
WCL 2025: What are the options if the India-Pakistan match is cancelled? Find out who will be affected?
यापूर्वीच, लीग स्टेज सामन्यात भारत-पाकिस्तान संघ आमनेसामने येणार होते.परंतु, वादामुळे तो रद्द करण्यात आला होता. अशा परिस्थितीत, लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला हे की जर हा सामना देखील रद्द झाला तर यामध्ये कोणाला फायदा होईल? याबद्दल आपण जाणून घेऊया.
लीग टप्प्यामध्ये भारतीय खेळाडूंकडून अचानक आपली नावे मागे घेण्यात अली होती. त्यानंतर इंडिया चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यातील होऊ शकला नाही. त्याला रद्द करण्यात आला होता.. आता जर सेमीफायनल दरम्यान देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली, तर सध्या पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर असलेला पाकिस्तान संघाला फायदा होऊन तो संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करण्याची शक्यता जास्त आहे.
तर टीम इंडियाचा या स्पर्धेतील प्रवास त्याच टप्प्यावर संपुष्टात येईल. जो भारतासाठी मोठा फाटक मानला जाईल. तथापि, या संकटाला तोंड देण्यासाठी स्पर्धा आयोजकांकडे पर्यायी योजना असण्याची शक्यता आहे. ही गुंतागुंतीची परिस्थिती टाळण्यासाठी ते पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिका यांच्यात उपांत्य सामना आयोजित करण्याचा निर्णय होऊ शकतो.
त्याचप्रमाणे, भारताला या दोन्ही संघांपैकी कोणत्याही एका संघाविरुद्ध उपांत्य फेरी खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. जेणेकरून स्पर्धेचा उत्साह कायम राहण्यात मदत होईल. जर, भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही सण संघ अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी ठरले तर, परिस्थिती पुन्हा एकदा बिकट होण्याची शक्यता आहे. कारण, दोन्ही संघांमधील तणावपूर्ण वातावरण जास्त चर्चेत आहे, त्याबाबत आता बातम्या देखील झळकत आहेत. या परिस्थितीत, आयोजकांना अधिक काळजीपूर्वक पावले उचलावी लागणार आहेत.