नदीकाठच्या अतिजोखीम गावांमध्ये विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून औषधसाठा, प्रशिक्षित मनुष्यबळ, साथरोग नियंत्रण पथके आणि जनजागृती मोहिमेद्वारे संभाव्य आरोग्य संकटाला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. पावसाळ्यात ठिकठिकाणी…
यवतमाळच्या मारेगाव तालुक्यात महिनाभरापूर्वी प्रेमविवाह केलेल्या नवदाम्पत्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. आशिष आणि करिश्मा धानोरकर यांनी मृत्यू निश्चित व्हावा म्हणून पोटाला दगड बांधल्याची माहिती समोर आली…
राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी ५ ते १५ जून या कालावधीत राज्यव्यापी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश महामंडळाच्या मुख्य सुरक्षा व दक्षता विभागाने दिले…
यवतमाळमध्ये महामंडळांवर अध्यक्ष किंवा सदस्यपद मिळवून देण्याचे आमिष दाखवत 20.25 कोटी रुपयांची मागणी करणाऱ्या ठगबाज टोळीचा पर्दाफाश झाला आहे. भाजप समन्वयक नितीन भुतडा यांच्या सतर्कतेमुळे आणि स्पाय कॅमेऱ्याच्या मदतीने पुरावे…
जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी प्लास्टिक मल्चिंग आणि जैविक मल्चिंग करणे आवश्यक आहे. पिकाची कोळपणी करून पिकाच्या बुच्याशी मातीची भर द्यावी जेणेकरून ओलावा टिकून राहील. कापूस, तूर, मका, सूर्यफूल पिकांचे रोपे दाट…
बदलत्या हवामानाचा सामना करत शेतकरी खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करण्यासाठी धडपड करत आहे. गत काही वर्षांपासून अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक संकटांमुळे शेती उत्पादनात मोठी घट झाली आहे.
यवतमाळच्या पांगडी गावात पत्नीने प्रियकरासोबत मिळून झोपलेल्या पतीला विजेचा धक्का देऊन मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पती जागा झाल्याने कट फसला आणि पोलिसांनी दोघांना अटक केली.
युद्धजन्य परिस्थितीत पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा आणि बायोडीकंपोजर मिसळून वापर करावा, असा सल्ला देण्यात आला आहे. या उपायामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होईल.
शासनाच्या योजनेसह वैयक्तिक स्तरावरही माती परीक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र नमुना तपासणी प्रक्रियेत काहीसा विलंब होत असल्याने काही शेतकरी खासगी प्रयोगशाळांकडे वळत आहेत.
यवतमाळ जिल्ह्यात १८ हजार महिला ‘लखपती दीदी’ बनल्या असून, महिला सक्षमीकरणाला मोठे बळ मिळाले आहे. बचतगटांच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जाची परतफेड ९९ टक्क्यांपर्यंत झाल्याने हा उपक्रम यशस्वी ठरला आहे.
पूर्वी महिला प्रवासी आधारकार्ड किंवा इतर ओळखपत्र दाखवून अर्ध्या दरात प्रवास करत होत्या, तर ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण सवलत मिळत होती. मात्र नव्या नियमांनुसार बसमध्ये इलेक्ट्रॉनिक पडताळणीद्वारेच सवलत लागू होणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात ‘मटण नीट शिजलं नाही’ या किरकोळ कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. पाहुण्यासमोर झालेला अपमान सहन न झाल्याने पत्नी चेतना जाधव यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली.
यवतमाळच्या विरगव्हाण येथे आंबेडकर जयंती मिरवणुकीत नाचताना धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून वाद झाला. संतापलेल्या अल्पवयीन मुलाने 15 वर्षीय लकी ढोलेवर चाकूने वार करून त्याची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं
दाभडी गावात 'चाय पे चर्चा' कार्यक्रमात २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. ते अद्याप झालेले नाही. मात्र २०१९ मध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना आणली.
आखाती देशांतील तणावाचे पडसाद आता थेट ग्रामीण अर्थव्यवस्थेवर उमटू लागले. इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे जागतिक बाजारपेठेत निर्माण झालेल्या अस्थिरतेचा परिणाम विदर्भातील शेतीमालाच्या दरांवर होत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सुमारे ५५ रेतीघाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र या प्रक्रियेमुळे वाळूचे दर कमी होण्याची कोणतीही स्पष्ट योजना नसल्याची चर्चा रंगली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील जीवनदीप अनुदानित आश्रम शाळेत इयत्ता नववीत शिकणाऱ्या कुमारी दिपाली विलास कोमटी या विद्यार्थिनीचा झालेला मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे.
यवतमाळच्या बोथ गावात 6 वर्षीय शिवानीची सोन्याच्या नथीसाठी गळा आवळून हत्या करण्यात आली. आरोपींनी मृतदेह पोत्यात लपवला. पोलिसांनी तपासातून एकाच कुटुंबातील 5 जणांना अटक केली.