यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यातल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ या सामाजिक उपक्रमांतर्गत तीन दिवसांची आनंदयात्रा आयोजित करण्यात आली. रसिकाश्रय संस्था, घाटंजी तर्फे दरवर्षी महेश पवार यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबवला जातो. यंदा समाजातील अत्यंत महत्त्वाचा पण दुर्लक्षित घटक असलेल्या या महिलांना आनंदाचे काही क्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला.यामध्ये पहिल्यावर्षी निराधार वृद्धांना, दुसऱ्या वर्षी धुनी भांडी करणाऱ्या घरगुती महिला कामगारांना घेऊन विमान वारी करण्यात आली. शेतकरी नवऱ्याच्या आत्महत्येनंतर कर्जाचा डोंगर, सामाजिक उपेक्षा आणि एकाकीपणाशी सामना करत या महिला स्वतःच्या आणि लेकरांच्या जगण्यासाठी झगडत असतात. सासर-माहेरची साथ कमी पडते, प्रशासनालाही त्यांच्या संघर्षाची पूर्ण जाणीव नसते. तरीही त्या खंबीरपणे उभ्या राहतात. त्यांच्या या संघर्षाला सलाम करत संयोजक महेश पवार यांनी ‘जीवाची मुंबई’ ही सफर आयोजित केली.
यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यातल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ या सामाजिक उपक्रमांतर्गत तीन दिवसांची आनंदयात्रा आयोजित करण्यात आली. रसिकाश्रय संस्था, घाटंजी तर्फे दरवर्षी महेश पवार यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबवला जातो. यंदा समाजातील अत्यंत महत्त्वाचा पण दुर्लक्षित घटक असलेल्या या महिलांना आनंदाचे काही क्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला.यामध्ये पहिल्यावर्षी निराधार वृद्धांना, दुसऱ्या वर्षी धुनी भांडी करणाऱ्या घरगुती महिला कामगारांना घेऊन विमान वारी करण्यात आली. शेतकरी नवऱ्याच्या आत्महत्येनंतर कर्जाचा डोंगर, सामाजिक उपेक्षा आणि एकाकीपणाशी सामना करत या महिला स्वतःच्या आणि लेकरांच्या जगण्यासाठी झगडत असतात. सासर-माहेरची साथ कमी पडते, प्रशासनालाही त्यांच्या संघर्षाची पूर्ण जाणीव नसते. तरीही त्या खंबीरपणे उभ्या राहतात. त्यांच्या या संघर्षाला सलाम करत संयोजक महेश पवार यांनी ‘जीवाची मुंबई’ ही सफर आयोजित केली.