तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांना सात दिवसांच्या उपचारानंतर साताळकर लोटस रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सात दिवसांपूर्वी स्वतःला जखमी करून घेतल्याने त्यांच्यावर डॉ. हर्षवर्धन तनवर यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली होती. आज रुग्णालयातून निरोप घेताना महाराज भावूक झाले होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि आमदार संग्राम जगताप यांनी महाराजांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. डॉक्टरांनी मला मृत्यूच्या दारातून परत आणले. ही घटना मी स्वतःच्या मनाने केली असून मला कोणाचाही त्रास नाही असे महाराजांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. याचबरोबर गडावर सुरू असलेल्या नारळी सप्ताहला देखील भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आदिनाथ महाराज शास्त्री यांनी केले आहे…
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांना सात दिवसांच्या उपचारानंतर साताळकर लोटस रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सात दिवसांपूर्वी स्वतःला जखमी करून घेतल्याने त्यांच्यावर डॉ. हर्षवर्धन तनवर यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली होती. आज रुग्णालयातून निरोप घेताना महाराज भावूक झाले होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि आमदार संग्राम जगताप यांनी महाराजांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. डॉक्टरांनी मला मृत्यूच्या दारातून परत आणले. ही घटना मी स्वतःच्या मनाने केली असून मला कोणाचाही त्रास नाही असे महाराजांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. याचबरोबर गडावर सुरू असलेल्या नारळी सप्ताहला देखील भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आदिनाथ महाराज शास्त्री यांनी केले आहे…