल विकेटकिपर ऋषभ पंतकडे फेकला आणि श्रीलंकेचा पहिला फलंदाज रन आउट झाला.अशाप्रकारे भारताला पहिली विकेट मिळाली. कुलदीप यादवच्या एका बॉलवर विकेट संधी केएल राहुलने कॅच सोडल्यामुळे भारताने गमावली.