Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 LSG vs RCB : ‘हे कर्णधाराचे काम नव्हे..’, Rishabh Pant च्या ‘त्या’ निर्णयावर आर अश्विनचा संताप! Digvesh Rathi ची केली पाठराखण.. 

आयपीएलमध्ये २७ मे रोजी लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवण्यात आला. यामध्ये दिग्वेश राठीने नॉन-स्ट्रायकरवर जितेशला बादला केले होते, ज्यावर माजी फिरकीपटू आर अश्विनने ऋषभ पंतला फटकारले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 29, 2025 | 02:50 PM
LSG vs RCB: 'This is not the captain's job..', R Ashwin's anger over Rishabh Pant's 'that' decision! Digvesh Rathi's support..

LSG vs RCB: 'This is not the captain's job..', R Ashwin's anger over Rishabh Pant's 'that' decision! Digvesh Rathi's support..

Follow Us
Close
Follow Us:

 LSG vs RCB : २७ मे रोजी लीग स्टेजचा शेवटचा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला होता. जिथे जितेश शर्माने एक शानदार खेळी करत आरसीबीला विजय मिळवून दिला होता. पण, या सामन्यात चर्चा झाली ती म्हणजे दिग्वेश राठीने नॉन-स्ट्रायकरवर जितेशला बाद करणे हा होता, ज्यावर माजी फिरकीपटू आर अश्विनने ऋषभ पंतला फटकारले आहे.

आरसीबीविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात लखनौने चांगली कामगिरी करत २२७ धावा उभारल्या होत्या.  परंतु जेव्हा या लक्ष्याचा बचाव करण्याची वेळ आली तेव्हा मात्र लखनौच्या गोलंदाजांची कामगिरी सुमार दर्जाची झालेली दिसून आली.  सामना एकतर्फी  जिंकणारी खेळी करणाऱ्या जितेश शर्माला बाद करण्यासाठी दिग्वेश राठीने जमतील ते प्रयत्न केले. त्यात तो यशस्वी देखील झाला होता, परंतु, अनेकांना ऋषभ पंतच्या उदरतेने घोळ झाला. तेची उदारता काहींना आवडली नाही. ज्यामध्ये आर अश्विनचाही देखील समावेश आहे.

हेही वाचा : PBKS vs RCB : IPL चा क्वालिफायर 1 सामना रद्द झाल्यास पुढे काय? अंतिम फेरीत कुणाची लागणार वर्णी? वाचा सविस्तर..

खरंतर, गेल्या सामन्यात दिग्वेश राठीकडून जितेश शर्माला मांकडिंगच्या मदतीने बाद करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अपील करण्यात आले, त्यानंतर निर्णय तिसऱ्या पंचाकडे गेला. तथापि, तो बाद झाला नाही, परंतु यादरम्यान लखनौचा कर्णधार ऋषभ पंतने ते अपील मागे घेतली. यावर अश्विनने आपली प्रतिक्रिया दिली. पंतच्या निर्णयावर टीका केली आहे. अश्विनने यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले आहे की, ‘जर जितेश शर्मा गोलंदाजीच्या हालचालीत येण्यापूर्वी क्रिजच्या बाहेर असता तर त्याला बाद देण्यात आले असते. जेव्हा गोलंदाजाने अपील केले तेव्हा अंपायरकडून विचारण्यात आले, त्याला अपील करायचे आहे का आणि त्याने हो म्हटले, तेव्हा निर्णय तिसऱ्या पंचाकडे पोहचला. जेव्हा दिग्वेश फ्रंटफूटवर उतरला तेव्हा जितेश क्रीजवर होता. म्हणून त्याला बाद देता आले नाही. इथपर्यंत सर्व काही ठीक दिसत होते.

आश्विन पुढे म्हणाला, ‘पण यानंतर एक कथा तयार झाली, समालोचक म्हणत आहेत की,  जितेश शर्माने ऋषभ पंतला मिठी मारली, अपील मागे घेऊन पंतने किती चांगला निर्णय घेतला असे बोलण्यात आले आहे. आपल्या गोलंदाजाला सर्वांसमोर लहान वाटू देणे, कर्णधाराचे काम नाही. त्याने हे अपील मागे घेण्यापूर्वीच निर्णय घ्यायला पाहिजे होता.’

अश्विननेही त्याचा एक किस्सा शेयर केला. तो म्हणाला की, ‘माझ्या आणि जोस बटलरसोबत घडलेल्या घटनेप्रमाणे, पुढच्या वर्षी मी दिल्ली कॅपिटल्सच्या संघात गेलो. रिकी पॉन्टिंगने मला येऊन सांगितले की आम्हाला आमच्या संघामध्ये नॉन-स्ट्रायकरला अशा प्रकारे धावबाद करू नये असा विचार आहे आणि तुम्हीही ते पाळायला हवे. म्हणून मी म्हणालो ठीक आहे. जर हा तुमचा नियम असेल तर मी ते करणार नाही. ‘

हेही वाचा : PBKS vs RCB : आज अय्यरसेना आणि पाटीदारसेनेते महामुकाबला! अशी असेल, दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग-११

अश्विन पुढे म्हणाला की, “तुमच्या गोलंदाजाला लहान का वाटू द्यावे? अशा प्रकाराने गोलंदाजाला खूप लहान वाटेल. तो पुन्हा असे कधीही करणार नाही आणि लोक असे देखील म्हणणार की, करू नये. हे का करू नये? यामुळे गोलंदाजाच्या मनात कायमची भीती बसून जाईल.   पण गोलंदाजाची कोणी देखील पर्वा करत नाही, म्हणून त्याचे अपील मागे घेण्यात येऊ शकते.” असे आश्विन म्हणाला.

Web Title: This is not the captains job ashwins anger over rishabh pants decision backed digvesh rathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2025 | 02:50 PM

Topics:  

  • Digvesh Rathi
  • LSG vs RCB
  • R Ashwin
  • Rishabh Pant

संबंधित बातम्या

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सामना गमावल्यानंतर आर अश्विन सुर्या – गंभीरवर संतापला! निर्णयांवर केले प्रश्न उपस्थित
1

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सामना गमावल्यानंतर आर अश्विन सुर्या – गंभीरवर संतापला! निर्णयांवर केले प्रश्न उपस्थित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.