Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs PAK: ‘नो हँडशेक’वरून वाद का? मॅचनंतर हस्तांदोलन बंधनकारक आहे का? काय सांगतो ICC चा नियम

No Handshake Controversy: IND vs PAK सामन्यातील 'नो हँडशेक' वादावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. सामन्यानंतर हात का मिळवला नाही? यावर आयसीसीचा नियम काय सांगतो, आणि दोन्ही देशांच्या खेळाडूंची काय प्रतिक्रिया आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 15, 2025 | 04:45 PM
IND vs PAK (Photo Credit- X)

IND vs PAK (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘नो हँडशेक’वरून वाद का?
  • मॅचनंतर हस्तांदोलन बंधनकारक आहे का?
  • वाचा काय सांगतो ICC चा नियम
IND vs PAK, Asia Cup 2025: दुबईमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. आशिया कपच्या या सामन्यात भारताने पाकिस्तानला ७ विकेट्सने पराभूत केले. पण, सामन्यानंतर आणि टॉसच्या वेळीही भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. यानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशन सेरेमनीमध्येही उपस्थित राहिला नाही. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की, हा बीसीसीआय आणि टीम मॅनेजमेंटचा निर्णय होता आणि काही गोष्टी खेळ भावनेपेक्षाही जास्त महत्त्वाच्या असतात.

हा वाद उफाळून आल्यानंतर आता असा प्रश्न उपस्थित होत आहे की, मैदानावर खेळाडूंनी एकमेकांशी हात मिळवणे आवश्यक आहे का? यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच आयसीसीचा (ICC) नियम काय सांगतो?

हात मिळवण्यावर आयसीसीचा नियम काय आहे?

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही एक परंपरा आहे की, सामना संपल्यावर दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांशी हात मिळवतात. हा एक मैत्रीपूर्ण सलोखा दर्शवणारा क्षण असतो. मात्र, आयसीसीच्या नियमावलीमध्ये खेळाडूंनी एकमेकांशी हात मिळवणे अनिवार्य आहे, असे कुठेही स्पष्टपणे लिहिलेले नाही.

आयसीसीच्या ‘कोड ऑफ कंडक्ट’मध्ये मात्र इतर अनेक गोष्टींचा उल्लेख आहे. यात असे म्हटले आहे की, ‘खेळाडूंनी विरोधी संघाच्या खेळाडूंचा आणि पंचांचा आदर केला पाहिजे.’ म्हणूनच, क्रिकेटमध्ये सामना संपल्यानंतर खेळाडू साधारणपणे एकमेकांशी हस्तांदोलन करतात किंवा बॅट/ग्लोव्हजने अभिवादन करतात.

खेळभावनेवर आधारित नियमांनुसार, क्रिकेट नेहमीच खेळाच्या भावनेने खेळला पाहिजे. ‘फेअर प्ले’म्हणजेच निष्पक्ष खेळ खेळण्याची जबाबदारी कर्णधारांवर असते, पण ती सर्व खेळाडू, पंच आणि प्रशिक्षकांचीही असते. यामध्ये प्रतिस्पर्धकांचा आदर करणे, कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणे खेळणे, पंचांचे निर्णय स्वीकारणे आणि एक सकारात्मक वातावरण तयार करणे या गोष्टींचा समावेश आहे.

हे देखील वाचा: IND VS PAK : ‘हिरव्या झेंड्यासाठी…’, भारताकडून झालेल्या लाजिरवाण्या पराभवाने पाकिस्तानी चाहते खेळाडूंवर संतापले; पहा व्हिडिओ  

‘नो-हँडशेक’ वादावर दोन्ही देशांची प्रतिक्रिया

पाकिस्तानची भूमिका: माजी पाकिस्तानी कर्णधार राशिद लतीफ यांनी भारतीय संघावर राजकारण करण्याचा आरोप केला. ते म्हणाले की, ” हस्तांदोलन न करणे हा एक ‘डाग’ आहे, जो त्यांना आयुष्यभर सोबत घेऊन फिरावा लागेल. याआधीही युद्धे झाली, पण आम्ही नेहमीच हस्तांदोलन केले आहे. पहलगाम हल्ल्याबद्दलच्या भावना योग्य आहेत, पण जेव्हा तुम्ही मैदानात असता तेव्हा खेळ योग्य मार्गाने खेळला पाहिजे.”

माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांनी म्हटले आहे की, “हा एक क्रिकेटचा सामना आहे, त्याला राजकारण करू नये. घरातील वाद विसरून पुढे गेले पाहिजे.”

भारताची भूमिका: भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला, “आम्ही फक्त येथे खेळायला आलो होतो आणि आम्ही त्यांना योग्य उत्तर दिले. काही गोष्टी खेळभावनेपेक्षाही जास्त महत्त्वाच्या असतात. हस्तांदोलन न करण्याचा निर्णय बीसीसीआय आणि टीम मॅनेजमेंटचा होता. आम्ही आमच्या सरकार आणि बीसीसीआयच्या सोबत आहोत.”

Web Title: Why no handshake after match icc rules explained

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2025 | 04:44 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • cricket
  • IND VS PAK
  • Sports
  • Sports News
  • Team India

संबंधित बातम्या

भारत, इंग्लंड की दक्षिण आफ्रिका! T20 World Cup 2026 चे विजेतेपद कोण जिंकेल? एका माजी दिग्गजाने केली भविष्यवाणी
1

भारत, इंग्लंड की दक्षिण आफ्रिका! T20 World Cup 2026 चे विजेतेपद कोण जिंकेल? एका माजी दिग्गजाने केली भविष्यवाणी

T20 World Cup 2026 मधून बाहेर पडल्यानंतर वेस्ट इंडिज संघही भारतात अडकला, बोर्डाने जारी केले निवेदन
2

T20 World Cup 2026 मधून बाहेर पडल्यानंतर वेस्ट इंडिज संघही भारतात अडकला, बोर्डाने जारी केले निवेदन

पाकिस्तानी खेळाडूचे नशीब खराब! टी२० विश्वचषकात कोहलीचा विक्रम मोडला, तरीही या लीगच्या लिलावातून बाहेर
3

पाकिस्तानी खेळाडूचे नशीब खराब! टी२० विश्वचषकात कोहलीचा विक्रम मोडला, तरीही या लीगच्या लिलावातून बाहेर

IND vs ENG सामन्याआधी कोच गौतम गंभीरने केला मोठा खुलासा! विश्वचषकासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये का नव्हते संजूचे स्थान
4

IND vs ENG सामन्याआधी कोच गौतम गंभीरने केला मोठा खुलासा! विश्वचषकासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये का नव्हते संजूचे स्थान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.