यवतमाळच्या पांगडी गावात पत्नीने प्रियकरासोबत मिळून झोपलेल्या पतीला विजेचा धक्का देऊन मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पती जागा झाल्याने कट फसला आणि पोलिसांनी दोघांना अटक केली.
युद्धजन्य परिस्थितीत पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा आणि बायोडीकंपोजर मिसळून वापर करावा, असा सल्ला देण्यात आला आहे. या उपायामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होईल.
शासनाच्या योजनेसह वैयक्तिक स्तरावरही माती परीक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र नमुना तपासणी प्रक्रियेत काहीसा विलंब होत असल्याने काही शेतकरी खासगी प्रयोगशाळांकडे वळत आहेत.
यवतमाळ जिल्ह्यात १८ हजार महिला ‘लखपती दीदी’ बनल्या असून, महिला सक्षमीकरणाला मोठे बळ मिळाले आहे. बचतगटांच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जाची परतफेड ९९ टक्क्यांपर्यंत झाल्याने हा उपक्रम यशस्वी ठरला आहे.
पूर्वी महिला प्रवासी आधारकार्ड किंवा इतर ओळखपत्र दाखवून अर्ध्या दरात प्रवास करत होत्या, तर ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण सवलत मिळत होती. मात्र नव्या नियमांनुसार बसमध्ये इलेक्ट्रॉनिक पडताळणीद्वारेच सवलत लागू होणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात ‘मटण नीट शिजलं नाही’ या किरकोळ कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. पाहुण्यासमोर झालेला अपमान सहन न झाल्याने पत्नी चेतना जाधव यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली.
यवतमाळच्या विरगव्हाण येथे आंबेडकर जयंती मिरवणुकीत नाचताना धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून वाद झाला. संतापलेल्या अल्पवयीन मुलाने 15 वर्षीय लकी ढोलेवर चाकूने वार करून त्याची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं
दाभडी गावात 'चाय पे चर्चा' कार्यक्रमात २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. ते अद्याप झालेले नाही. मात्र २०१९ मध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना आणली.
आखाती देशांतील तणावाचे पडसाद आता थेट ग्रामीण अर्थव्यवस्थेवर उमटू लागले. इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे जागतिक बाजारपेठेत निर्माण झालेल्या अस्थिरतेचा परिणाम विदर्भातील शेतीमालाच्या दरांवर होत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सुमारे ५५ रेतीघाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र या प्रक्रियेमुळे वाळूचे दर कमी होण्याची कोणतीही स्पष्ट योजना नसल्याची चर्चा रंगली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील जीवनदीप अनुदानित आश्रम शाळेत इयत्ता नववीत शिकणाऱ्या कुमारी दिपाली विलास कोमटी या विद्यार्थिनीचा झालेला मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे.
यवतमाळच्या बोथ गावात 6 वर्षीय शिवानीची सोन्याच्या नथीसाठी गळा आवळून हत्या करण्यात आली. आरोपींनी मृतदेह पोत्यात लपवला. पोलिसांनी तपासातून एकाच कुटुंबातील 5 जणांना अटक केली.
यवतमाळच्या दरवा तालुक्यात बेपत्ता 6 वर्षीय शिवानी जाधव हिचा मृतदेह गावातील घरात पोत्यात सापडला. पोलिसांनी शोधमोहीम राबवून हा धक्कादायक प्रकार उघड केला. संशयितांना ताब्यात घेऊन तपास सुरू आहे.
यवतमाळमध्ये राणा प्रताप गेट परिसरात 19 वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला झाला. चाकू पाठीत अडकूनही जीव वाचला. मात्र पोलिसांनी गंभीर गुन्ह्याऐवजी साधा मारहाणीचा गुन्हा नोंदवल्याने कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
पुसद तालुक्यातील आरेगाव मोहा येथील ज्योतिबाराव दतराव राऊत, महागाव तालुक्यातील कातरवाडी येथील शैलेश नामदेव राठोड व आत्माराम नंदू पवार या शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
ग्रामीण भागापासून शहरापर्यंत आरोग्यसेवेचे जाळे विणण्यात आले आहे. मात्र, शासकीय आरोग्य संस्थेत डॉक्टर नियमित उपस्थित राहत नाही. आरोग्य तपासणी झाल्यास औषधी मिळत नाही.
जिल्ह्यात जंगलाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. या वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे. परंतु सध्या उन्हाळ्याची चाहूल लागत आहे. अशातच वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
यवतमाळमध्ये एकतर्फी अनैतिक संबंधातून युवकाची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी अवघ्या 24 तासांत गुन्ह्याचा उलगडा करत पती-पत्नीला अटक केली असून दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.