
टेलीकॉम सेक्टरमध्ये होणार मोठा बदल! या दोन कंपन्या एकत्र येण्याची शक्यता, यूजर्सवर कसा होणार परिणाम? जाणून घ्या
WhatsApp Update: काय सांगता! सीक्रेट मेसेज वाचल्यानंतर आपोआप होणार डिलीट, लवकरच येणार नवं फीचर
समोर आलेल्या काही रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, भारत संचार निगम लिमिटेड आणि वोडाफोन-आइडिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या या चर्चेची माहिती दूरसंचार विभागाने एका संसदीय समितीला दिली आहे. प्रतिस्पर्ध्यांची वाढती संख्या आणि सतत कमी होणारे यूजर्स यामुळे टेलिकॉम कंपन्यांनी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. सध्या, भारतात जिओ आणि एअरटेल या दोन्ही आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या आहेत. या दोन्ही आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांकडे अनुक्रमे 48 करोड आणि 43 करोडहून अधिक यूजर्स आहेत. तर बीएसएनएल आणि व्हिआय या टेलिकॉम कंपन्यांच्या यूजर्सची संख्या सतत कमी होत आहे. खराब नेटवर्क, रिचार्ज प्लॅनची वाढती किंमत यांसारख्या कारणांमुळे यूजर्स बीएसएनएल आणि व्हिआय सोडून जिओ आणि एअरटेलचे सिमकार्ड खरेदी करण्यावर अधिक भर देत आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
16 मार्च रोजी लोकसभेच्या वेबसाईटवर एक रिपोर्ट जारी करण्यात आला आहे, ज्यामध्ये संचार सचिव समित अग्रवाल यांनी संसदीय समितिला सांगितलं आहे की, Vi आणि BSNL यांच्यामध्ये चर्चा सुरु आहे. मात्र, हे विलीनीकरण शक्य होईल की नाही, हे पुढील चर्चेनंतरच ठरवले जाईल. दरम्यान, गोड्डाचे खासदार निशिकांत दुबे यांच्या अध्यक्षतेखालील संचार आणि माहिती तंत्रज्ञान संसदीय समितीने, दोन्ही ऑपरेटर्समधील पायाभूत सुविधांच्या वाटपाबाबत निर्णय घेण्यास मदत करण्याचे निर्देश दूरसंचार विभागाला दिले आहेत.
2016 मध्ये जिओ नेटवर्क सुरु करण्यात आले. अगदी कमी वेळातच जिओने बाजी मारली आणि देशातील टेलिकॉम कंपन्यांना मागे टाकले. यावेळी अनेक टेलिकॉम कंपन्या बंद देखील झाला. याच काळात वोडाफोन आणि आइडिया यांनी एकत्र येत Vi ची स्थापना केली. या हातमिळवणीनंतर Vi देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी बनली होती. मात्र काही महिन्यांतच जियो आणि एयरटेल ने Vi ला मागे सोडलं. यानंतर टेलिकॉम क्षेत्र पूर्णपणे बदललं. सततच्या एजीआर थकबाकीमुळे व्होडाफोन आयडिया दबावाखाली होती, ज्यामुळे तिच्या नेटवर्क विस्तारास विलंब झाला. 5G स्पेक्ट्रम मिळवूनही, ते सुरू करण्यासाठी तीन वर्षे लागली.