गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या गणेशभक्तांची साताऱ्यातील आनेवाडी टोल नाक्यावर प्रचंड गर्दी झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहन चालकांनी पुणे-बेंगळुरू महामार्गाला पसंती दिली असून, एकाच दिवसात तब्बल ६० हजार वाहने गेल्यामुळे हा आतापर्यंतचा विक्रमी आकडा ठरला आहे. यामुळे गणरायाच्या आगमनापूर्वीच महामार्गावर वाहनांची मोठी रेलचेल पाहायला मिळत आहे. या विषयाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ओंकार सोनावले यांनी
गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या गणेशभक्तांची साताऱ्यातील आनेवाडी टोल नाक्यावर प्रचंड गर्दी झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहन चालकांनी पुणे-बेंगळुरू महामार्गाला पसंती दिली असून, एकाच दिवसात तब्बल ६० हजार वाहने गेल्यामुळे हा आतापर्यंतचा विक्रमी आकडा ठरला आहे. यामुळे गणरायाच्या आगमनापूर्वीच महामार्गावर वाहनांची मोठी रेलचेल पाहायला मिळत आहे. या विषयाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ओंकार सोनावले यांनी