संपूर्ण महाराष्ट्रात काल शिवजयंती मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली.यानिमित्ताने सर्वत्र शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळला. या आनंदाच्या वातावरणात मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात काही अतिउत्साही तरुणांनी हुल्लडबाजीचा कळस गाठला.तर दुचाकींच्या सायलेन्सरची पुंगळी काढून कर्णकर्कश आवाज काढत अक्षरशः हैदोस घातल्याचं दिसून आलंय. त्यामुळे शिवप्रेमींनी या गंभीर प्रकाराबद्दल संताप व्यक्त करत हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केलीये.. शिवाय हुल्लडबाजीचं मूळ कारण व्यसनाधीनता असल्याचा संशय व्यक्त करत कोल्हापूर जिल्ह्यात प्रशासनाने गांजा ,दारु सह व्यसनमुक्तीच काम करणं गरजेचं असल्याचं म्हटलंयं..छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिस्त आणि संयमाचे प्रतीक. मात्र, काही तरुणांनी सायलेन्सरमध्ये बदल करून फटाक्यांसारखे कर्णकर्कश आवाज काढत अनेक रस्त्यांवर अक्षरशः धिंगाणा घातल्याचं दिसून आलंय. हा धिंगाणा इथंच नाही थांबला तर एका ग्रुपने गाडी थेट पंचगंगा नदीत फेकल्याची घटना घडलीये..शिवाय एक गाडीही पेटवलण्यात आल्याचा प्रकार घडलायं. विशेष म्हणजे या सगळ्या मुलांनी एखादा पराक्रम केल्यासारखे हे सगळे हुल्लडबाजीचे व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर पोस्ट केले आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जर आशा पद्धतीने साजरी करण्याची कोणी पद्धत पाडत असेल तर अशा हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात काल शिवजयंती मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली.यानिमित्ताने सर्वत्र शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळला. या आनंदाच्या वातावरणात मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात काही अतिउत्साही तरुणांनी हुल्लडबाजीचा कळस गाठला.तर दुचाकींच्या सायलेन्सरची पुंगळी काढून कर्णकर्कश आवाज काढत अक्षरशः हैदोस घातल्याचं दिसून आलंय. त्यामुळे शिवप्रेमींनी या गंभीर प्रकाराबद्दल संताप व्यक्त करत हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केलीये.. शिवाय हुल्लडबाजीचं मूळ कारण व्यसनाधीनता असल्याचा संशय व्यक्त करत कोल्हापूर जिल्ह्यात प्रशासनाने गांजा ,दारु सह व्यसनमुक्तीच काम करणं गरजेचं असल्याचं म्हटलंयं..छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिस्त आणि संयमाचे प्रतीक. मात्र, काही तरुणांनी सायलेन्सरमध्ये बदल करून फटाक्यांसारखे कर्णकर्कश आवाज काढत अनेक रस्त्यांवर अक्षरशः धिंगाणा घातल्याचं दिसून आलंय. हा धिंगाणा इथंच नाही थांबला तर एका ग्रुपने गाडी थेट पंचगंगा नदीत फेकल्याची घटना घडलीये..शिवाय एक गाडीही पेटवलण्यात आल्याचा प्रकार घडलायं. विशेष म्हणजे या सगळ्या मुलांनी एखादा पराक्रम केल्यासारखे हे सगळे हुल्लडबाजीचे व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर पोस्ट केले आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जर आशा पद्धतीने साजरी करण्याची कोणी पद्धत पाडत असेल तर अशा हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी करण्यात येत आहे.