Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हा आहे भारताचा ‘दुर्दैवी राजवाडा’, 400 वर्षांपासून पडलाय ओसाड, शाहजहानच्या खास मित्राकडून बांधण्यात आला होता

जर तुम्हाला मध्य प्रदेशात फिरायचे असेल तर येथे अनेक प्राचीन आणि रहस्यमयी किल्ले आणि राजवाडे आहेत. दतियाचा सतखंडा पॅलेस हा भारतातील एकमेव असा राजवाडा आहे ज्यामध्ये आजपर्यंत कोणीही वास्तव्य केलेले नाही. हा राजवाडा दतियाचा राजा बीर सिंग देव यांना भेट म्हणून देण्यात आला होता. ऐतिहासिक गूढ लपलेल्या या राजवाड्यात नक्की असे काय आहे की इथे कोणी वास्तव करत नाही? याविषयी सविस्तर जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 02, 2024 | 09:43 AM
हा आहे भारताचा 'दुर्दैवी राजवाडा', 400 वर्षांपासून पडलाय ओसाड, शाहजहानच्या खास मित्राकडून बांधण्यात आला होता

हा आहे भारताचा 'दुर्दैवी राजवाडा', 400 वर्षांपासून पडलाय ओसाड, शाहजहानच्या खास मित्राकडून बांधण्यात आला होता

Follow Us
Close
Follow Us:

भारत आपल्या ऐतिहासिक वस्तूंसाठी जगप्रसिद्ध आहे. भारतात अनेक प्राचीन किल्ले आहेत, ज्यांचा इतिहास खूप वर्षे जुना आहे. देशातील किल्ले इथला गौरवशाली इतिहास आणि भूतकाळातील योद्धांचे सामर्थ्य दर्शवतात. प्रत्येक किल्ल्यावर कोणत्या ना कोणत्या राजाने राज्य केले आहे. प्राचीन काळी बहुतेक राजे आणि सम्राट या किल्ल्यांमध्ये राहत असत आणि येथूनच शत्रूंशी युद्ध करत असत. मात्र आज आम्ही तुम्हाला देशातील अशा प्राचीन किल्ल्याचा इतिहास सांगणार आहोत जो 400 वर्षांपासून ओसाड पडला आहे.

गेल्या 400 वर्षांपासून येथे कोणीही राहत नाही, म्हणून याला ‘दुर्भाग्यपूर्ण पॅलेस’ असे म्हटले जाते. हा राजवाडा मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात वसलेला आहे. या किल्ल्याचे नाव सातखंडा महाल आहे. हे ठिकाण आपल्या अप्रतिम कलेसाठी प्रसिद्ध आहे. मात्र याचवेळी याला अशुभ देखील म्हटले जाते. दतियाचा सातखंडा पॅलेस इतकी वर्षे का उजाड आहे आणि यामागे नक्की कोणते करणं कारणीभूत आहे? याविषयी संपूर्ण इतिहास सविस्तर जाणून घेऊयात.

हेदेखील वाचा – ऑक्टोबर-मार्च दरम्यान फिरण्याचा विचार करताय? IRCTC कडून फ्लाइट तिकिटांवर मिळत आहे भरपूर सूट!

शाहजहानच्या मित्राने बांधला होता पॅलेस

या महालाविषयी बोलणे केले तर, या महालात एकूण 440 खोल्या आहेत. तरीही 400 वर्षांपासून ते निर्जन राहिले आहे. हा राजवाडा दतियाचा राजा बीर सिंग यांनी 1620 मध्ये बांधला होता. त्यांनी जहांगीरच्या स्वागतासाठी हा भव्य राजवाडा उभारण्यात आला होता. राजा सलीम लहान असल्यापासून दोघांमध्ये मैत्री होती. जेव्हा बादशाह त्याचे वडील अकबर यांच्यासोबत सत्तेवर होते तेव्हा शाहजहानला सिंहासनावर बसवण्यात बीर सिंग देवने खूप मदत केली होती.

हेदेखील वाचा – या देशात फिरणे आहे पूर्णपणे मोफत, टुरिस्ट एक रुपयाही न करता करू शकतात ट्रॅव्हल

ना लाकूड ना लोखंडाचा केला गेला वापर

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या सुंदर सात मजली इमारतीमध्ये लाकूड किंवा लोखंडाचा वापर करण्यात आलेला नाही. हा महाल पूर्णपणे दगड आणि विटांपासून बनवण्यात आला आहे. त्यांच्या ताकदीमुळे राजवाडा इतकी वर्षे भक्कमपणे उभा आहे. असे म्हणतात की, ही सात मजली सुंदर इमारत फक्त एका रात्रीसाठी वापरली जात होती. यानंतर येथे कोणी राहिले नाही.

का ओसाड पडला आहे दतियाचा राजवाडा

बीर सिंगदेव यांना दतिया जिल्हा भेट म्हणून देण्यात आला होता. याच कारणास्तव बीरसिंह देव किंवा त्यांच्या कुटुंबाने या महालाचा कधीही वापर केला नाही. असे म्हणतात की, एकदा सम्राट राजवाड्यात आला तेव्हा त्याने येथे एक रात्र मुक्काम केला. त्यामुळे सतखंडा राजवाडा वर्षानुवर्षे रिकामा आहे. एका रात्रीशिवाय येथे कोणीही राहिले नाही.

Web Title: Historical datia palace or badnaseeb mahal where no one live here since 400 years know the history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2024 | 09:43 AM

Topics:  

  • madhya pradesh

संबंधित बातम्या

कफ सिरप की विष! Cough syrup प्यायल्याने ११ निष्पाप मुलांचा मृत्यू, दोन सिरपवर तात्पुरती बंदी
1

कफ सिरप की विष! Cough syrup प्यायल्याने ११ निष्पाप मुलांचा मृत्यू, दोन सिरपवर तात्पुरती बंदी

मोठी बातमी! दुर्गा विसर्जनादरम्यान ट्रॅक्टर ट्रॉली नदीत कोसळली, ११ जणांचा मृत्यू, 3 जण बेपत्ता
2

मोठी बातमी! दुर्गा विसर्जनादरम्यान ट्रॅक्टर ट्रॉली नदीत कोसळली, ११ जणांचा मृत्यू, 3 जण बेपत्ता

Bareilly Violence: बरेलीमध्ये आता भीती कशासाठी? ४८ तासांसाठी इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद, योगी सरकारचा मोठा निर्णय
3

Bareilly Violence: बरेलीमध्ये आता भीती कशासाठी? ४८ तासांसाठी इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद, योगी सरकारचा मोठा निर्णय

आई-बाप की हैवान? नवजात बाळाला जंगलात सोडून दगडाने…., सरकारी नोकरी गमावण्याच्या भीतीने केलं भयंकर कृत्य
4

आई-बाप की हैवान? नवजात बाळाला जंगलात सोडून दगडाने…., सरकारी नोकरी गमावण्याच्या भीतीने केलं भयंकर कृत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.