Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI मुळे पडणार पैशांचा पाऊस! भारत 2028 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलरची डिजिटल अर्थव्यवस्था होण्याची शक्यता

भारतात दिवसेंदिवस AI ची मोठी प्रगती होत आहे. ही प्रगती लक्षात घेता AI मुळे भारतात पैशांचा पाऊस पडणार असून भारत 2028 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलरची डिजिटल अर्थव्यवस्था होणार असल्याची शक्यता इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी वर्तवली आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या एका कार्यक्रमात चंद्रशेखर यांनी हे वक्तव्य केले होते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 08, 2024 | 08:44 AM
AI मुळे पडणार पैशांचा पाऊस! भारत 2028 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलरची डिजिटल अर्थव्यवस्था होण्याची शक्यता

AI मुळे पडणार पैशांचा पाऊस! भारत 2028 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलरची डिजिटल अर्थव्यवस्था होण्याची शक्यता

Follow Us
Close
Follow Us:

भारताची डिजिटल अर्थव्यवस्था 2.8 टक्के वार्षिक दराने वाढत आहे आणि 2027-28 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचू शकते. भारतात AI मुळे पैशांचा पाऊस पडणार आहे, असं वक्तव्य इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केलं आहे. दिवसेंदिवस AI क्षेत्रात मोठी प्रगती केली जात आहे. आपल्या सोयीसाठी आणि आपली कामं अधिक सोपी व्हावी यासाठी आपण AI चा वापर करत आहोत. अनेक टेक कंपन्या देखील त्यांच्या AI मॉडेलमध्ये प्रगती करत असून नवनवीन फीचर्स लाँच केले जात आहेत.

हेदेखील वाचा- OpenAI ने ChatGPT मध्ये आणलं Canvas इंटरफेस, आता सोपं होणार ‘हे’ काम

AI चॅटबॉट्सची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. AI ची हीच प्रगती लक्षात घेता इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. AI मुळे भारतात पैशांचा पाऊस पडणार आहे. शिवाय भारत 2028 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलरची डिजिटल अर्थव्यवस्था होण्याची शक्यता राजीव चंद्रशेखर यांनी वर्तवली आहे. (फोटो सौजन्य – pinterest)

राजीव चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे की, भारताची डिजिटल अर्थव्यवस्था 2.8 टक्के वार्षिक दराने वाढत आहे आणि 2027-28 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचू शकते. India AI मिशनचे मूल्य देखील 10,000 कोटी रुपयांवरून 20,000 कोटी रुपयांपर्यंत दुप्पट होईल.

लक्ष्य एका वर्षाने वाढवले

केंद्रीय मंत्री चंद्रशेखर म्हणतात की, भारताची डिजिटल अर्थव्यवस्था फक्त 2026-27 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचेल अशी सरकारची अपेक्षा होती. परंतु, कोविड-19 साथीच्या आजारासारख्या अनपेक्षित आव्हानांमुळे, लक्ष्य एका वर्षाने वाढले आहे.

हेदेखील वाचा- गुगलने लाँच केले AI पॉवर्ड समरी कार्ड, Gmail वापरकर्त्यांना मिळणार फायदा, काम होणार अधिक सोपे

केंद्रीय मंत्री एका निवेदनात म्हणाले होते, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजिटलायझेशनवर खूप लक्ष केंद्रित करत आहेत. यामुळेच डिजिटल अर्थव्यवस्था 2.8 टक्के दराने वाढत आहे. आम्ही आधीच जगातील सर्वात वेगाने वाढणारी डिजिटल अर्थव्यवस्था आहोत. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या एका कार्यक्रमात चंद्रशेखर यांनी हे वक्तव्य केले होते. या कार्यक्रमाला सुमारे 300 आयटी, स्टार्टअप आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत उपस्थित होते.

1 लाख कोटी रुपयांचा सीड फंड

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री चंद्रशेखर म्हणाले की, AI ला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधानांनी आधीच 1 लाख कोटी रुपयांचा सीड फंड मंजूर केला आहे. यामुळे डिजिटल क्षेत्रातील नाविन्यपूर्णतेला चालना मिळेल. उदाहरणार्थ, एखाद्याने एखादे तंत्रज्ञान तयार केले असेल, तर त्याच्या संशोधन आणि विकासासाठी India AI मिशनचा वापर केला जाईल. त्याची एकूण किंमत 20,000 कोटी रुपये असेल.

हे सरकारचे उद्दिष्ट आहे

केंद्रीय मंत्री म्हणाले की, आमच्या सरकारचे उद्दिष्ट तरुण भारतीयांना प्रगत करणे आहे. जेणेकरून ते जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकतील. ते म्हणाले की तंत्रज्ञान उद्योगाला विकासाचा हा वेग कायम ठेवायचा आहे आणि आमचे लक्ष देखील या गोष्टीवर आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी 2015 मध्ये डिजिटल इंडिया मिशन सुरू केले होते. या अंतर्गत प्रत्येक भारतीयाकडे इंटरनेट कनेक्शन असेल आणि ते पूर्णपणे डिजिटली सक्षम होतील.

Web Title: Indian digital economy may reach 1 trillion dollars till 2028 with the help of india ai said rajeev chandrasekhar minister of state for electronics and it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2024 | 08:44 AM

Topics:  

  • Artificial intelligence
  • Indian Economy

संबंधित बातम्या

भारत अमेरिका-चीनला देणार टक्कर; लॉंच झाला AI चॅटबॉट, काय आहेत विशेष फीचर्स
1

भारत अमेरिका-चीनला देणार टक्कर; लॉंच झाला AI चॅटबॉट, काय आहेत विशेष फीचर्स

भारतीय अर्थव्यवस्था विकासाच्या जोरावर; कोणाच्याही दबावाने अडणार नाही मार्गावर
2

भारतीय अर्थव्यवस्था विकासाच्या जोरावर; कोणाच्याही दबावाने अडणार नाही मार्गावर

दिवसरात्र तुमच्या AI गर्लफ्रेंडसोबत बोलताय? सावधान! Perplexity CEO ने युजर्सना दिली वॉर्निंग, अतिशय धोकादायक….
3

दिवसरात्र तुमच्या AI गर्लफ्रेंडसोबत बोलताय? सावधान! Perplexity CEO ने युजर्सना दिली वॉर्निंग, अतिशय धोकादायक….

Devendra Fadnavis: “शेजारी देशांमध्ये लोकशाही टिकू शकली नाही, मात्र…”: काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
4

Devendra Fadnavis: “शेजारी देशांमध्ये लोकशाही टिकू शकली नाही, मात्र…”: काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.